Get it on Google Play
Download on the App Store

"गीतेचा नववा अध्याय वाचीत जा "

१८७०
"गीतेचा नववा अध्याय वाचीत जा "
एकदा श्री दुपारी चार वाजता मारुती मंदिरात आले. त्यावेळी भाऊसाहेब केतकर म्हसवडला पगार वाटण्यासाठी जात असता वाटेत गोंदवल्याच्या मारुतीमंदिरात श्रींना भेटले. श्रींना पाहून भाऊसाहेबांनी उठून त्यांचे स्वागत केले. त्यावेळी श्रींनी डोक्याला गणेशटोपी, कपाळाला मोठे केशरी गंध, अंगात कफनी, हातात माळ व पायात खडावा असा वेष धारण केला होता. श्रींनी त्यांची चौकशी केली व सांगितले, "मी या गावचा कुलकर्णी आहे, गावात कोणी आला तर त्याच्या जेवण्याखाण्याची सोय करणे हे माझे कर्तव्यच आहे." त्यावेळी बर्‍याच गप्पा झाला. दुसरे दिवशी श्री सकाळी भाऊसाहेबांच्याकडे पुन्हा आले, त्यावेळी ते गीतेचा अध्याय वाचण्याच्या बेतात होते. श्रींनी विचारले, "तुम्ही देवाधर्माचे काय करता ?" त्यावर भाऊसाहेब म्हणाले, "विशेष काही नाही, दोन वेळा संध्या करतो आणि गीता वाचतो." त्यावर श्री म्हणाले, "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा." त्यानंतर भाऊसाहेब पुन्हा गोंदवल्यास आले व श्रींना भेटले. श्री म्हणाले, "आजाआपण माझ्याकडे जेवायला या." त्यावर भाऊसाहेब म्हणाले, "मीच आपल्याला जेवायला बोलावणार होतो, माझ्याकडे स्वयंपाकी असतो." त्यावर श्री म्हणाले, "छे, छे आपणच माझ्याकडे आले पाहिजे. भाऊसाहेबांचा नाईलाज झाला व ते श्रींच्याकडे जेवायला गेले. जेवणखाण होऊन विश्रांति झाल्यावर भाऊसाहेब म्हसवडला जाण्यास निघाले. श्री तेथे आले व म्हणाले,
"आपण आता कोठे जाणार ?" भाऊसाहेब म्हणाले, "मी म्हसवडला जायला निघालो आहे." श्री त्यांना म्हणाले, "तुमच्या टांग्यात एका माणसाची जागा आहे का ? आणखी कुणी येणार आहे का ?" भाऊसाहेब म्हणाले, "नाही." त्यावर श्रींनी विचारले, "मी आपल्याबरोबर येऊ का ?" त्यावर भाऊसाहेब म्हणाले, "चला माझी हरकत नाही." त्यानंतर श्री भाऊसाहेबांना म्हणाले, "मला नेण्यासाठी तुम्ही माझ्या आईची परवानगी काढा, ती बघा दारातच उभी आहे." भाऊसाहेब गीताबाईला विचारण्यास गेले, त्याबरोबर गीताबाई एकदम कडाडल्या, "अहो, तो एकदा बाहेर गेला तर ९ वर्षांनी परत आला, त्याला परत आणून सोडण्याची खात्री देत असाल तर तुम्ही घेऊन जा." श्री जवळच उभे होते. त्यांच्याकडे पहात भाऊसाहेब बोलले, "बघा बुवा, तुमची आई तर असे म्हणते "
त्यावर श्री म्हणाले, "छे, छे तसे होणार नाही, मी २/३ दिवसात आपल्याबरोबर परत येईत." आईला नमस्कार करून श्री भाऊसाहेबांच्याबरोबर जाण्यास निघाले. म्हसवडला पोचल्यावर श्री म्हणाले, "माझ्या ओळखीची मंडळी येथे आहेत, त्यांच्याकडे मी उतरायला जातो." असे सांगून श्री निघून गेले व तेथून पंढरपूरला गेले. पंढरपूरहून श्री दोन दिवसांनी गोंदवल्यास आले.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली