Get it on Google Play
Download on the App Store

प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये.

१८९५
"प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये, परंतु प्रसंग आला तर सर्व
देण्याची तयारी पाहिजे. थोर मनाच्या माणसालाच खरा परमार्थ साधतो."
श्रींचा व्याप झपाटयाने वाढत होता, त्यामुळे दर्शनाला येणार्‍या मंडळींची संख्या खूप वाढू लागली. बाहेर गावाहून येणार्‍या मंडळींना श्री आपण होऊन बरेच दिवस ठेवून घेत, त्यामुळे थोरले राममंदिर अपुरे पडू लागले. म्हणून श्रींनी धाकटे राममंदिर बांधले आणि विशेषतः सहकुटुंब येणार्‍या भक्तमंडळींना उतरण्यास व सामान ठेवण्यास सोयीचे व्हावे म्हणून काही खोल्यादेखील बांधल्या. आपले कुलोपाध्याय चिंतुबुवा यांना गोंदवल्यास आणून राहायला जागा दिली आणि एक शेत पण दिले. धाकटे राममंदिर बांगले त्यावेळी श्रींनी एक गायत्रीपुरश्चरण व रुद्रस्वाहाकार करविला. निरनिराळ्या ठिकाणचे वैदिक विप्र बोलावून त्यांच्याकडून सर्व वैदिक कर्मे यथासांग पार पाडली. सर्वांना भरपूर अन्न, वस्त्र व दक्षिणा देऊन त्यांना यथेचित गौरव केला. आठ दिवस अन्नछत्र ठेवून गोंदवल्यातील व आजुबाजूच्या गावातील लोकांना पोटभर जेवायला घालून तृप्त केले. श्रींनी घरच्या शेतीची वाढ केली. जुनी जमीन साफ करून खत घालून तयार केली. नवीन विहीर बांधली. नवीन जमीन विकत घेतली आणि ती सर्व रामाच्या खर्चाला लावून दिली. या काळात पुष्कळ वेळा श्री स्वतः नांगर हाकणे, जमीन उकरणे, खडे गोटे काढणे, हरळी उपटणे इत्यादि कामे करीत. त्यामुळे बरोबरीच्या मंडळींना - श्रीमंत व शहरी लोकांनाही त्यांच्यासारखे काम करावे लागे. जेवायला रोजबाजरीची भाकरी व तिखट आमटी असायची. कधीकधी कडधान्याची उसळ जोडीला असे. भात फक्त सणावारी मिळायचा. श्रींच्या प्रेमासाठी लहान-मोठे, श्रीमंत-गरीब, विद्धान-अडाणी, स्त्री-पुरुष सर्वजण मोठया आनंदाने कष्ट करीत. जे मिळेत ते आनंदाने खाऊन पुष्कळ दिवस गोंदवल्यास मुक्काम करीत. एकदा मंडळींबरोबर बोलत बसले असता श्री म्हणाले, "परमार्थ साधण्यासाठी मोठी उदारवृत्ती आवश्यक आहे. जो पंत असेल तोच संत बनेल." हे ऐकून एक जणाने विचारले, "महाराज, असे असेल तर गरीब माणसाला परमार्थ कसा साधेल ?" त्यावर श्री म्हणाले, "कां बरे ? गरीब माणूसही-अगदी भिक्षेकरीसुद्धा पंत असू शकतो." "ते कसे काय ? असे त्यांनी विचारले, त्यावर श्री म्हणाले, "केव्हा तरी सांगेन." त्यानंतर ८/१० दिवस गेले. श्री सकाळी लवकर उठले व मंडळींना म्हणाले, "आजमाझ्या गुरूंची - तुकामाईंची पुण्यतिथी आहे, आपण गावात भिक्षा मागून त्यांना प्रसाद करू." श्रींनी आपल्या हातात झोळी घेतली व भजन करीत आणि श्रीसमर्थांचे मनाचे श्लोक म्हणत, बरोबर ५/१० मंडळींना घेऊन श्री भिक्षेला निघाले. प्रत्येक घरासमोर उभे राहून श्री "जय जय रघुवीर समर्थ " असे म्हणत. प्रत्येक घरातून ओंजळभर किंवा माप भरून धान्य एखादा पैसा किंवा आणा, अशी भिक्षा मिळत गेली. सांपत्तिक स्थिती चांगली असलेल्या श्रींच्या समागमासाठी गोंदवल्यास येऊन राहिलेल्या मंडळींना कोणी रुपया, पाच रुपये, दहा रुपये दिले. एकाने तर शंकर रुपये त्यांच्या झोळीत टाकले. याप्रमाणे भिक्षा मागत असताना दुपारचे बारा वाजले. ओढयाच्या पलीकडे राहणार्‍या एका रामदासी बुवाच्या झोपडीपुढे जाऊन श्रींनी ’जय जय रघुवीर समर्थ ’ अशी गर्जना केली. हा रामदासी ३॥ कोटी जपाचे अनुष्ठान करण्यासाठी येऊन राहिला होता. सकाळपासून बारा वाजेपर्यंत तो आपली उपासना करी. त्यानंतर गावात कोरडी भिक्षा मागण्यासाठी तो जाई. चारच घरी भिक्षा मागून जे पीठ येईल ते ओढयातील पाण्यात कालवून तो खाई आणि पुन्हा जप करीत बसे. श्री त्याच्या झोपडीपुढे गेले तेव्हा तो भिक्षा मागून नुकताच परत आला होता. श्रींचा शब्द ऐकल्याबरोबर हातातला झोळी घेऊनच बाहेर आला व सर्व भिक्षा श्रींच्या झोळीमध्ये ओतली व त्यांना साष्टांग नमस्कार घातला. त्याबरोबर श्री म्हणाले, "हा खरा पंत, याच्याजवळ जेवढे होते ते सर्व त्याने झोळीत टाकले. त्याच्याजवळ काही शिल्लक उरले नाही, त्याला आजपूर्ण उपवास घडणार, हा खरा उदार माणूस. हा भिक्षेकरी असला तरी तो पंत आहे. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये ही गोष्ट खरी, परंतु प्रसंग आला तर सर्व देण्याची तयारी पाहिजे हेही खरं. थोर मनाच्या माणसालाच खरा परमार्थ साधतो."

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली