Get it on Google Play
Download on the App Store

"ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त."

१९०२
"ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त."
श्रींची बरीच मंडळी पुण्यात असल्यामुळे श्रींचे पुण्यात येणेजाणे असे. श्रींचा लो. टिळकांशी परिचय होता. श्री पुण्यात आले म्हणजे लोकमान्य एक रुपया व नारळ घेऊन श्रींना न चुकता भेटण्यास येत; त्यांचे बोलणे एकांतात होत असे. एकदा लोकमान्य श्रींना भेटून गेल्यावर श्री बरोबरच्या मंडळींना म्हणाले, " हा पुरुष जबर शक्तीचा आहे. अत्यंत नीतिमान, निर्भय, नि:स्वार्थी व भगवंतावर अत्यंत निष्ठा या गुणांमुळे मला ते फार प्रिय आहेत." लोकमान्य श्रींना एकदा म्हणाले, "आपण राजकारणात का पडत नाही  ? आपल्यासारख्यांचा हातून फार मोठे काम होईल." त्यावर श्री म्हणाले, " प्रारब्धाचा सिध्दांत जरी क्षणभर बाजूला ठेवला तरी अधात्म राजकारणापेक्षा अधिक नाही तरी तितक्याच योग्यतेचे आहे हे तुम्हीच कबूल करता. माझे जीवन मी अध्यात्माला वाहिलेले आहे, म्हणून तुम्ही तुमचे करा, मी माझे काम करतो." प्रोफेसर जिनसीवाले हे अतिशय विद्बान व लोकमान्यांचे परमरस्नेही होते. एकदा दोघांचा "वेदांच्या अपौरुषेय’ संबंधी मोठा वाद झाला. जिनसीवाले वेद पौरुषेय आहेत असे मानीत तर टिळक वेद अपौरुषेय आहेत असे मानीत. अखेर श्रींच्या कडे या वादाचा निकाल देण्याचे काम दोघांच्या संमतीने आले. दोघांनी आपापल्या परीने बाजू मांडली. दोघांचे म्हणणे ऐकून घेतल्यावर श्री म्हणाले, "सामान्य माणूस ज्यावेळी भाषा बोलतो त्यावेळी तो मनात अर्थ योजून शब्दरचना करीत असतो. मनातला अर्थ ज्या शब्दाने बरोबर व्यक्त होईल तोच शब्द आपण वापरतो. परंतु भगवंताची उपासना करणारे जे ऋषी असतात त्यांचे मन अशा एका अवस्थेमध्ये राहते की, त्या ठिकाणी परमात्माच सर्व काही करतो अशी भावना स्पष्टपणे प्रकट होते. भगवंताशी एकरुप होऊन जगण्याची ही अवस्था आहे. ऋषींचा मीपणा नष्ट झालेला असल्याने मी करतो, मी बोलतो, मी काव्य करतो, ही भावना त्याना नसून परमात्मा बोलतो, परमात्मा मंत्र रचतो असा स्पष्ट व खरा अनुभव त्यांना येतो. या थोर अवस्थेत ऋषींच्या तोंडातून वेदमंत्र बाहेर पडले असल्याने ते मानवाची कृती नाही, वेद हे अपौरुषेय आहेत." एवढे बोलून श्री म्हणाले, "टिळकांचे बाकीचे सर्व मुद्दे तुम्हाला मान्य असल्यावर मग वेद हे अपौरुषेय आहेत असे म्हटले तर काय बिघडले  "" त्यामुळे सामान्य जनांचा बुद्धिभेद होण्याचा धोका टळेल आणि आपल्या धर्माची व परंपरेची श्रद्धा टिकायला मदत होईल." असे सांगून हा वाद श्रींनी समाधानकारक मिटविला.
पुढे, पुण्यातील एका नामांकित शास्त्रीबुवांचे व श्रींचे प्रश्नोत्तर रुपाने दोन तास संभाषण झाले. त्याचा सारांश असा
१) आपण स्वत:ला कोण समजता  ?
मी एक हीन, दीन व अज्ञानी असा रामाचा दास आहे.
२) आपण व्यवसाय काय करता  ?
मी रामाचे नाव अखंड घेतो.
३) आपण लोकांना काय उपदेश करता  ?
मी लोकांना उपदेश करीत नाहे, लोकांना आपण होऊन कधी बोलावित नाही, तरी जे लोक माझ्याकडे येतात, त्यांनी मला काहीही विचारले तरी मी त्यांना रामाचे नाव घ्या असेच सांगतो.
४) आपण देव पाहिला आहे का  ?
होय, देव मी पाहिला आहे.
५) तो आम्हाला दाखवाल काय  ?
अर्थात. पण ज्या डोळ्यांनी देव पाहायचा असतो ते डोळे हे नव्हेत, ते म्हणजे आपल्याला देव दिसेल.
६)ज्ञानचक्षू कसे प्राप्त होतील  ?
भगवंताचे नाम घेत गेल्याने.
७) नामस्मरण हे भक्तिमार्गाचे साधन आहे, आपण कोणते श्रेष्ठ मानता ज्ञात की भक्ती  ?
ज्ञात श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही, भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त. ज्ञानामध्ये भगवंतापाशी एकरुपत्व असते म्हणून भक्तीमधून ज्ञान उत्पन्न होते आणि ते भक्तिवरच जगते. खरा भक्त ज्ञानीच असतो.
८) नाम कोणते, कसे घ्यावे?
आपल्या आवडीचे किंवा संतापासून घेतलेले नाम घ्यावे. आपण आपल्या मुलाला जितक्या आपलेपणाने हाक मारतो तितक्या आपलेपणाने देवाचे नाव घ्यावे. शास्त्रीबुवांचे पूर्ण समाधान झाले.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली