Get it on Google Play
Download on the App Store

"मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला.

१८८०
"मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला.
त्याने फक्त एका नमावर पूर्ण निष्ठा ठेवली. त्याचे फळ म्हणून ही योग्यता त्याला प्राप्त झाली."
श्री उज्जैनला काही दिवस राहिले. श्री तेथे आहेत हे समजताच जीजीबाई तेथे आली व श्रींना मोठया हटटाने आणि आग्रहाने इंदूरला घेऊन गेली. पूर्वीचा गवळी श्रींना तेथे भेटला. त्याने सत्तरी ओलांडली होती व त्याची बायको पण वारली होती. एकदा श्रींना त्याने आपल्या घरी नेले, त्यांची पूजा केली व म्हणाला, "महाराज, मला आता किती दिवस ठेवणार ? आपल्या हाताने या देहाची राख व्हावी अशी इच्छा आहे." त्यावर श्री म्हणाले, "राम तुझी इच्छा पूर्ण करील." नंतर एका आठवडयाने पहाटे चार वाजता श्री उठले व भर थंडीत उघडेच गवळ्याच्या घरी गेले, तो जागा असून श्रींचीच मानसपूजा करीत आपल्या अंथरूणावर बसला होता, मानसपूजा करीत आपल्या अंथरुणावर बसला होता, मानसपूजेत त्याने घटट दही श्रींच्यासमोर ठेवले व ’श्री आत्ता असते तर किती बरे झाले असते ! असा विचार त्याच्या मनात आला तोच श्रींची स्वारी प्रत्यक्ष त्याच्यासमोर उभी राहायला एकच गाठ पडली. त्याच्या खांद्यावर हात ठेवून श्री म्हणाले, "माझे दही कुठे आहे ते आण बघू !" त्याने डोळे उघडले तर आपल्या डोळ्यांवर त्याचा विश्र्वासम बसेना. मोठया आनंदाने श्रींना त्याने आपल्या अंथरुणावर बसवले व आपली खरी पूजा ग्रहण करण्याची विनंती केली. सूर्योदय झाल्यावर त्याच्या मुलाने श्रींना स्नान घातले. नंतर श्रींनी स्वतः गवळीदादाला स्नान घातले. स्नान आटोपल्यावर त्याने श्रींची अगदी मनापासून पूजा केली. त्यांना घटट दह्याच नैवेद्य दाखवला. श्रींनी थीडे दही तोंडाला लावले, थोडेसे गवळीदादाला म्हणाले, "भगवंताने तुझा प्रपंच आता कडेला लावला आहे, त्याच्यापाशी मागण्यासारखे आता काही उरले नाही. म्हणून त्याच्या चरणावर मस्तक ठेवावे आणि त्या चरणांसकट ते उचलावे," तेव्हा "जी महाराज " असे बोलून गवळीदादाने श्रींच्या पायावर डोके ठेवले व पुन्हा वर उचललेच नाही. श्रींचे त्याला मांडीवर घेतला, त्याच्या कुडीतून प्राण निघून गेले होते. श्रीने त्याच्या मुलांना व इतर मंडळींना सांगितले, "गवळीदादा गेल्याचे दुःख करू नका, मोठमोठया तपस्व्यांना साधणार नाही असा अंतकाळ त्याने साधला आहे. त्याने फक्त एका नामावर पूर्ण निष्ठा ठेवली. त्य निष्ठेचे फळ म्हणून ही योग्यता त्याला प्राप्त झाली. माझ्यावर त्याचे खरे प्रेम होते." श्रींनी स्वतः आपल्या हाताने त्याची उत्तरक्रिया केली व अस्थि गंगेमध्ये टाकल्या. श्री जीजीबाईकडेच राहत हेते. त्यावेळी जीजीबाईची मुलगी ताई, हिचे लग्न होऊन ४/५ वर्षे झाली होती व तिला दिवस गेले होते. प्रकृती फार अशक्त, रक्तक्षयाची लक्षणे तिच्या ठिकाणी दिसू लागली. श्री तिला म्हणाली, "ताई, तुला श्र्वास घ्यायलाही श्रम होत आहेत, तुझ्या अंगात रक्त राहिलें नाही, मला फार काळजी वाटते." त्यावर ताई म्हणाली, "महाराज आपण माझ्याजवळ जोपर्यंत आहात तोपर्यंत मला भीती वाटत नाही, मी सारखे नामस्मरण करते." पुढे आठ दिवस गेल्यावर एके दिवशी दुपारी ताईचे पोट दुखू लागले, रात्री जोराने कळा येऊ लागल्या; तेव्हा तिने श्रींना निरोप पाठविला की, "मला लवकर सोडवा " त्यावर श्री जीजीबाईना म्हणाले, "जीजीमाय, आजमाझी कंबर फार दुखते आहे, मला पांघरायला एक घोंगडं दे." घोंगडी पांघरून श्री कण्हत बसले. तिकडे ताईच्या कळा एकदम थांबल्या. पाच मिनिटांनी घोंगडीमध्ये "टयाँ, टयाँ ’ असा तान्हे मूल रडण्याचा आवाजऐकू आला. जीजीमाय म्हणाली,"महाराज, इथे कोण रडत
आहे ?" श्रींनी घोंगडी बाजूला केली आणि म्हणाले, "ताईचे मूल इकडे कसे आले, जा लवकर तिकडे घेऊन जा." जीजीमायने मूल उचलले व सरळ ताईकडे नेले. ताई बेशुद्धच होती. तिने डोळे उघडताच पहिला प्रश्र केला "महाराजकुठे आहेत ?" ते माझ्याजवळ सारखे बसून होते. त्यांनी बाळाला माझ्या हातात दिले व मला जाग आली." श्री नंतर तिच्या खोलीत गेले व म्हणाले, "बाळ, आता तुला घाबरण्याचे कारण नाही, स्वस्थ विश्रांती घे व जमेल तेवढे नाम घे." श्रीमहाराजखोलीबाहेर आले. जीजीमायच्या डोळ्यांना आनंदाश्रू आवरेनात.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली