Get it on Google Play
Download on the App Store

"आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल."

१८८८-८९
"आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल."
श्रींनी मंदिर बांधण्यास आरंभ केला खरा, पण मूर्तींच्या विषयी काहीच खटपट दिसेना, म्हणून लोक त्यांना मूर्तिंच्याबद्दल विचारीत, तेव्हा श्री उत्तर देत, "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपण होऊनच येईल." याप्रमाणे गोंदवल्याचे मंदिर बांधण्याचे काम चालू असता, तडवळे या गावी निराळाच प्रकार घडला. त्या गावचे कुलकर्णी मोठे श्रीमंत असून भाविक होते. त्यांच्या मनात रामाचे मंदिर बांधावे असे येऊन त्यांनी त्यासाठी पुष्कळ पैसा साठवला होता. तसेच त्यांनी राम, लक्ष्मण व सीता अशा तीन मूर्ती करवून आपल्या घरी आणून ठेवल्या होत्या. बराच पैसा जमल्यावर कुलकर्ण्यांनी मोठा व सुरेख वाडा बांधला. परंतु दुर्दैवाने एके दिवशी त्याला आग लागून सगळा वाडा भस्मसात झाला. आगीमध्ये मूर्तींना पण थोडीशी झळ लागली. काही दिवस गेल्यावर त्या कुलकर्ण्यांना लागोपाठ तीन दिवस स्वप्नामध्ये त्यांनी करवून आणलेली रामची मूर्ति येई आणि त्यांना सांगे "मला तू इथे किती दिवस कोंडून ठेवणार ? मला गोंदवल्यास ब्रह्यचैतन्यांकडे नेऊन दे." याच सुमारास त्यांना कळले की गोंदवल्यास श्रीमहाराजमंदिर बांधीत आहेत म्हणून त्यांनी आपण होऊन तिन्ही मूर्ति श्रींना गोंदवल्यास आणून दिल्या. ज्या दिवशी मूर्ति आल्या त्या दिवशी रविवार होता. सकाळी उठल्याबरोबर श्री म्हणाले, "आजकोणीतरी मोठे पाहुणे आपल्या घरी येणार असे मला वाटते, म्हणून आजाआपण सगळेजण उपवास करून भजन आणि नामस्मरण करू." त्यांच्या सांगण्यावरून सर्वांनी स्नाने आटोपून घेतली. फराळासाठी दाण्याची उसळ व उकडलेल्या रताळ्याच्या फोडी केल्या होत्या. श्रींनी स्वतः आपल्या हाताने मजुरांसकट सर्व लोकांना फराळाचे दिले. आपण मात्र नैवेद्याचे वाटीभर दूध तेवढे घेतले. दुपारी एक वाजता श्री भजनाला उभे राहिले. दोन तास सुंदर भजन झाल्यावर श्रींनी दोन माणसांना रस्त्यावर जाऊन बसण्यास सांगितले व कोणी येताना दिसल्यास लगेच वर्दी देण्याचे सूचित केले. संध्याकाळी चार वाजता दोन गाडया येताना दिसल्या, त्यांची विचारपूस करता ते तडवळचे कुलकर्णी असून श्रींना देण्यासाठी मूर्ती घेऊन आले आहेत असे कळले. ही बातमी श्रींना पोचल्यावर लगेच "जयजय श्रीराम " घोष करीत ते सर्व मंडळींसह श्रीरामरायाला सामोरे गेले. श्रींनी स्वतः मूर्तीवरून भाकरी ओवाळून टाकली, आणि मोठया प्रेमाने भजन करीत सर्व मंडळी घरी आली. दुसर्‍या दिवशी त्यांनी उपवासाचे पारणे केले आणि कुलकर्ण्यांना निरोप दिला. पुढे श्रींनी एका चांगल्या कारागिराकडून तिन्ही मूर्तींना उजाळा दिला व त्यांचे जळकेपण पुष्कळ कमी करून घेतले. पुढे श्रींनी म्हासुरर्णेकर शास्त्रीबुवांच्या संमतीने मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त ठरविला. बापूसाहेब माने यांना सिंहासन तयार करण्यास सांगितले. अशा रीतीने श्रीरामरायांच्या मूर्ती स्थापनेची सर्व तयारी जवळजवळ पूर्ण झाली.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली