Get it on Google Play
Download on the App Store

"आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही."

१८७५
"आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही."
याच सुमारास सरस्वतीला दिवस राहिले. गीताबाईंना फार आनंद झाला. त्यांनी आपल्या सुनेचे अनेकपरीने कौतुक केले. नऊ महिने पूर्ण झाल्यावर सरस्वती बाळंत होऊन तिला मुलगा झाला. तो हुबेहुब श्रींसारखा दिसे. आपल्या नातवाचे थाटाने बारसे करावे असे गीताबाईंच्या मनात आले. परंतु श्रींनी मोठया खुबीने बारसेच करण्याचे टाळले. सरस्वतीला ही कल्पना होती. एका वर्षाच्या आतच तो मुलगा परलोकवासी झाला. नंतर सरस्वतीला थोडया दिवसांनी ताप येऊ लागला. कोणत्याही प्रसंगाला निर्भयपणे तयार राहण्याइतके उपासनेचे तेज तिच्यापाशी होते. आपला अंतकाळ जवळ आला आहे असे वाटून तिने स्वतःला स्नान घालण्यास सांगितले, नंतर आपल्या सासू-सासर्‍यांच्या पाया पडली. श्रींच्या पायांचे तीर्थ घेतले. आणि सिद्धासनावर बसून नाम घेत शांतपणे प्राण सोडला. पुढे इंदूरला जीजीबाई फार आजारी आहे असे कळल्यावरून श्री इंदूरला गेले. काही दिवसांनी श्री मुंडन करून आले, लोकांना फार आश्र्चर्य वाटले, कारण विचारल्यावर श्री म्हणाले, "आज आमचे वडील वैकुंठवासी झाले." इकडे गोंदवल्यास रावजी वारल्यामुळे गीताबाईंना फार दुःख झाले, श्रीही तेथे नसल्याने दुःखात भर पडली. उत्तरक्रिया करण्यासाठी ज्येष्ठ पुत्रच पाहिजे असा शास्त्रार्थ भटजींनी काढल्यामुळे सर्वजण चिंतेत होते. अशा परिस्थितीत बरोबर दहाव्या दिवशी श्री गोंदवल्यास हजर झाले. त्यांनी वडिलांची उत्तरक्रिया यथासांग पार पाडली व आईचे दुःख हलके केले. पुढे चार महिने गेल्यानंतर त्या काळच्या रिवाजाप्रमाणे श्रींना मुली सांगून येऊ लागल्या. कोणते तरी निमित्त सांगून श्रींनी लग्न करण्याचे टाळले. एक दिवस आई त्यांना म्हणाली, "अरे गणू, अजून तुझे लग्नाचे वय आहे, तू पुन्हा लग्न करावेस अशी माझी फार इच्छा आहे, नाही म्हणू नकोस " श्रींनी आईला उत्तर दिले, "मी तुझे ऐकेन पण ते एका अटीवर ! मुलगी मी स्तवः पसंत करीन." आईने लगेच कबुली दिली. गोंदवल्यापासून काही कोसांवर आटपाडी नावाचे गाव आहे, तेथील सखारामपंत देशपांडे या सुखवस्तू गृहस्थांना ५/६ मुलीच होत्या, त्यांपैकी एक जन्मापासून आंधळी होती. या मुलीच्या लग्नाबद्दल सखाराम पंतांना फार काळजी वाटे. श्रींनी पुन्हा लग्न करण्याचे आईजवळ कबूल केल्यानंतर श्री एक दिवस उठले आणि आटपाडीला सखारामपंतांच्या घरी गेले. श्री आलेले पाहून सखारामपंतांना आनंद झाला. त्यांचा आदर करून असे अचानक येण्याचे कारण विचारले. श्री म्हणाले, "तुमच्याकडे लग्नाच्या मुली आहेत ना ? आमच्यापैकीच एकाला लग्न करायचे आहे, म्हणून मी मुलगी पहायला आलो आहे " लगेच आपल्या तीन-चार मुलींना आणून श्रींसमोर उभे केले. लगेच श्री म्हणाले "तुमची एक आंधळी मुलगी लग्नाची आहे असे मी ऐकतो, तिला बाहेर आणा." सखारामपंतांनी आपल्या आंधळ्या मुलीला बाहेर आणून बसविले. श्रींनी तिला पाहून ती आपल्याला पसंत आहे असे सांगितले. नंतर श्री म्हणाले, "सखारामपंत, मी स्वतःच लग्न करणार आहे, ही मुलगी मला पूर्ण पसंत आहे, पण मी असा गोसावी. तेव्हा तुम्ही  नीट विचार करा आणि मग मला मुलगी द्यायची असेल तर द्या." सखारामपंताचा आनंद गगनात मावेना, त्यांनी ताबडतोब संमती दिली. पुढे घरी आल्यावर आपण लग्न ठखून आल्याचे आईला सांगितले. आईला खूप बरे वाटले, पुढे मुहूर्ताच्या तिथीवर श्री एकटेच आटपाडीला गेले व लग्न करून घरी परत आले. नवीन सुनेला आईला नमस्कार करण्यासाठी आईपुढे आणली व म्हणाले, आई नवीन सून तुझ्याकडे पाहिले. तर ती दोन्ही डोळ्यांनई आंधळी. आई म्हणाली, "तू केव्हा काय करशील याचा भरवसा नाही. बरे आता झाले ते झाले." मुलीचे नाव बदलून सरस्वती ठेवले.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली