Get it on Google Play
Download on the App Store

"माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे."

१८७७
"माय, मला फार भूक लागली आहे,
माझे पोट भरेल एवढे दूध दे."
श्री यात्रेसाठी पंढरपूरला गेले असता तेथे अलिवागहून आलेले श्री. सदुभाऊ लेले नावाचे गृहस्थ भेटले. त्यांनी श्रींना अलिबागला येण्याचा खूप आग्रह केला. काही दिवसांनी श्री अलिबागला गेले, त्यावेळी रात्रीचे अकरा वाजले होते. श्रींनी दारावर थाप मारली त्यावेळी सदुभाऊंची म्हातारी आई जागी होती, तिने झरोक्यातून पाहिले तेव्हा एक तरुण बाहेर उभा असलेला दिसला. तिने आतूनच विचारले, "तू कोण आहेस ?" तेव्हा श्री म्हणाले, "मी सदुभाऊंचा गुरु आहे," त्यावर म्हातारी बोलली, "तू सदुभाऊंचा गुरु असशील, पण मी तुला ओळखत नाही, सदुभाऊ घरी नाही, तू उद्या सकाळी ये." तिचे बोलणे ऐकून श्री तेथेच बाहेरच्या ओटीवर बसून राहिले. साडेबारा वाजून गेल्यावर सदुभाऊ घरी परतले, त्यावेळी श्री ओटीवर स्वस्थ बसलेले त्यांनी पाहिले. साष्टांग नमस्कार घालून "आपण बाहेर का बसला ?" असे श्रींना विचारल्यावर श्री हसून म्हणाले, "अरे तुझ्या म्हातारीने मला घालवून दिले, मी तरी काय करू ?" सदुभाऊंचा आवाजाऐकल्यावर म्हातारीने दार उघडले, तेव्हा आपल्या गुरूंना बाहेर बसवून ठेवल्याबद्दल सदुभाऊ तिला बोलू लागले, त्यावर श्री म्हणाले, "म्हातीरीने केले ते अगदी बरोबर केले, रात्री-अपरात्री खात्री झाल्याशिवाय दार उघडून कुणाला आत घेऊ नये " म्हातारीच्या मनाला ही गोष्ट फार लागली. तिने श्रींची क्षमा मागितली. "झाले गेले सर्व विसरून जा " असे श्री तिला म्हणाले. पण तिच्या मनाला चैन पडेना. एक दिवस ती श्रींना म्हणाली, "महाराज, मी आता ७५ वर्षांची आहे. माझा मुलगा मला चांगले वागवतो, पण मी आता फार थकत चालले आहे, माझी एक इच्छा शिल्लक आहे, ती म्हणजे आपल्या मांडीवर मला मरण येऊ द्या, आपल्याला मी माझा मुलगाच समजते." श्री एकदम म्हणाले, "माय खरीच तुमची तयारी आहे ना ? मग वाट कशाला बघायची चला, आजच निघा " सदुभाऊ व आई दोघेही गडबडले, आई म्हणाली, "असे नाही हो महाराज. मला वाटले ते तुम्हाला सांगून टाकले इतकेच. आजच घाईने नको." त्यावर श्रींनी आईला आश्र्वासन दिले, "माय, तुम्ही तुमच्या अंतःकाळची काळजी करू नका. आजपासून नामस्मरण करू लागा, तुमच्या अंतकाळी श्रीमारुतीराय स्वतः तुम्हाला न्यायला येतील." आईचे फार समाधान झाले. सदुभाऊंचा निरोप घेऊन श्री उत्तरेकडे जाण्यास निघाले. वाटेमध्ये अबूच्या जंगलामधून जात असताना भिल्लांच्या टोळीने त्यांना गाठले व जंगलामधील आपल्या निवासस्थानाकडे त्यांना घेऊन गेले. अनेक प्रकारे त्रास देऊनही हा मनुष्य चिडत नाही हे पाहून एक म्हातारा भिल्ल म्हणाला, "ह मनुष्य साधा दिसत नाही, त्याला त्रास देऊ नका, याच्यापाशी काय सामर्थ्य आहे आपल्याला माहीत नाही, त्याला आधी खायला प्यायला द्या." श्री म्हणाले, "मी नुसते दूध पितो, दुसरे काही खात नाही." त्यावर श्रींची चेष्टा करण्याचे ठरवून एक नाठाळ, वांझ गाय श्रींच्या समोर आणून उभी केली व एक मडके हातात देऊन गायीचे दूध काढून पिण्यास सांगितले. श्री गायीजवळ गेले. तिच्या पाठीवर प्रेमाने थाप मारून ते गायीला म्हणाले, "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." श्रींचा हात लागल्याबरोबर गाय त्यांचे अंग चाटू लागली, तिला धार काढली व पोट भरेल एवढे दूध प्याले. यावर आजूबाजूच्या भिल्ल लोकांच्या तोंडचे पाणी पळाले. म्हातार्‍या भिल्लाने सर्वांच्या वतीने श्रींची क्षमा मागितली. श्रींनी सर्वांना अनुग्रह दिला व चोर्‍या करण्यापासून परावृत्त केले. श्री तेथून पुढे निघून गेले.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली