Get it on Google Play
Download on the App Store

"तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक "

१८५८
श्रीरामकृष्णांनी त्यांना पोटाशी धरले आणि "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " असे बोलले.
अक्कलकोटहून श्री निघाले ते हुमणाबादला श्रीमाणिकप्रभूंच्या दर्शनासाठी गेले. इ. स. १८२१ मध्ये जन्मलेले श्री माणिकप्रभू जन्मापासूनच सिद्ध पुरुष होते. साक्षातू दत्ताचा त्यांना अनुग्रह होता. यांच्या कुलात नृसिंहाची उपासना होती. अंतर्यामी अगदी विरक्त पण राजाला शोभेल अशा थाटात ते रहात. घरात खूप अत्रदान होई. भजन फारच प्रेमळ असे. हिंदु मुसलमान दोघांनाही त्यांनी भगवंताच्या मार्गाला लावले. गावाच्या बाहेर जाऊन ते श्रींची वाट पहात जेवण्यासाठी  थांबले. ’आजमाझा भाऊ येणार आहे असे मंडळींना त्यांनी सांगितले.’ श्रींना पाहिल्याबरोबर दोघांनाही भरून आले ते श्रींना घरी घेऊन आले. थोडे दिवस ठेवून घेतले. ’योग्य वेळी तुझे काम होईल ’ असे सांगून श्रींना त्यांनी निरोप दिला. तेथून श्री अबूच्या पहाडाकडे जाण्यास निघाले. ’दाट जंगलामुळे सामान्य माणसास तेथे जाणे अशक्य असे. श्री तसेच जंगलात शिरले. दोन दिवस हिंडल्यावर तेथे एक गुहा दिसली. श्री निर्भयपणे आत शिरले, थोडेसे आत गेल्यावर एका दगडाच्या चबुत‍‍र्‍यावर एक योगिराजद्दष्टीस पडले. श्रींनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला व समोर उभे राहिले. योगीराजांनी डोळे उघडून श्रींना विचारले, "बाळ, तू एवढा लहान असून येथे कसा आलास ?" त्यावर ’आपल्या दर्शनासाठी आलो " असे श्रींनी सांगितले. तेथे काही दिवस राहून श्री योग शिकले. त्यांच्या जवळची विद्या संपल्यावर श्री काशीकडे रवाना झाले. काशीला तेलंगस्वामी नावाच्या थोर सत्‍पुरुषांची गाठ पडली. आईच्या मृत्युनंतर ते प्रपंचातून बाजुला होऊन योगाभ्यासाने पूर्ण पदाला पोचले होते. काशीमध्ये ते अवधूत वृत्तीने राहात. त्यांनी श्रींनी आपल्यापाशी काही दिवस ठेवून घेतले. श्री मोठयाने नामस्मरण करू लागले की, ते कावरेबावरे होऊन त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहत असे. स्वामींनी श्रींना आशीर्वाद दिला व म्हणाले, "तुझे काम लवकर होईल आणि ते तुझ्या मनासारखे होईल " काशीहून श्री निघाले आणि अयोध्येला आले. तेथे त्यांना कळले की, नैमिषारण्यात अनेक योगी तपश्चर्या करीत बसलेले आहेत. श्री लगेच तिकडे जाण्यास निघाले. दिवसा बारा वाजता रात्रीसारखा अंधार असायचा, वाटेत मोठे अजगर आडवे पडलेले असत. दोन फडे असलेले नाग श्रींना तेथे दिसले श्री चालले असता बाजूला सरून ते त्यांना वाट करून देत. आहारासाठी तेथे कंद मिळायचे. काही कंदांनी आठ दिवस भूक लागत नसे. तर काही कंदांनी एकवीस दिवस भूक लागत नाही. अरण्यात रानगाई पुष्कळ. त्यांचे दूध बर्फावर सांडून गोठते, त्याच्या वडया बनतात. नैमिषारण्यात श्रींना अधिकारी, तपस्वी पहायला मिळाले. एका मोठया गुहेत श्री शिरले तेव्हा धुनी पेटली होती, तिच्याभोवती सात आसने मांडली होती. सहा आसनांवर तपस्वी धानस्थ बसले होते. आळंदीचे श्रीनृसिंहसरस्वती स्वामी हे महापुरुष या सहा जणांपैकी एक होते. एका योग्याने श्रींना सातव्या आसनावर बसण्यास सांगितले. श्री ध्यानात तल्लीन झाले. तेथे काही दिवस राहून फिरत, फिरत
 श्री बंगालमध्ये आले. तेथे एक मोठा भक्त आढळला. त्याचे अंतःकरण इतके मृदू होते, की भगवंताचे नाम कानावर आले की, तो कावराबावरा होई. त्यांच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागत. श्री एक आठवडा त्यांच्या संगतीला राहिले. मग श्रीरामकृष्णांना भेटण्यासाठी दक्षिणेश्वरला गेले. श्रीरामकृष्ण तेथे नसून ते कलकत्त्याला गेल्याचे समजले. श्रीही कलकत्त्यास आले. रस्त्यातून चालताना समोरून श्रीरामकृष्ण येत आहेत असे पाहून श्रींनी रस्त्यातच त्यांना साष्टांग नमस्कार घातला. श्रीरामकृष्णांनी त्यांना उचलून पोटाशी धरले आणि ’तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " असे बोलले. पुढे कलकत्त्याहून फिरत फिरत दक्षिण हैद्राबादकडे आले.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली