Get it on Google Play
Download on the App Store

"मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल."

१८७८
"मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले
तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल."
पंढरपूरहून निघाल्यापासून बरेच दिवस झाले होते. श्री आता नर्मदेच्या किनार्‍याने जाऊ लागले. जाता जाता महेश्र्वर नावाच्या गावी आले. तेथे दोन मोठे मांत्रिक रहात होते. श्रींना पाहिल्याबरोबर यांच्याकडे मोठी मंत्रसिद्धी आहे असा त्या दोघांचा समजझाला व ते दोघेजण श्रींच्या मागे लागले. श्रींनी त्यांना स्पष्ट सांगितले, "मला मंत्रतंत्र काही येत नाही, मी फक्त रामनाम जाणतो. मी रामाचा दीनदास आहे." या गोष्टी मांत्रिकांना पटल्या नाहीत. ’आपल्या सिद्धी लपवून ठेवीत आहे ’ अशी त्यांची खात्री झाल्यावर ते श्रींना म्हणाले,"तुम्ही सरळपणे आम्हाला तुमची मंत्रसिद्धी विद्या द्या, नाहीतर आम्ही नागपाश टाकून तुम्हाला बांधून टाकू आणि तुम्ही फुकट प्राणाला मुकाल." श्री काही बोलले नाहीत. श्रींच्या मागे मागे फिरत ते एका डोंगरावर आले. त्यांनी मंत्र देण्याविषयी श्रींना पुन्हा विनंती केली. पण श्री काही बोलेनात, तेव्हा त्यांनी श्रींच्यावर नागपाश टाकला. एका क्षणात जिकडे तिकडे नागच उत्पन्न होऊन श्रींच्यावर फुत्कार टाकू लागले. श्री स्वस्थपणे नाम घेत उभे होते. पाच मिनिटांच्या अवकाशात सर्व नागांनी विळखे घालून त्यांना बांधून टाकले. आता तरी ते घाबरतील असे वाटून मांत्रिक श्रींना म्हणाले, "अजून तरी तुम्ही आपला मंत्र आम्हाला द्या म्हणजे हे नाग नाहीसे होतील. असे न कराल तर तुमचा प्राण जाईल." श्री म्हणाले, "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." मांत्रिकांनी श्रींच्या बोलण्याकडे लक्ष दिले नाही ब आपला पाश कायम ठेवला. श्री डोळे झाकून अशा स्थितीत स्वस्थ बसून राहिले. अशा स्थितीत तीन दिवस गेल्यावर श्रींनी पुन्हा त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. पण ते जेव्हा ऐकेनात तेव्हा श्री "जयजय रहुवीर समर्थ " असे मोठयाने म्हणत उठले आणि डोंगराच्या कडयावरून खाली उडी घेतली. त्याबरोबर सर्व नाग छिन्नविछिन्न होऊन मरून पडले व श्री मोकळे झाले. मांत्रिकांचे मंत्र बलहीन झाले. दोघांनी श्रींच्या जवळ येऊन त्यांना साष्टांग नमस्कार घातला. श्रींनी त्यांना क्षमा करून दोघांना रामनाम दिले. दोघेजण मंत्राचा नाद सोडून भगवंताच्या मार्गाला लागले. त्यांपैकी एकाला तपश्र्चर्या करायला सांगून नर्मदा तटाकी बसविले व दुसर्‍याला बरोबर घेऊन श्री पुढे निघाले. याचे नाव सच्चिदानंद होते. त्याने अखंड रामनाम घेण्याचा अभ्यास सुरू केला. त्यात तो स्वतःला पूर्णपणे विसरून जाई. श्रींबरोबर फिरत फिरत उज्जैनला जाण्यासाठी ते दोघे बुदनी स्टेशनवर आले. गाडी येण्यास अवकाश असल्यामुळे स्टेशनजवळच्या धर्मशाळेत जाऊन बसले. काही वेळाने गाडी आली. श्री स्टेशनवर पोचण्याआधीच गाडीने निघण्याची शिटूटी दिली. बरोबरच्या सच्चिदानंदाला राग आला व तो बोलला, "अबे आहे लौंडी, मेरे सदूगरूको छोडकर कहा जा रही है ? जरासी ठहर " हे शब्द काढल्याबरोबर चालू झालेली गाडी एकदम थांबली. ड्रायव्हर, गार्ड वगैरे लोकांनी खूप खटपट केली, पण गाडी हालेना. इतक्यात श्री स्टेशनवर पोचले, त्यांच्या नजरेला हा प्रकार आला. तेव्हा लगेच ते सच्चिदानंदाला म्हणाले, "अरे, साधनाला आरंभ होऊन जरा कोठे सामर्थ्य साठायले लागले, तर लगेच खर्च करण्याची अवदसा तुला आठवली आणि ते सुद्धा क्षुल्लक गोष्टीसाठी ! आपण बैरागी लोक, आपल्याला जायची काय घाई आहे ! आपण उद्या गेलो असतो, पण तू आपली केवढी शक्ती खर्च केलीस ! तू येथूनच परत जा. बारा वर्षे एकांतात बसून भगवंताचे नाम घे. नंतर मला तोंड दाखव. जा, राम तुझे कल्याण करील." श्रींच्या पायावर डोके ठेवून तो तेथून निघून गेला.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली