Get it on Google Play
Download on the App Store

"तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले."

१८६४
"तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये
व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले."
श्री काशीच्या वास्तव्यास असताना एका कोटयधीश पुण्यावान व्यापार्‍याची ख्याती होती. पत्रास कुटुंबांचा चरितार्थ त्याच्या जिवावर चालत असे. नवज्वराने त्या व्यापार्‍याला अकाली मरण आले, पत्नी सती जाण्यास निघाली. तेवढयात अयोध्येत भेटलेले रामशास्त्री
( सध्या काशीस वास्तव्यास राहिलेले ) गर्दीतून पुढे आले व त्यांनी त्या पत्नीस श्रींच्या दर्शनास आणले. श्रीं "या पुण्यबान आत्म्यास बघू या " म्हणून मणिकर्णिका घाटावर शास्त्रीबुवांबरोबर आले. तेथे प्रेतास पाहिल्याबरोबर श्री म्हणाले, "हा तर जिवंत आहे, माय तुमचा पति जिवंत असताना तुम्ही सती कशा जाता ? असे म्हणून गंगाजल मागबून तीन वेळा ’श्रीराम ’ म्हणून प्रेताच्या तोंडात घातले. दोन-तीन मिनिटांतच डोळे उघडून तो व्यापारी उठून बसला. जो तो श्रींच्या पाया पडण्यास धडपडू लागला. तेवढयात श्रींनी गंगेत उडी मारली. ( श्रीब्रह्यानंदांनी आरतीमध्ये म्हटलेच आहे, "वाराणसी क्षेत्रादि प्रेतव पदकिसिदावने " ) व तात्काळ नाहिसे झाले. तो व्यापारी मोठया आनंदाने सर्व मंडळींबरोबर घरी गेला. नंतर त्याने पुष्कळ दानधर्म, अत्रदान केले; पण ज्या महापुरुषाने आपले प्राण वाचवले त्याचे दर्शन पुन्हा व्हावे ही तळमळ राहिली. श्री काशीहून निघाले, ते कुठेही न थांबता प्रयागला आले. तेथील काही बैरागी लोक महंताच्या शोधात फिरत होते. श्रींचे वय वीसच्या आसपास, दाढी व जटा वाढलेल्या अंगावर ब्रह्यचर्याचे आणि अध्यात्माचे तेजअशी श्रींची मूर्ती पाहिल्यावर त्या बैरागी लोकांनी त्यांनाच महंत करून टाकले. पुढे ही सर्व मंडळी मथुरा, वृंदावनाकडे गेली. तेथे ज्या बंगाली जमीनदार कुटुंबाला श्रींच्या आशीर्वादाने मुलगा झाला होता, त्या परिवाराच्या संबंधित माणसाची श्रींशी गाठ पडली. त्याने श्रींना सर्व परिवारासह कलकत्त्यास नेले. तेथे जमीनदाराव्या सर्व कुटुंबातील मंडळींनी छोटया मुलाला श्रींच्या पायावर घातले व त्यांचा आशीर्वाद घेतला. "आपली काहीतरी सेवा करावी अशी इच्छा आहे, तर आम्ही काय करू ते सांगा ?" अशी विनंती केली. त्यावर श्री म्हणाले, "आम्ही बैरागी लोक, आम्हाला कशाचीही जरूरी नाही. तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे, म्हणजे मला सर्व पोचले." पण ती मंडळी ऐकेनात तेव्हा श्रींनी त्यांना ’  
’हरिहाट ’ करायला सांगितले.  हरिहाट म्हणजे भगवंताच्या प्राप्तीची जी जी साधने आहेत, ती सर्व एकदम सुरू करून सात दिवस अखंड चालवायची. एक अत्रछत्र सुरू करून सात दिवस मुक्तद्वार ठेवायचे. त्या मंडळींनी एकदम हरिहाटाची तयारी सुरू केली. कलकत्त्यापासून दोन मैलांवर एक मोठा मांडव उभारला. देशातल्या सर्व शास्त्रीपंडितांना, कलावंतांना, विद्वानांना निमंत्रणे पाठविली. धान्य, कपडा, चांदीची भांडी खरेदी केली. तयारीला १५ दिवस लागले. एका सुमुहूर्तावर यजमानाने श्रींची हत्तीवरून मिरवणूक काढली, श्रींना उच्चासनावर बसवले व वेदमंत्रांनी समारंभास सुरुवात झाली. वेदपारायण, यज्ञ, जप, भजन, कीर्तन, पुराणवाचन, योगासने, पंचाग्निसाधन, नामस्मरण, ब्रह्यकर्म, देवतार्जन, वाममार्ग, तंत्रक्रिया इत्यादि साधने सुरू झाली. अन्नछत्र चालू झाले. रोज नवीन पक्वान्न होई, सर्वांना पोटभर मिळे. सात दिवसांत अक्षरशः हजारो बैरागी, आंधळे, पांगळे, भिकारी, श्रीमंत, गरीब पुरुष, स्त्रिया, मुले तेथून जेवून गेले. बहुतेक सर्व कलकत्त्यातील लोक समारंभ पाहून गेले. श्री स्वतः सकाळ-संध्याकाळ मंडपात येऊन सर्वांची चौकशी करीत. आठव्या दिवशी यजमानाने श्रींची महापूजा केली व महावस्त्र अर्पण करून एक हजार रुपयांचे भरलेले ताट दक्षिणा म्हणून पुढे ठेवले. श्रींनी ते वस्त्र यजमानीण बाईंना प्रसाद म्हणून दिले व दक्षिणा काशीच्या विद्वान पंडितांना वाटून टाकली. हरिहाट संपल्यावर श्रींनी बरोबरच्या लोकांना अमरकंटकच्या यात्रेला पाठवून दिले व जमीनदार परिवाराचा निरोप घेऊन एका रात्री कुणाला न कळवता तेथून चालते झाले.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली