Get it on Google Play
Download on the App Store

शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात.

१९०६
शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात.
हर्द्यास या मुक्कामात हर्दा गावात प्लेगची साथ खूप फैलावू लागली. त्यामुळे हर्दा राममंदिराचे विश्वस्त काशीनाथ भैय्या यांच्या मळ्याशेजारच्या शेतात सर्वजण झोपड्या बांधून राहण्यास गेले. श्रीही बरोबरच्या मंडळींसह तेथे राहण्यास आले. बाहेरगावच्या मंडळींचीही दर्शनासाठी ये - जा सुरुच होती. प्रोफेसर भानू, चौंडेबुवा वगैरे मंडळी येथेच श्रींना भेटली. एकदा तेथे स्वयंपाक करणार्‍या बायका श्रींना भेटल्या व म्हणाल्या, " महाराज, आज नैवेद्याला भाजी नाही," श्री एकदम म्हणाले, "तुम्ही एवढ्या उशीरा का सांगता  ? श्रींनी लगेच माळ्याला बोलावून घेतले. त्याने सांगितले, "मळ्यात आता कोणतीही भाजी नाही, वांगी लावली आहेत पण फक्त फूल धरले आहे, अजून फळ लागले नाही." त्यावर श्री म्हणाले," असे कसे होईल, फुले आहेत तेथे फळ असलेच पाहिजे." असे बोलून ते मळ्याकडे निघाले व जयराम माळ्याला पोते घेऊन बोलावले. वांग्याच्या रोपाकडे पाहून श्री म्हणाले, " अरे, त्या पानाखालीपहा," जयरामने पान बाजूला केल्यावर मोठे वांगे दिसले. अशा तर्‍हेने प्रत्येक वांग्याच्या फुलापानाखाली श्रींनी पोते भरुन वांगी जमा केली. जयराम स्वत: माळीच असल्यामुळे हा प्रकार पाहून थक्कच झाला. त्या दिवशीचा भाजीचा प्रश्न श्रींनी त्वरित सोडवला. श्रींना भेटायला येणार्‍यांमध्ये दामुअण्णा नावाचा एक मोठा वेदांती होता. आपल्या सर्व शंका श्रींना विचारुन घ्याव्या असे वाटल्यावरुन श्री निरुपणाला बसले म्हणजे श्रींच्या जवळ तो बसत असे. श्री एखादी ओवी निरुपणासाठी घेत व आपणच शंका उत्पन्न करुन त्यांची उत्तरे देत. अशा रीतीने सर्व शंकांची उत्तरे मिळालावर श्रींचे आभार मानून तो निरोप घेण्यास आला व म्हणाला, "महाराज माझ्या सर्व शंकांची उत्तरे मिळाली. माझे समाधान झाले." श्री म्हणाले, " शंका फार चिवट असतात. त्या आचरणाने व अनुभवाने नाहीशी होतात. म्हणून मनात शंका असल्या तरी नाम सोडू नये. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. हर्द्याहूनच श्री अयोध्य्ला गेले व तेथून पुढे नैमिषारण्यात गेले. नानासाहेब पेशवे यांना "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन" असे वचन दिले असल्याने श्री तेथे त्यांच्याकडे गेले. नानासाहेबांचे वय ८२ च्या आसपास होते, कफ खूप झाला होता, तापही येत होता, ताप काही उतरेना. तेव्हा ते डोळ्यात प्राण आणून श्रींची प्रतीक्षा करीत होते. श्री जेव्हा त्यांच्यापाशी आले तेव्हा त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहू लागले. श्री त्यांना म्हणाले, " आपण जिंकले आहे, आता सतत नामात रहा. भगवंत आपल्या उशाशी आहे." श्रींनी त्यांना मांडीवर घेतले. तोंडात गंगा घातली. नंतर डोळे उघडून त्यांनी सर्वांना नमस्कार केला व "हे राम, महाराज, रामा चल मी येतो." असे बोलून देह ठेवला. श्रींनी स्वत: त्यांना अग्नि दिला व त्यांच्या अस्थि प्रयागला स्वत: गंगेत टाकल्या. त्यांचा अंतकाल १ नोव्हेंबर झाला असावा. साधारणपणे ३ आठवड्यांनी श्री नैमिषारण्याहून हर्द्याला परत आले. श्रींच्या बरोबर एक सात्त्विक, देवावर प्रेम करणारा भटजी होता. श्री एकदा सहज म्हणाले, " जो मनुष्य ३॥ कोटी रामनामाचा जप करील त्याला भगवंताच्या प्रेमाचा अनुभव आल्याखेरीज राहणार नाही." भटजीने हे ऐकून त्रयोदशाक्षरी मंत्राचा जप सतत सुरु केला. त्याला देवाची स्वप्ने पडत व श्री स्वत: स्वप्नात दिसत. जपसंख्या पूर्ण झाल्यावर तो श्रींना सारखा म्हणे," मला देव दाखवा." श्रींनी त्याला पुष्कळ सांगून पाहिले की,"देवाचे दर्शन होते म्हणजे काय होते, देवाच्या प्रेमाचा अनुभव कसा असतो" परंतु त्याच्या मेंदूवर ताण पडल्याने त्याला विचारशक्तीच उरली नाही. एक दिवस तो श्रींना म्हणाला, "मला देव दाखवा त्याशिवाय मी अन्न घेणार नाही, विहिरीत जीव देईन." श्री मग त्याच्याकडे गेले व पायातील खडावा त्याच्या कपाळावर, डोल्यावर हाणल्या, त्याबरोबर त्याच्या डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. श्रींनी त्याला पोटाशी धरले व म्हटले," त्याच्या डोळ्यातून पाणी आले नसते तर हा वेडा झाला असता. भगवंत हा हट्टाने व कष्टाने साध्य होत नाही. तो एका प्रेमानेच वश होतो. परमार्थ हा आपोआप वाढावा, त्याला ताण देऊन वाढवू नये."

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली