Get it on Google Play
Download on the App Store

मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते.

१८९२
मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते.
थोरले श्रीराममंदिर बांधल्यावर श्री गोंदवल्यासच कायम वास्तव्यास असत. कर्‍हाड येथील दुसंगे आडनावाची एक विधवा स्त्री आपल्या वीस वर्षांच्या मुलाला घेऊन श्रींच्याकडे आली. बाप लहानपणीच वारल्यामुळे मुलगा कोणाचा धाक न राहिल्याने व्यसनी बनला. श्री मुलाला जवळ घेऊन म्हणाले, "बाळ, तुझ्या बापाला बरेच वर्षांपूर्वी पाहिले होते. मला तुझ्याविषयी प्रेम वाटते. तू माझ्या सांगण्याप्रमाणे वागलास तर राम तुझे कल्याण करील. रोज आईच्या पाया पडत जा. आई सांगेल तसे वागण्याचा निश्चय कर." श्रींच्या प्रेमाने ओथंबलेल्या शब्दांनी त्या मुलावर परिणाम होऊन, तो मुलगा चांगला वागू लागला. पुढे चार महिन्यांनी आईचा अंतकाळ जवळ आल्यावर तिने मुलाला श्रींच्या पदरात घातला व ती शांतपणे समाधानात गेली. काही दिवस मुलगा चांगला वागला पण नंतर पुन्हा बाहेरख्यालीपण करू लागला. एके दिवशी रात्री मुलगा प्रसादाच्या वेळी न दिसल्याने श्रींनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ओढयाच्या काठी एका स्त्रीबरोबर झोपलेला पाहिला. श्रींनी आपली कफनी त्या दोघांवर घातली व नंतर मंदिरात आले. पहाटे गार वारा सुटल्यावर मुलाला जाग आली. अंगावरचे पांघरूण पाहिले तर श्रींची कफनी त्याला दिसली. त्याला आपलीच लाजवाटली. ओढयावर स्नान करून कफनी घातली व श्री उठण्याच्या आधी मंदिरात श्रींच्या खोलीसमोर जप करीत उभा राहिला. श्री उठल्यावर लगेच त्याने श्रींना साष्टांग नमस्कार घातला व मान खाली घालून उभा राहिला. त्यावर श्री त्याला म्हणाले, "जा बाळ, गिरनारवर बारा वर्षे नामस्मरण कर, तुझे काम होईल." पुढे श्री आईला घेऊन काशी यात्रेस गेले त्यावेळी तो मुलगा काही दिवस त्यांच्याबरोबर होता व नंतर नैमिष्यारण्यात निघून गेला. श्री गोंदवल्यास राहू लागल्यावर कोणी ना कोणी रोज श्रींना भेटण्यास येत. भिकाजी श्रीपत नावाचे फौजदार श्रींना भेटायला आले तेव्हा त्यांनी बरोबर बत्ताशा नावाचा सुंदर व मस्त असा घोडा आणला होता. तो त्याने श्रींना अर्पणा केला. घोडा खटयाळ होता, श्रींशिवाय कोणाला तो दाद देत नसे. श्री एक दोन दिवसांनी त्याच्यापाशी जात, पाठीवर थाप मारून त्याच्याशी चार शब्द बोलत. अनेक वेळा त्याच्या पाठीवर बसून चांगले लांब फिरवून आणीत. श्री त्याच्यावर बसले म्हणजे त्याची तब्येत खुश होऊन तो वार्‍यासारखा धावे. श्रींचे एक शिष्य शाहूराव चिवटे हे एकदा श्रींना विचारून बत्ताशाला आपल्या घरी घेऊन गेला. पण तेथे गेल्यावर घोडयाने दाणा खाल्ला नाही व पाणीही घेतले नाही. तीन दिवस त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा येत होत्या. हे पाहून चिवटयांनी बत्ताशाला परत आणला. श्रींना पाहिल्याबरोबर घोडे फुरफुरू लागले. श्री त्यांच्याशी बोलले, त्याला थोपटले तेव्हा घोडे शांत झाले. श्रींनी हाताने त्याला दाणा चारला. पाणी पाजले व त्याच्या जागेवर बांधले. त्या वेळेपासून बत्ताशाला लोक पूज्य समजू लागले. गोंदवल्यापासून दहा कोसांवर असणार्‍या गावी एका सुखवस्तू कुटुंबाची बरीच शेती होता. जनावरेही होती. पुढे परिस्थिती खालावली. मालकाने जनावरे काढण्यास प्रांरभ केला. त्याच्यापाशी एक लंगडी गाय होती. ती श्रींना देण्याविषयी एकाने सुचविले, त्याप्रमाणे त्याने गोंदवल्यास गाईला आणले, श्रींनी तिला आपल्यापाशी ठेवून घेतली. पुढे दोन वर्षांनी परिस्थिती सुधारल्यावर तो गाईला नेण्यासाठी गोंदवल्यास आला. श्री गाईजवळ गेले व तिच्याशी बोलले, "गंगे, हे बघ तुला नेण्यासाठी आले आहेत. त्यांच्याबरोबर आनंदाने जा." लगले, श्रींच्याकडे तिने दीनवाणीने पाहिले व जाण्याची इच्छा नाही. तुमची संमती असेल तर तिला मी मुलीप्रमाणे सांभाळीन. तिला इथेच ठेवून जा." त्याने आनंदाने संमती दिली. गंगीचे श्रींच्यावर इतके प्रेम होते, की श्रींना पाहिल्याबरोबर दावे सोडण्यास हिसकावणी करू लागे, मोकळी सोडल्याबरोबर ती श्रींच्या मागेमागे जाऊ लागे. श्रींनी कुरवाळून तिच्याशी थोडे बोलले की मगच ती गोठयात जाई. मुक्या जनावरांचे सुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली