Get it on Google Play
Download on the App Store

इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?"

१८७६
इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?"
दुसरे लग्न झाल्यावर, श्री गोंदवल्यास सहा महिने राहिले. तेवढया अवधीत त्यांचा धाकटा भाऊ अण्णा कालवश झाला. या दुःखा जोर कमी होत आहे तोच त्यांची धाकटी बहीण मुक्ताबाई ( जी खातवळला दिलेली होती ) वारली. अशा रीतीने थोडया काळामध्ये घरातील तीन माणसे मृत्युमुखी पडली. त्यामुळे गीताबाईंचा जीव अगदी पोळून निघाला. लिंगोपंतांच्या वंशापैकी श्रीच मोठे असे राहिले. त्यांच्या वडिलार्जित जमिनी पुष्कळ होत्या. श्रीच एकटे राहिले असे पाहून त्यांच्या भाऊबंदांनी जमिनीसंबंधी तंटा उपस्थित केला. बरीच बोलाचाली होऊन प्रकरण हातघाईवर येई. भाऊबंद श्रींना वाटेल त्या शिव्या देत, श्रीदेखील त्या सव्याज परत करीत. सगळे झाल्यावर श्री त्यांना चांदीचे ताट देऊन आपल्या शेजारी जेवायला बसवीत. लिंगोपंतांपासून श्रींच्या कुटुबीयांचे पंढरपूरला जाणे-येणे होते. तेथे भडगावकर नावाचे वैद्य होते. त्यांच्याकडे श्री वरचेवर जात. एकदा ते भडगावकरांच्या घरी आले, तेव्हा त्यांचा एकुलता एक मुलगा विषमज्वराने आजारी होता. श्री अहोरात्र त्या मुलाचे श्रींवर फार प्रेम होत, इतक्या तापातही त्याचे नामस्मरण चालू असे. तापाच्या विसाव्या दिवशी रात्री त्याचा जीव घाबरला. श्रींनी त्याच्या आईवडिलांना धीर दिला व नंतर स्वतः श्रींनी त्याला आपल्या मांडीवर घेतले व शांतपणे त्याचे प्राणोत्क्रमण होऊ दिले. श्रींनी आईबापांचे सांत्वन केले. पुढे आप्पासाहेब भडगावकरांनी श्रींना आपले सर्वस्व अर्पण केले. श्री नंतर गोंदवल्यास आले, त्यावेळी मोठा दुष्काळ पडला. सरकारने काही दुष्काळी कामे सुरू केली, पण त्यामुळे लोकांची उपासमार टळली नाही. श्रींनी आपल्या मालकीच्या शेतात दुष्काळी काम सुरू केले. एका शेतातली माती काढून दुसर्‍या शेतात नेऊन टाकायचे हे त्यांचे काम. त्यासाठी श्रींनी जवळजवळ दीडशे बैलगाडया कामावर लावल्या. काम करणार्‍या प्रत्येक माणसाला रोजएक मोठी भाकरी आणि भांडे भरून आमटी मिळायची. श्री पोटाला अन्न देतात हे कळल्यावर गोंदवल्यातीलच नव्हे, तर आजूबाजूच्या खेडयापाडयांतीलही गरीब लोक कामाला येऊ लागले. श्रींनी त्याकरिता आपली कोठारे उघडी ठेवली होती. सुमारे दीड हजार लोक रोज अन्न घेऊन जात. गावचे काही लोक व घरची मंडळी मिळून इतक्या भाकरी भाजत असत. भाकर्‍या तयार झाल्यावर श्री आपल्या हाताने कामागारांना वाटीत असत. भाकरी देत असताना भुकेने व्याकुळ होऊन अन्नासाठी हपापलेले जीव पाहून श्रींच्या डोळ्यांना अश्रुधारा लागत. त्यावेळचा औंधचा राजा एक दिवस गोंदवल्यावरून औंधला चालला होता. त्याने हा प्रचंड समुदाय पाहिला आणि आपली गाडी थांबवली. "इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" असे त्याने लोकांना विचारले. श्रींचे नाव कळल्यावर त्याने त्यांचे दर्शन घेतले व त्यांना धन्यावाद देऊन तो गेला.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली