Get it on Google Play
Download on the App Store

नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते.

१८५१
नदीकाठी अगदी एकांत असतो,
तेथे मन नामात लवकर रंगून जाते.
मुंज झाल्यानंतर श्रींची बुद्धी अधिकच अंतर्मुख होऊ लागली. ध्रुव, प्रल्हाद, द्रौपदी, गजेन्द्र इत्यादि भक्तांच्या कथा त्यांनी पंतांच्याकडून वारंवार ऐकल्या होत्या. त्यावर आता जोराने मनन होऊ लागले. एके दिवशी रात्री एक वाजण्याच्या सुमारास पंत जागे झाले आणि शेजारच्या अंथरूणावर पाहतात तो त्यावर श्री नाहीत. लगेच पंतांची मंडळींना उठवले आणि दिवे व मशाली घेऊन श्री कुठे आहेत याचा शोध चालविला. आई तर फारच घाबरली. सगळ्या गावात शोध केला पण श्रींचा पत्ता लागेना. मग निराश झालेली मंडळी शेवटचा प्रयत्न म्हणून नदीकडे स्मशानाच्या बाजूला गेली, तर तेथे एका लहानशा गुहेमध्ये ही स्वारी आसन घालून डोळे झाकून बसली होती. मंडळींची गडबड ऐकून श्रींनी डोळे उघडले आणि ते वडिलांच्या बरोबर घरी परत आले. पंतांनी विचारले, "बाळ, कुठे गेला होतास ?" श्री म्हणाले "नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते" आजोबा म्हणाले, "तुला साप, विंचू, भूत-पिशाचांची भीती वाटली नाही का ?" त्यावर श्रींनी सांगितले, "छे ! त्यांना काय भ्यायचे ?" पुढे काही दिवसांनंतर श्री पुन्हा असेच नदीकाठी जाऊन ध्यानस्थ बसले, पण यावेळी घरच्या मंडळींनी फारशी गडबड केली नाही. आणि पहाटेच्या सुमारास ते घरी परत आले. व्यवहाररिक द्दष्टीन त्याला लिहायला व वाचायला चार अक्षरे यावीत म्हणून लौकिक विद्या संपादन करण्याकरिता आजोबांनी आपल्या नातवास गावच्या पंतोजींच्या शाळेत घातले, परंतु मुलाच्या अलौकिक बुद्धिच्या मानने पंतोजी कमी पडले. शाळेत श्री पंतोजींना येत असलेली विद्या चटकन शिकले. पुढे श्रींना शाळेत करमेना त्यांनी शाळेतील आपल्या मित्रांबरोबर शाळेच्या बाहेर खेळणे सुरू केले. सर्वांनी ओढयावर जाऊन विटीदांडू खेळणे चालू केले. विटी-दांडू, खेळामध्ये श्री इतके प्रवीण होते की डाव आपल्या हाती आल्यावर दुस‍र्या बाजूची पोरे रडकुंडीला येईर्पंत चोपीत बसायचे, मग ते आपणहून चुकायचे व बाद व्हायचे. हीच त‍र्हा इतर बाबतीत होत असे. मोठमोठया झाडांवर हां हां म्हणता ते चढून जात. पोहण्यामध्ये आणि कुस्ती खेळण्यामध्ये तर त्यांचा नेहमी पहिला नंबर ठरलेला. तसेच घोडयावर बसणे, उडया मारणे, दंड काढणे, गोटया खेळणे इ. लहान मुलांच्या सर्व खेळांमध्ये त्यांती बरोबरी करेल असा त्यावेळी कोणी नव्हता.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली