Get it on Google Play
Download on the App Store

"ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील."

१८७९
"ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले,
त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील."
श्री फिरत फिरत उज्जैनला पोचले. श्री तेथे आले आहेत असे कळताच सर्व पूर्वपरिचित मंडळी श्री जेथे उतरले होते तेथे जमा झाली. नामस्मरण, भजन, कीर्तन, वेदान्तश्रवण व अन्नदान इत्यादी सर्व धुमधडाक्याने सुरू झाले. श्रींवर सर्वांचे प्रेम असल्याने रोजकोणी ना कोणी त्यांना आपल्या घरी बोलावीत असे. श्रींचे तेथील दिवस भराभर जात होते. श्री एके ठिकाणी जेवावयास गेले असता श्रीसमर्थांचे प्रेम असणार एक मोठा सरकारी अधिकारी श्रींना भेटला. श्रींची परीक्षा घेऊनच श्रींना आपल्या घरी बोलवावे असे त्याने ठरवले. थोडया दिवसांनी त्यांचा दहाबारा वर्षांचा मुलगा विषमज्वराने आजारी पडला. औषधपाणी चालू होते. नवव्या दिवशी मुलाची अवस्था फार कठीण झाली. मुलाचा बाप श्रींकडे आला व त्यांना म्हणाला, "आपण उद्या आपल्या सर्व मंडळींसह माझ्याकडे प्रसादाला यावे." श्री म्हणाले, "रावसाहेब, आपण आपल्या शिष्यांपैकी कोणी आमंत्रण केले तर त्याच्याकडे जाता, पण मी बाहेरचा असल्याने आपण माझा अव्हेर करता असे दिसते, हे माझे दुर्दैव आहे." त्यावर श्री एकदम म्हणाले, "छे छे ! रावसाहेब आपण हे काय बोलता ! कष्टी होऊ नका, मी उद्या सर्व मंडळींसह आपल्याकडे येईन." रावसाहेब श्रींना बोलावून घरी आले, त्यावेळी मुलाची नाडी सुटलेली होती व पहाटे तीन वाजता मुलगा गेला. मुलाचे प्रेत तसेच ठेवून त्या गृहस्थाने दुसर्‍या दिवशी भोजनाची सर्व तयारी केली. सकाळी अकरा / बारा वाजता श्री आपली मंडळी घेऊन त्याच्या घरी आले. त्याने श्रींचे मोठे आदरातिथ्य केले. सर्व मंडळी नंतर पानावर येऊन बसली. सर्व पदार्थ वाढले. श्री आपल्या पानावर बसले आणि आता संकल्प सोडायचा, तेवढयात त्या अधिकार्‍याची बायको मुलाचे प्रेत घेऊन, पंक्तीमध्ये आलीव प्रेत श्रींच्यासमोर ठेवून रडत म्हणाली, "महाराज, हा माझा बाळ काल रात्री आम्हाला सोडून गेला, त्याला सोडून तुम्ही कसे जेवता ?" हा सर्व प्रकार पाहून पानावर बसलेली मंडळी गारठून गेली, सबंध वातावरण एकदम बदलून गेले. आता श्री काय करतात इकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. श्रींनी यक्तिंचितही अस्वस्थता न दाखवता त्या मुलाला आपल्या मांडीवर घेतले व त्याच्या छातीवर हात ठेवून आईला म्हणाले, "माय, याच्या अंगात अजून उष्णता आहे, तो गेला नाही, थोडा धीर धरा, त्याला मात्रा चाटवा म्हणजे तो सावध होईल." लगेच मात्रा उगाळून आणली व श्रींनी स्वतः ती मुलाला चाटवली. तसेच देवाचे तीर्थ त्याला देऊन, त्याच्या अंगाला अंगारा लावला. ५/१० मिनिटांनी श्रींनी त्याला हाक मारण्यास सुरुवात केली. तिसरी हाक ऐकल्यावर मुलाने डोळे उघडले व थोडी हालचाल केली. गंभीर वातावरण एकदम नाहीसे होऊन सर्वजण प्रसन्न झाले. रावसाहेब श्रींच्या एकदम पाया पडले व म्हणाले, "महाराज, मी पुष्कळ साधू पाहिले, परंतु आपणासारखा कोणी नाही. आपण प्रत्यक्ष समर्थांचे अवतार आहात, मला आपल्या पदरात घ्या. त्यावर श्री म्हणाले, "मागचे सर्व विसरून जा. आजपासून समर्थांनी तुम्हाला आपले म्हटले आहे; दासनवमीला तुम्ही सर्वजण सज्जनगडावर त्यांच्या दर्शनाला जा. ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचवले, त्याचे नाम कधी विसरू नका, राम मुलाचे कल्याण करील." मुलगी शुद्धीवर आल्यावर श्रींनी त्याला थोडे दूध पाजले, नंतर सर्व मंडळी आनंदाने जेवली.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली