Get it on Google Play
Download on the App Store

"पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे."

१८६८
"पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे."
येहळेगावळा श्रींनी तुकामाईंचे दर्शन घेतले व बरोबर एक वर्षानी गोंदवल्यास परत आले. संध्याकाळची वेळ होती. आपल्या घरासमोर जाऊन श्रींनी "जयजय रघुवीर समर्थ " म्हटले, ते ऐकून गीताबाई भिक्षा घेऊन बाहेर आल्या. त्यांनी श्रींना त्यावेळी ओळखले नाही, पण आपल्या मुलाबद्दल विचारले, त्यावर गोसावीबुवा म्हणाले,"माय, तुमचा मुलगा उद्या तुम्हाला भेटेल." त्या रात्री श्रींनी आपला मुक्काम मारुतीमंदिरात केला. दुसर्‍या दिवशी पहाटे बहिर्दशेस निघालेल्या चिंतुबुवांना श्रींनी नावाने हाक मारली. चिंतुबुवा चपापले. पुढे श्री आपल्या घरासमोर आले व "जय जय रघुवीर समर्थ म्हणाले, गीताबाईंनी काहीतरी भिक्षा घालायला आणली त्यावर श्री म्हणाले. "माय, ही भिक्षा मला नको, कोपर्‍याच्या उतरंडीला घटट दह्याची दगडी आहे ती आणून दे " ( श्रींना लहानपणी घटट दही फार आवडे, म्हणून त्यांच्यासाठी गीताबाई रोज दही लावून ठेवीत असत ) गीताबाई चटदिशी घरात गेली व दह्याची दगडी बाहेर आणली व श्रींच्या समोर केली, पण ती न घेता श्री आपल्या आईकडे पाहून नुसते हसले, त्याबरोबर तिने एकदम श्रींना ओळखले आणि त्यांच्या गळ्याला कडकडून मिठी मारली "माझा गणू मला भेटला " असे म्हणून आईच्या डोळ्यांना धारा लागल्या. आणि माझी आई मला भेटली " म्हणून श्रींच्या डोळ्यांना पाणी आले. तेवढयात रावजी तेथे आले, श्रींनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. अनेक वर्षांनी श्री घरी आल्याने सर्वांनी त्यांच्याभोवती राहून त्यांना प्रश्रांनी भंडावून सोडले. "पंतांचा नातू साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे " ही वार्ता सगळीकडे पसरली. आजूबाजूच्या गावाहून शेकडो लोक श्रींच्या दर्शनाला येऊ लागले. भगवंताच्या नामाचे महत्त्व सांगून श्री प्रत्येकाच्या अंतःकरणाला अमाधान देत. श्री आपल्या वडिलांशी फार मर्यादेने वागत. राहत्या घराच्या समोरच्या विठठलमंदिरात श्रींनी आपला मुक्काम हलवल; मंदिरासमोर मोठा ओटा बांधून त्यावर श्री बसू लागले. खातवळहून श्रींचे सासरे त्यांना भेटायला आले. श्री त्यांना म्हणाले, "मी लवकरच तिकडे येणार आहे, त्यावेळी परत येताना माझ्याबरोबर बायकोला घेऊन येईन." आल्यापासून श्री बैराग्याच्या वेषातच होते. काही दिवसांनी शास्त्रोक्त पद्धतीने जटाभार उतरवल्यावर होमहवन व अन्नदान झाले. श्रींचे सासरेही आमंत्रणावरून त्यासाठी गोंदवल्यास आले होते. त्यानंतर गीताबाईंनी सूनबाईला घेऊन येण्याविषयी श्रींपाशी गोष्ट काढली. श्री स्वतः सासर्‍यांबरोबर खातवळला गेले. तेथील मंडळींना खूप आनंद झाला. तेथे चार दिवस राहून श्री येताना कुटुंबाला घेऊन गोंदवल्यास परत आले. श्रींचा गृहस्थाश्रम सुरू झाला. श्रींसारखा पति धन्यता वाटे. प्रापंचिक गोष्टींबरोबर देवाची भक्ती कशी करावी, नामस्मरण कसे टिकवावे, निंदा कशी गिळावी, देवासाठी हार कसा करावा इ. अनेकविध गोष्टी श्रींनी तिला शिकविल्या. श्री मोठे साधू आहेत अशी तिची बालंबाल खात्री होती म्हणून ती त्यांचा शब्द कधीही खाली पडू देत नसे. अन्नदान करण्यात, परोपकार करण्यात, सासू-सार्‍यांपासून गडी माणसांपर्यंत प्रेमाने वागण्यात ती श्रींच्या पसंतीस उतरू लागली.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली