Get it on Google Play
Download on the App Store

"आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले."

१८६९
"आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय
सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले."
श्रींनी आपल्या वडिलांकडून ( रावजींकडून ) कुलकर्णी पदाचे सर्व दप्तर स्वतःकडे घेतले. जटा, दाढी वगैरे बैराग्याचा वेष टाकून श्री प्रपंच इतका छान करू लागले हे पाहून गीताबाई त्यांना म्हणाल्या, "गणू, तू आपला व्यवहार इतकार चांगला करतोस हे पाहून माझ्या मनाचे समाधान झाले. आता कुलकर्णीपणाची वृत्ती यापुढे तू चांगली सांभाळशीलच, त्यामुळे यांना विश्रांती मिळेल." श्रींनी तसे करण्याचे लगेच कबूल केले. त्या काळी कुलकर्णीपणाला गावाच्या द्दष्टीने फार महत्त्व असे. कुळकर्णी हा चांगला असणे हे गावाचे भूषण समजले जाई. गावचे पुष्कळसे व्यवहार त्याच्याच तंत्राने चालत असत. कुळकर्णी सज्जन असेल तर सबंध गाव मोठया आनंदात राही आणि दुर्जन असेल तर गावच्या लोकांना त्याच्यापासून त्रास होई म्हणून कुळकर्ण्यांना या कामासाठी वतने तोडून दिलेली असत, त्यामुळे त्यांची सांपत्तिक स्थिती बर्‍यापैकी असे. स्वतः कमावलेली जमीन असायची ती वेगळीच. कुळकर्ण्यांना गावात चांगला मान मिळे. याशिवाय सरकारी सारा वसूल करणे, जमिनीची मोजणी करणे, जमिनीच्या देण्या-घेण्याचे व्यवहार पाहणे, शेतकर्‍यांच्या तक्रारी ऐकणे व त्यांचे तंटे सोडवणे इ. कामे करीत असताना कुळकर्ण्यांचा अनेक लोकांशी संबंध येई. सज्जन कुळकर्ण्याच्या अंगी आवश्यक असणारे सर्व गुण श्रींपाशी होते. त्यामुळे त्यांच्या हाताखाली असणारे गावातले लोक निवांत, सुखी झाले व इतका चांगला कुळकर्णी आपल्याला मिळाला म्हणून सर्वांनी देवा़चे आभार मानले. मामलेदार साहेबांची स्वारी गोंदवल्यास आली म्हणजे श्री दप्तर घेऊन त्यांच्या भेटीला जात आणि सर्वांचे समाधान होईल असा सर्व गोष्टींचा खुलासा करीत. दप्तर सांभाळायला लागून चार महिने होत आले. आपल्या कुटुंबाला पूर्वीचे दिवस आता लवकरच येतील असा विश्र्वास गीताबाईंना वाटून त्या आनंदात होत्या. तेवढयात एक दिवस श्री आपल्या आईला बोलले "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदूगुरूंना भेटूनही आता फार दिवस झाले. त्यांच्या भेटीला जावे असे माझ्या मनात सारखे येते. म्हणून हे काम मी आता
सोडतो " यावर आई काय म्हण्ते ते ऐकायला श्री तेथे उभे राहिलेच नाहीत आणि दुसरे दिवशी एक मनुष्य बदली देऊन कुळकर्णीपणाच्या व्यापातून श्री मोकळे झाले. आधीपासूनच श्रींचे गोमेवाडी, म्हसवड, पंढरपूर, कुरवली, गिरवी, कर्‍हाड वगैरे ठिकाणी जाणे होई आणि तेथील लोकांना भगवंताच्या नामाकडे वळवण्याच्या प्रयत्नात ते सतत असत.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली