Get it on Google Play
Download on the App Store

"याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल."

१८५६
"याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल."
कोल्हापूरहून घरी परत आल्यावर श्रींना गोंदवल्यास चैन पडेना. त्यांच्या वागण्यामध्ये फरक पडला. रात्रीच्या वेळी ते जास्त ध्यान करू लागले. तोंडाने सारखे रामाचे नामस्मरण चाललेले असे. जुने मित्र भेटले की, तेवढयापुरती थट्टा मस्करी होई, परंतु लगेचच श्री अंतर्मुख होऊन बसत. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा आपोआप घरी रमू लागेल " असा व्यवहारी सल्ला लिंगोपंतांनी रावजींना दिला. गीताबाईंनाही तो पसंत पडला. सर्वांनी मिळून श्रींचे लग्न करून टाकण्याचे निश्चित केले. श्रींना मुली सांगून येऊ लागल्या. गोंदवल्याहून ८/१० कोसांवर खातवळ म्हणून एक चांगले, सज्जन, श्रीमंत व लोकप्रिय गृहस्थ कुळकर्णी म्हणून होते. त्यांच्या कुटुंबाचे नाव भागिरथी. त्यांना एक सुंदर, समजूतदार व सुशील मुलगी होती. आपल्या या ८/९ वर्षांच्या मुलीला घेऊन संभाजीराव गोंदवल्यास पंतांच्याकडे आले. ते दोघे बोलत बसले असता श्री सहज तेथे आले. ती सुंदर जोडी पाहून पंतांना आनंद झाला. त्यांनी संभाजीपंतांना लग्नाचा लगेच होकार दिला. दोन्ही बाजूंनी तयारी होऊन लग्नाचे वैशिष्टय म्हणजे पंतांच्या हातचे हे शेवटचे कार्य आणि संभाजीरावांकडले हे पहिले कार्य असल्यामुळे आणि दोन्हीकडची मंडळी सज्जन व हौशी असल्याने गोंदवल्यास आठ दिवस जणू काही उत्सवच चालला होता. लग्न समारंभ आटोपल्यावर पंत स्वतः नवीन जोडप्याला घेऊन पंढरपूरला आले. त्यांची ही शेवटचीच वारी होती, याची त्यांना जाणीव असल्यामुळे त्यांनी मनापासून पांडुरंगाची प्रार्थना केली व श्रींना कुटंबासह त्याच्या पायावर घातले. पंतांची प्रकृती हळूहळू क्षीण होत चालली होती. पण या लग्नानंतर मात्र ते जाण्याची भाषा बोलू लागले. त्यानंतर ३/४ महिन्यातच पंतांच्या पत्नीचे थोडासा ताप येऊन निधन झाले. आणि तिच्या नंतर चार महिन्यांनी पंतांनी देह ठेवला. मृत्युसमयी त्यांचे वय ८५ वर्षांचे होते. श्रींच्या जीवनाच्या द्दष्टीने पंतांना विशेष महत्त्व आहे. त्यांच्या वागण्याचा ठसा श्रींवर चांगल्या प्रकारे उमटला. ज्या आदर्श प्रपंचाचे वर्णन श्री नेहमी करीत; असा संसार पंतांचा होता हे निश्चित होय. अशा आदर्श संसारामध्ये अध्यात्मद्दष्टया अत्यंत निरोगी वातावरण असते. त्या वातावरणामध्ये श्रींची पहिली अकरा वर्षे गेली. प्रपंचात दक्षतेने व आपले वजन ठेवून वागणे, कोणाचे अंतःकरण न दुखवणे, भगवंताला कधी न विसरणे, पुष्कळ लोकांना जेवायला घालणे, पुष्कळ लोकांना पैसे देणे व ते परत न आले तरी खंत न बाळगणे इत्यादि अनेक गुण लिंगोपंतांपासून आनुवंशिकतेने श्रींच्या ठिकाणी आले आणि ते सगळे परमावधीला पोचले. आजोबा व आजी गेल्यानंतर रावजी प्रपंचामध्ये कामापुरते पहात, परंतु त्यांचे खरे लक्ष जपामध्ये असे.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली