Get it on Google Play
Download on the App Store

जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते.

१८८६-८७
जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते,
असे अक्षरशः रात्रंदिवस ते घोकीत असत.
श्री गोंदवल्यास स्थिर राहू लागल्यावर पुष्कळ प्रपंची लोक आपली बायका माणसे घेऊन त्यांच्या दर्शनाला व गोंदवल्यास राहण्यासाठी येऊ लागले. पंढरपूरचा रस्ता गोंदवल्यावरून असल्याने अनेक साधू, संन्यासी, बैरागी लोक जाता - येता गोंदवल्यास मुक्काम करीत. भिक्षेची व पाण्याची सोय जेथे चांगली असेल तेथे हे लोक वस्तीला रहात. याशिवाय पंढरीला जाणारे पुष्कळ वारकरीसुद्धा गोंदवल्यास एक रात्र राहून पुढे जात. या सर्व लोकांचा परामर्श श्री घेत असत. हे लोक अर्थात गावच्या मारुतीमंदिरामध्येच उतरत. अगदी बालपणापासून श्रींची रामरायावर पराकोटीचा अनुराग होता. श्रीरामचंद्रांच्या चरणी त्यांची वृत्ती इतकी तन्मय झालेली होती की, जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायांच्या इच्छेनेच घडत असते असे अक्षरशः रात्रंदिवस ते घोकीत असत. "अमुक एक गोष्ट मी केली " या वाक्याने श्रींनी आपली जीभ कधी विटाळली नाही. कोणी काही विचारले असता "राम काय करील ते खरे" किंवा "रामाच्या इच्छेने जे घडेल ते खरे " हेच त्यांचे सुरुवातीचे आणि शेवटचे सांगणे असे. गोंदवल्यास श्रींच्या घरातील जागा अपुरी पडू लागली. शिवाय तेथे राहण्यासाठी येणार्‍या प्रापंचिक लोकांना उपासनेचे केंद्र आवश्यक होते, म्हणून आपल्या घराच्या समोरच्या भागामध्ये त्यांनी रामासाठी प्रशस्त राममंदिर बांधण्याचे ठरविले. मंदिराचा नकाशा श्रींनी स्वतःच तयार केला. प्रत्यक्ष काम करणार्‍या गवंडी, सुतारापासून तो दर्शनास येणार्‍या कोणाही सामान्य माणसापर्यंत प्रत्येकजण आपली अक्कल चालवून फरक सुचवीत असे. श्रीदेखील प्रत्येकाच्या सूचनेला मान डोलवीत. प्रत्यक्ष बांधण्याच्या वेळेस मात्र आपल्याला पाहिजे तसे करवून घेत. मंदिर बांधण्याच्या कामी श्रींनी गावातलेच गवंडी व सुतार यांना बोलावले. श्रींच्याजवळ साठलेले द्रव्य मुळीच नव्हते आणि त्यांनी कधीही कोणाजवळ पैशाची याचना केली नाही, परंतु रोज त्यांच्या दर्शनाला येणारे लोक आपण होऊन त्यांच्या समोर जे द्र्व्य ठेवीत त्याच्यावर सर्व व्यवहार चाले. एकदा असा प्रसंग आला. की, गुरुवारचा दिवस उजाडला. कामावरच्या माणसांना आठ दिवसांची मजुरी द्यावयाची होती. दगड, माती, चुना संपला होता आणि श्रींनी आदले दिवशी सर्व गावकर्‍यांना जेवण घातल्यामुळे त्यांच्यापाशी एकही पैसा खोलीसमोर जमा झाले. श्रींनी आपली कफनी झाडून दाखविली आणि म्हणाले, "अरे गोसाव्याजवळ पैसे कुठले आले ! मला कोणी देईल तेव्हा मी तुम्हाला देणार." तो बाजाराचा दिवस असल्याने मजुरांना, "आताची भाकरी मीच तुम्हाला देतो, ती खाऊन तुम्ही इथेच नामस्मरण करीत बसा. पाहू राम काय करतो ते." दुपारी ३॥ च्या सुमारास म्हसवडचे बापूसाहेब माने श्रींच्या दर्शनाला आले. ऊस विकून झालेला फायदा श्रींना अर्पण करायचे ठरवून रु. १०१ श्रींच्या पुढे ठेवून प्रसाद घेऊन निघून गेले. ते गेल्यावर श्रींनी मजुरांना त्यांची मजुरी देऊन टाकली व दगड, माती, चुना आणण्यासाठी मुकादमाजवळ पैसे दिले. श्री म्हणाले, "रामरायाने आपली लाजराखली."

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली