Get it on Google Play
Download on the App Store

नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥

१९०८
नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥
श्रींचे गाईंवर अतिशय प्रेम होते. अनेक गाई त्यांनी कसायापासून वाचवल्या. गोंदवल्यास मोठी गोशाळा बांधली. गोशाळेत जाऊन ते झाडलोट करीत. अभ्यंकर नावाच्या गृहस्थाला त्यांनी गोशाळेची व्यवस्था पाहण्यास नेमले. श्री स्वत: पुष्कळ गोप्रदाने देत. गोसेवेसाठी पुष्कळ खर्च येई, पण श्रींना त्याची दिक्कत नसे. गाईंचेही श्रींवर फार प्रेम असे. एका महारोग्याला त्यांनी गोसेवा करायला लावली आणि त्याचा रोग पुष्कळ बरा झाला.गोरक्षणाचे कार्य पाहून श्री चौडेबुवा श्रींच्या दर्शनासाठी गोंदवल्यास आले. श्रींनी त्यांना कफनी दिली व सांगितले, " गाईंचे रक्षण आणि सेवा भगवंतासाठी असावी व ही जाणीव राहण्यासाठी भगवंताचे नाम सतत घेत असावे, म्हणजे तो आपल्याला मदत करतो."
श्रींचे गाईंवर अलोट प्रेम असे. तसे त्यांचा आवडता बत्ताशा घोडा, एकादशी करणारे त्यांचे कुत्रे, त्यांच्यामागे चारापाणी सोडून राहणारा त्यांचा बैल, विशेष आवडणारी गंगी गाय या सर्व प्राण्यांचे त्यांच्यावर असणारे अलोट प्रेम पाहिले म्हणजे कौतुक वाटते. गोशाळेतील गाईंचे कळप व वासरांचा समुदाय पाहून श्रींना प्रेमाचे भरते येई व डोळ्यातून अश्रूधारा येत. मोठ्या दुष्काळात श्रींनी गरीब जनतेला जी अचाट मदत केली ते पाहूत औंधचा राजासुद्धा थक्क होऊन गेला. राजा व त्याची बायको गोंदवल्यास अधून मधून येत व श्रींचे दर्शन घेऊन जात. कालांतराने राजा मरण पावल्यावर संस्थानच्या राजकारणाला वेगळे वळण मिळाले. खटपटी लटपटी करुन खोटे कागद करणे, दागिने लांबविणे, वाईट सल्ला देणे वगैरे गोष्टी सुरु झाल्यावर मुंबई सरकारने जेकब नावाच्या कलेक्टरला तेथे प्रशासक म्हणून नेमले. पुढे राजघराण्यातील भांडणे पाहून त्याने पैसे खाण्यास सुरुवात केली. श्रींच्या आज्ञेप्रमाणे लोक वागतात हे त्याला सहन न होऊन त्याने श्रींना विष घालण्याचे कारस्थान रचले. ३/४ माणसे त्याने गोंदवल्यास त्याकरिता पाठविली पण ती श्रींना वश होऊन त्याचा अनुग्रह घेऊन गेली. चवथ्या माणसाने श्रींना घरी जेवावयास बोलावले.ताट वाढून, रामाला नैवेद्य पाठविला. श्रींनी तो नैवेद्य जमिनीत पुरायला सांगितले व त्याचे अंत:करण दुखावेल म्हणून एकटेच त्याच्याकडे जेवावयास गेले. सोमल विष घातलेला प्रसाद श्रींनी बिनदिक्क्त खाल्ला. तासाभराने त्यांच्या पोटात खूप आग होऊ लागली म्हणून श्रींनी ओंजळभर वेलदोडे खाल्ले. रात्री पोटातील आग कमी झाल्यावर श्री रामापुढे भजणास उभे राहिले. दोन तास उत्तम भजन निरुपण केले. एक स्वरचित अभंग म्हटला, "काय पाहता श्रेष्ट जन। काळ आला हो कठीण ॥१॥ नका भुलू भलत्या भ्रमी । नाम जपा अंतर्यामी ॥२॥ भूल पडली कलियुगी । असत्याला जन राजी ॥३॥ करा असत्याचा कंटाळा । नाम जपा वेळोवेळा ॥४॥ जेथे तेथे बुद्धिभेद । मिथ्या म्हणती शास्त्र वेद ॥५॥ नाम सांगता जनासी । विष देऊ येते त्यासी  ॥६॥ दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥७॥ विषप्राशनानंतर श्रींना दमा सुरु झाला. तो शेवटपर्यंत राहिला. ते दिवस स्वदेशीचे होते. एकाने श्रींना लाहानसा साखरेचा कारखाना काढण्याचा सल्ला दिला व त्याप्रमाणे सर्व यंत्रे आणविली. श्रीनी स्वत: खर्च केला. यंत्र आल्यावर श्रींनी माहीतगार माणसाकडून ती बसवून घेतली. नंतर ऊस आणून साखर तयार केली. साखरेचे कौतुक झाले, पुढे तो व्याप मागे पडला तो कायमचाच. त्याचप्रमाणे नदीपासून मंदिरापर्यंत आणण्यासाठी नळही बसवून घेतले. पुढे मंदिरापर्यंत पाणी आले, श्रींनी त्याचे मोठे कौतुक केले. २/४ दिवस पाणी आले, पुढे काही ना काही कारणाने नळाचे पाणी बंद झाले. श्री म्हणाले, "जितकी सोय तितका परावलंबीपणा जास्त. शहरातल्या सर्वच सोयी खेड्यात आणण्याचा फार प्रयत्न करु नये." श्रींना नवीननवीन कल्पना आवडत होत्या व त्या प्रत्यक्षातही आणीत. खेड्यातल्या राहणीच्या द्दष्टीने त्यांचा कितपत फायदा होईल हे जाणून त्यांचा वापर मर्यादित ठेवत.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली