Get it on Google Play
Download on the App Store

ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला.

१८८२
ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला
त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला.
इंदूरला श्रींचे बरेच दिवस वास्तव्य झाल्यामुळे श्रींचे नाव जिकडे तिकडे पसरले. ते जेथे जेथे रहात तेथे तेथे भजन, नामस्कारण, अन्नदान सतत चालू असे. अनेक प्रांतीचे लोक त्यांच्याजवळ समाधान पावत व परत जाताना ’नाम ’ घेऊन जात. याच सुमारास गोविंद अनंत कुलकर्णी ( आनंदसागर ) यांचे कुटुंब इंदूरला राहण्यास आले. दहाव्या वर्षी गोविंदाचे वडील वारले. थोडी फार लिखाई करून आपले व आईचे पोट भरण्याची पाळी गोविंदावर आली. वडील वाचीत असत तो दासबोध गोविंदा वाचून त्याचे मनन करीत असे. पंधराव्या वर्षी दासबोधातील ’शुचिष्मंता ’ च्या समासाचे वाचन करीत असताना गोविंदाच्या वृत्ती तल्लीन झाल्या. असा कोणी सिद्धपुरुष मला भेटेल का, असा विचार मनात आला आणि लगेच खडावांचा आवाज आला. समोर श्रीमहाराउभे असलेले त्याने पाहिले. कपाळी केशरी गंध, गळ्यात तुळशीची माळ, अंगात कफनी आणि हातात कुबडी असे श्रींचे रूप पाहून गोविंदा थक्कच झाला. "मला येऊन भेट." असे बोलून श्री पाहता पाहता नाहीसे झाले. योगायोगाने श्रींची भेट झाली. श्रींना पाहताच गोविंदाचे मन शांत झाले. दुसर्‍या दिवशी गोविंदाने आईलाही श्रींच्या दर्शनास नेले. दोघांनाही अनुग्रह देऊन रामसेवा करण्यास सांगितले. पुढे इंदूर सोडताना श्रींनी दोघांनाही बडवई येथे जाण्यास सांगून ३॥ कोटी जप करण्याची आज्ञा केली. बडवईला गोविंदा ४/४॥ वर्षे राहिला. तेथे श्रींचे पत्र गोविंदाला आले. त्यात "आनंदसागर " असा उल्लेख करण्यात आला होता. जप पुरा झाल्यावर श्रींनी त्याला अंबडला पाठविले. पुढे श्रींच्या आज्ञेवरून आनंदसागरांनी जालना येथे श्रीराममंदिर स्थापन केले व केवळ भिक्षेवर चालविले. आनंदसागर हे श्रींचे पहिले पटटशिष्य. श्री इंदूरला असतानाच भैय्यासाहेब मोडकांकडे अनंतशास्त्री ( ब्रह्यानंद ) यांची गाठ पडली. परंतु पहिल्या भेटीत त्यांना सदूगुरूंची ओळख पटली नाही. ते पुन्हा नरसोबाच्या वाडीला आले. तेथे श्रीदत्तांचा त्यांना पुन्हा द्दष्टांत झाला. ते पुन्हा इंदूरला गेले. तेथे श्री भेटल्यावर कोणताही विकल्प मनात न आणता श्रींच्या पायावर डोके ठेवले व आपली विद्या घेतली असे श्रींनी म्हटल्यावरच आपण पायावरून डोके उचलू अशी श्रींना विनंती केली. श्रींनी ’ घेतली ’ असे म्हटल्यावर अनंतशास्त्र्यांनी डोके उचलले. श्रींनी त्यांना उचलून पोटाशी धरले. त्यांना अनुग्रह देऊन त्यांचे नाव "ब्रह्यानंद " ठेवले. कर्नाटकात जाऊन रामनामाचा प्रसार कर म्हणून सांगितलेव राममंदिर बांधण्याचे सुचविले. त्या आधी नर्मदाकाठी सर्पेश्र्वरीस जाऊन राहण्याची आज्ञा केली, तेथे २॥ वर्षे राहून तप केल्यावर त्यांचा ग्रंथिभेद झाला आणि अष्टसात्त्विक भाव प्राप्त झाले. ते लगेच गोंदवल्यास जाऊन श्रींना भेटले. श्रींनी त्यांना एक रुपया लक्ष्मीचा प्रसाद म्हणून दिला आणि ’ झाडाखाली झाड वाढत नाही ’ असे सांगून कर्नाटकात धाडले. अशा रीतीने
’ आनंदसागर ’ व ’ ब्रह्यानंद ’ यांची भेट प्रथम इंदूरला श्री असताना झाली. ज्या ज्या माणसांचा श्रींशी सहवास झाला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. सिद्धिसाठी सहवास करणार्‍या योग्यांना त्यांनी नामाचे महत्त्व पटवून देऊन भक्तीच्या मार्गास लावले. श्रीमंत, अधिकारी व विद्वान अशा अनेक लोकांना त्यांनी नामाला लावले.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली