Get it on Google Play
Download on the App Store

सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा

१८९९
"सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा
म्हणजे वासनेचे आपोआप तळपट होते."
श्री एकादशीला पंढरपूरला जात असत. तेथे सांगलीचे शिवभक्त श्री विष्णुपंत नगरकर यांची भेट झाली. त्याआधी श्रींनी त्यांना द्दष्टांत देऊन श्रीशंकर व श्रीकृष्ण एकच आहेत असे दाखवून देऊन ’मला येऊन भेट ’ असे सांगितले होते. त्याप्रमाणे श्रींना भेटल्यावर त्यांनी श्रींच्या चरणावर मस्तक ठेवले. श्री म्हणाले, "श्रीकृष्ण व श्रीशंकर एकाच परमात्म्याची दोन व्यक्त रूपे आहेत. हरिहरांमध्ये भेद नाही. विष्णुभक्तांची निंदा करण्याचे सोडून दे. त्यामुळे शिवाच्या उपासनेला कमीपणा येतो. आजपासून रोजशाळिग्रामाची पूजा करीत जा. विष्णूचे पूजन केल्याने शिव खात्रीने प्रसन्न होईल." विष्णुपंताच्या डोळ्यातून पाणी बाहू लागले. श्री शंकराच्या पूजेसाठी आणलेल्या साहित्याने त्याने श्रींची पूजा केली. श्रींजवळ त्यांनी अनुग्रहाची याचना केली. तेव्हा श्रींनी त्यांना रामनामच दिले. श्रीशंकरांना प्रिय असणारे रामनामच आपण घ्यावे असे त्यांना सांगितले. विष्णुपंतांचे पूर्ण समाधान झाले. श्री गोंदवल्यास राहू लागल्यावर श्रींकडे येणार्‍यांची संख्या खूप वाढली. इकडे इंदूरला गोदुबाईच्या मुलाच्या मुंजीत, पंगत बसली असता तूप वेळच्या वेळी आले नसल्याने पंगत खोळंबली. गोदुबाईंनी श्रींच्या तसबिरीसमोर उभे राहून "महाराज !" अशी कळवळून हाक मारली. श्री तसबिरीतून बाहेर आले व खोळंबलेल्या पंगतीला तुपाच्या भांड्यातून होते तेवढे तूप वाढले. तीनशे पान जेवून उठले तरी भांडयाती तूप सर्वांना पुरले व पुनः तितकेच शिल्लक उरले. अनेक जण श्रींचे दर्शन घेऊन गेले. श्री पुनः देवघरात गेले "आता मी येतो " असे गोदूबाईला सांगू तेथून गुप्त झाले. म्हणूनच श्री ब्रह्यानंद आरतीत म्हणतात, "इद्द लिद्द, दुरिन भक्तगे दर्शन कोट्टबने " ( एक ठिकाणी राहून दूर ठिकाणी असलेल्या भक्ताला श्री दर्शन देतात. ) श्रींना पहिल्या पत्नीपासून मुलगा झाला. पण तो तार्‍हेपणीच वारला. दुसर्‍या पत्नीपासून दोन
मुलगे व एक मुलगी झाली. ही मुलेही लहानपणीच वारली. श्रींची ही मुलगी गोरी असून दिसायला सुरेख होती. ती फारशी रडायची नाही. म्हणून श्री तिला ’शांता ’ या नावाने हाक मारीत. ती दीड वर्षाची झाली तरी तिला बोलता येत नसे. पण मंदिरामध्ये भजन सुरू झाले की तिकडे जाण्यासाठी तिची धडपड चालू होई. रोज न चुकता ती रामाचे तीर्थ घेई व श्रींच्या पानातले चार घास खाई. श्री निरूपणाला बसले की तासभर ती श्रींच्या तोंडाकडे बघत स्वस्थ बसत असे. "शांते, तुला काय समजले गं ?" असा प्रश्र केला तर गोडपणे हसून उत्तर देई. एकदा तुळशीला प्रदक्षिणा घालताना एका बाईने शांतीच्या गळ्यात कौतुकाने आपल्या गळ्यातील पोवळ्याची माळ घातली. श्री तेथे आले व म्हणाले, "शांते, तुझ्या गळ्यातील माळ मला दे." शांतीने गळ्यातून माळ काढायचे सुचवले. मावशीने माळ काढून तिच्या हातात दिली. तिने ती तशीच श्रींच्या हातात ठेवली. श्री तिला म्हणाले, "तुला ही माळ नको का ?" त्याबरोबर तिने जवळच असलेल्या तुळशीचे पान तोडले व श्रींच्या हातातील माळेवर ठेवले. श्री तिला म्हणाले, "शांते, भाग्याने लाभलेली संगती तुझे कल्याण करील " पुढे ६ महिन्यांनी ती मुलगी कालवश झाली. ती गेल्यावर श्री म्हणाले, "कोणाच्या पोटी कोण जन्म घेतो हे सामान्य माणसांना कळणे शक्य नसते. फक्त सत्पुरुषांनाच ते कळते. पुष्कळ वेळा चांगले अधिकारी जीव एखाद्या लहानशा वासनेत अडकून पडतात. तेथे त्यांची ती वासना तृप्त होण्यास वेळ लागत नाही. म्हणून लहानपणीच ते जग सोडून जातात. त्यांच्या मृत्यूचे दुःख करणे बरोबर नाही, सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्‍ट धरावा म्हणजे वासनेचे आपोआप तळपट होऊन जाते."

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली