Get it on Google Play
Download on the App Store

मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस.

१८५३-५४
मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली
मात्र खरीच वाहिली पाहिजेस.
गणूला आता आठवे वर्ष लागले होते. शाळा बंद झाल्याने घरी श्रींना चैन पडेना. मुलांना घेऊन ते कुणाच्या मळ्यातला ऊस तोडत, कुणाच्या झाडावरील डाळिंबे फस्त करीत, कुणाच्या शेळ्या पळवीत, कुणाच्या भाजीची नासाडी करीत. अशा अनेक तक्रारी संध्याकाळी पंतांच्याकडे यायच्या. पंतांनी श्रींना प्रेमाने जवळ घेऊन सांगावे, "बाळ, आपल्या कुळाचे नांव राहील असे वागावे " त्यावर श्री त्यांना म्हणत "आजोबा, तुम्ही स्वस्थ रहा, माझ्यामुळे कुळाला कधीही कमीपणा येणार नाही." रोज येणा‍र्‍या तक्रारी ऐकून गीतामाय एकदा कंटाळ्ली आणि रात्री श्रींना एकटयाला जवळ घेऊन म्हणाली "गणु, तू असा का रे वागतोस ? तू पुष्कळ विद्या शीक आणि आपल्या घरामध्ये चालत आलेले कुळकर्णीपण नीट सांभाळ, एवढे माझे ऐक. श्री तेवढयाच प्रेमळपणाने आईला म्हणाले, "आई, मी फक्त तुलाच सांगतो; मला सगळे काही येते, तू अगदी काळजी करू नकोस. आपली वृत्ती आणि आपले वतन मी अगदी नीट सांभाळीन." श्रींच्या बोलण्यामध्ये लहानपणापासून अशी खुबी होती की, ते ऐकणा‍र्‍याचा त्यांच्यावर, लगेच विश्र्वास बसे. म्हणून त्यांचे आश्र्वासन ऐकून आईच्या मनाचे पूर्ण समाधान होई व आई लगेच त्यांना पोटाशी धरून त्यांच्या तोंडावरून हात फिरवीत असे शाळा सुटून बरेच दिवस झाले होते, तरी ते घरी स्वस्थ बसत नसत. त्यांचे बालमित्र नेहमी त्यांच्याबरोबर असून रोज काही ना काही खोडया चालायच्या. श्रींना गुंतवून ठेवण्यासाठी ती श्रींना म्हणाली, "हे बघ गणू, तू घरी स्वस्थ बसत नाहीस, यापुढे तू आपल्या गावी रानात चरायला नेत जा." आईने घरच्या गवळ्याकडून गायी काढल्या व श्रींच्या स्वाधीन केला. गावाच्या बाहेर पोचल्यावर गायी-वासरांना, गुराख्यांच्या पोरांबरोबर चरायला मोकळे सोडून सवंगडयांबरोबर खेळ मांडून खेळायला त्यांनी सुरूवात केली. दगडाची छोटीशी भिंत उभी करून तिच्यापुढे तीन दगड मांडायचे, मधला जरा मोठा असायचा आणि त्यांच्या समोर एक दगड ठेवायचा. ते तीन दगड म्हणजे लक्ष्मण, राम व सीता व पुढील दगड म्हणेज मारूतीचा. मुलांच्या. मुलांच्या हातातील काठी म्हणजे वीणा. श्रींची गोरी, गुटगुटीत मनोहर मूर्ती मध्ये असून त्यांच्या भोवती सर्व गोपाळ उभे रहात. मग जोराने भजन म्हणत नाचायला सुरूवात व्हायची. थोडा वेळ भजन म्हणून झाले की, श्री त्या मुलांना भक्तांच्या गोड कथा अगदी प्रेमळपणे सांगत. इकडे, गायी-वासरे चारा खात खात वाटेल तिकडे भटकत, सैरावैरा पळत, शेतांची व मळ्यांची नासधूस करीत. श्री घरी येण्याच्या आतच, "आज आमचा ऊस मोडला, आमच्या मिरच्या तुडवल्या, आमचा जोंधळा खाल्ला अशा तक्रारी घरी येत. गीतामाई म्हणायच्या, "गणू मी आतां कंटाळले बाबा ! रोज लोकांना मी सांगू तरी काय ?" श्री हसू लागल्यावर तिचा राग अनावर होऊन ती श्रींना मारायला धावली व अडखळून पडली. श्रींच्या डोळ्याला पाणी आले. गीतामाईचा राग नाहीसा होऊन ती म्हणाली, "बाळ तू चांगला वागलास तर मी देवाला रामनामाची लाखोली वाहीन." त्यावर श्री म्हणाले "तू पहाच, मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखीली मात्र खरीच वाहिली पाहिजेस." यानंतर श्रींच्या वृत्तीत फार फरक पडू लागला.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली