Get it on Google Play
Download on the App Store

रामाचे देणेच तेवढे हिताचे असते.

१८९४
"रामाचे देणेच तेवढे हिताचे असते.
आपल्या देहबुद्धीचे लोढणे त्याच्या खाली जोडू नये."
कर्नाटकातील ८/१० मंडळी श्रींच्या दर्शनास गोंदवल्या आली. श्रींनी त्यांना आग्रहाने १५ दिवस ठेवून घेतले. त्यानंतर सकाळी ती मंडळी जाण्यास निघाली. श्रींनी त्यांच्याकरिता पिठले भात करायला सांगितले. जाणार्‍या मंडळींनी जेवण उरकल्यावर ती श्रींना भेटायला आली. श्रींनी हरिपंत मास्तरना सांगितले, "मास्तर माझ्या गादीखाली मी मघाशी रुपये ठेवले आहेत, तेवढे घेऊन या." त्यावर मास्तर म्हणाले, "महाराज गादीखाली काही नाही, मी इतक्यातच सर्व अंथरूण झाडून घातले आहे." त्यावर श्री म्हणाले, "मास्तर, आपली विद्या शाळेतील मुलांपुरती खरी आहे, ती सर्व ठिकाणी कशी लागू पडेल ? मी सांगती त्यावर तर्क काढू नये, जा आणि गादीखाली सापडेल ते आणा." हरिपंत मुकाटयाने गेले आणि गादीखाली पाहिले तो त्या ठिकाणी चार खण आणि सहा रुपये सापडले, ते चकितच झाले. श्रींना ते नेऊन दिले. श्रींनी प्रत्येक पुरुषाला एकेक रुपया आणि प्रत्येक बाईला एकेक खण देऊन सर्वांना निरोप दिला. म्हासुर्णे या गावी श्रीरामाच्या मंदिराजवळ शंकरशास्त्री म्हासुर्णेकर यांचा मठ आहे. अत्यंत भाविक, सात्त्विक प्रवृत्तीचे असून त्यांचे श्रींवर अतिशय प्रेम होते. पुराण सांगण्याची त्यांची शैली अतिशय रसाळ असून ते चांगल्यापैकी साधक होते. श्रींनी त्यांना अनुग्रह देण्याचा अधिकारही दिला होता. एकदा ते नामस्मरण करीत बसले असता, श्रींनी आपल्याला भगवंताच्या मार्गावर घालण्यामध्ये श्रींचे डोंगराएवढे उपकार त्यांना आठवले, त्यांच्या डोळ्यांना अश्रुधारा लागल्या, श्रींची काही स्तुति करावी असे त्यांना मनापासून वाटले; पण काव्य करण्याची त्यांना शक्ति नव्हती याचे त्यांना वाईट वाटले. रात्री नित्याप्रमाणे भजन, आरती करून ते झोपले. झोपायच्या आधी त्यांनी श्रींचे ध्यान केले आणि काही सेवा घडावी अशी काकुळतीने प्रार्थना केली. पहाटे शास्त्रिबुवांना स्वप्न पडले, श्री सिंहासनावर बसले आहेत आणि शास्त्रिबुवा पीतांबर नेसून पूजा साहित्या घेऊन आले व त्यांनी श्रींची यथासांग पूजा केली. नंतर हात जोडून स्तुती करण्यासाठी म्हणून श्रींसमोर उभे राहिले व लगेच एकामागून एक सहा श्लोक त्यांच्या तोंडून बाहेर पडले. इतक्यात त्यांनी ते लिहून काढले व मग त्यांनी त्यांच्या कामाला आरंभ केला. पुढे त्यांच्या मनात आले की, या सहा श्लोकांत आणखी दोन श्लोकांची भर घालून अष्टक बनावावे. त्याप्रमाणे त्यांनी डोके खाजवून दोन श्लोक खूप वेळांनी तयार केले व अष्टक बनवले. काही दिवसांनी गुरुपौर्णिमेला श्रींच्या दर्शनासाठी शास्त्रीबुवा गोंदवल्यास आले. झालेली हकीकत सांगून अष्टक लिहिलेला कागद श्रींच्या पुढे केला. श्रींनी पेन्सिल मागवली व शेवटच्या दोन श्लोकांवर काट मारून म्हणाले, "राम देतो त्यामध्ये समाधान मानायला शिकावे, रामाचे देणेच तेवढे हिताचे असत. आपल्या देहबुद्धीचे लोढणे त्याच्याखाली जोडू नये." या शब्दांचे मर्ग शास्त्रीबुवांच्या लक्षात आले. मद्रासकडील एका सुशिक्षित सरकारी अधिकार्‍याला एक मुलगी होती. लहानपणापासून तिचे लक्ष भगवंताकडे लागले होते. लग्न होऊनही नवर्‍याशी पटेना म्हणून त्याच्या संमतीनेच ती माहेरी आली. पुढे तिच्या बापाची व ब्रह्यानंदांची गाठ पडली आणि तिला गोंदवल्यास श्रींकडे नेण्याचा त्य़ांनी सल्ला दिला. श्रींनी तिची सर्व हकीकत ऐकून तिला ठेवून घेतले. श्री तिला अम्मा म्हणू लागले व मौन पाळून १२ वर्षे नामस्मरण करण्यास सांगितले. त्याप्रमाणे तिने केले. लहान मुलांचे कपडे शिवून त्यावर जरीची कलाकुसर अम्मा छान करीत असे. राम, लक्ष्मण, स्तीता यांच्यासाठी सुंदर कपडे श्री तिच्याकडून तयार करून घेत. ते घातल्यावर रामरायाचे ध्यान अतिशय स्वरूपसुंदर दिसे. अम्मा जाऊन येऊन गोंदवल्यास रहात असे. शेवटचे दिवस तिने तिथेच काढले.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली