Get it on Google Play
Download on the App Store

माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही.

१८५०
माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही,
माझ्या दारी अत्रछत्र घालीन.
आजोबांचा सहवास रात्रंदिवस असल्यामुळे ते करतील तसे श्रीमहाराज करीत. या वयापासून ते आजोबांची सेवासुद्धा करू लागले होते. आजोबा गीता म्हणू लागले, की श्री महाराज त्यांच्याबरोबर म्हणू लागत. आजोबा जप करू लागले, की श्रीही आसन घालून डोळे झाकून स्वस्थ बसत. रात्रीचे भजन झाल्याशिवाय श्री कधी निजले नाहीत. भजनामध्ये आजोबा नाचायला लागले की आपणही नाचू लागत. नाचताना इतके तल्लीन होऊन जात की इतर मंडळी कौतुकाने बघत रहात. श्रींची खाण्याविषयी कधीही तक्रार नसे, त्यांना पुष्कळ मित्र होते. गावातील सर्व मुले त्यांची मित्र होती. सर्वांना ते हवेहवेसे वाटत. त्यांचा आवाज गोड व बोलणे प्रेमळ असे, मुले त्यांनी सांगितलेले करीत असत. आपल्या नातवाची परीक्षा घ्यावी असे पंतांनी श्रींना हाक मारली व विचारले, "बाळ गणू, तुला हंडा भरून मोहरा दिल्या तर तू काय करशील ?" श्रींनी ताडूदिशी उत्तर दिले. ’आंधळे, पांगळे, रोगी, गरीब आणि भिकारी यांना मी सगळ्या वाटून टाकीन." यावर आजोबा पुन्हा म्हणाले, "तुला जर राजा केले तर तू काय करशील ?" श्रींनी लगेच उत्तर दिले, "माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. माझ्या दारी अत्रछत्र घालीन." ही उत्तरे ऐकून पंतांच्या डोळ्यांत पाणी आले, थोडया वेळाने ते रावजीला म्हणाले, "रावजी, ही खरी अमृतवल्ली आहे, श्री पांडुरंगाच्या कृपेने ती आपल्याला लाभली आहे. हा कुणीतरी मोठा योगभ्रष्ट पुरुष असावा असे मला वाटते." श्रींची पाचव्या वर्षी मुंज झाली. कुलगुरू सखारामभट पाठक रोज श्रींना ब्रह्यकर्म शिकवण्यास येऊ लागले. २/३ महिन्यांमध्ये संध्या, पूजा, वैश्र्वदेव, पवमान, रूद्र वगैरे सर्व भराभर शिकून झाले. एक दिवस भटजी म्हणाले, "झाले ! तुम्हाला आता ब्रह्यकर्म सर्व आले." श्री म्हणाले, याच्यापुढे काय शिकायचे असते ?" त्यावर भटजी म्हणाले "याच्यानंतर चार वेद, सहा शास्त्र वगैरे शिकायचे असते. "श्री म्हणाले, "मग मला तुम्ही उद्या वेद आणि शास्त्रे शिकवा." त्यावर भटजी म्हणाले, अरे, एकेका वेदाला वीस-वीस वर्षी आणि एकेका शास्त्राला बारा-बारा वर्षें अभ्यास करावा लागतो." हे ऐकून श्री झटूदिशी बोलले "इतका वेळ कुणाला आहे ?" श्रींची बुद्धी फार तीव्र होती, त्यामुळे जो विषय गुरूने त्यास समजावून द्यावा तो ऐकता ऐकताच त्याला इतका समजे की, यास पूर्वीच माहीत असलेला विषय मी शिकविला की काय ? अशी गुरूलाच भ्रांति पडावी. गुरूजी म्हणायचे आजपर्यंत आमचे वय इतके झाले तरी चार वेद नव्हे, एका वेदाची किंवा एका शास्त्राची आम्हाला माहिती असणे मुष्कील, तेथे हा मुलगा सहा शोस्त्रे आणि ती एका दिवसात शिकवा म्हणतो हे पाहून आमचे मन चकित होते, असा मुलगा आम्ही कधी स्वप्नीही पाहिला नाही, हा केवळ महापुरूष निघेल. असे म्हणून गुरूजींनी त्याचा गौख केला. पंतांनाही या गोष्टीची सत्यता उत्तरेत्तर अधिक पटू लागली.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली