Get it on Google Play
Download on the App Store

वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले

१८७२
"वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात
दिवस घालवले तसेच नाशिकला माझे दिवस आनंदात गेले."
येहळेगाव सोडल्यावर श्री सरस्वतीला म्हणाले, "तुकामाईजवळ हे काय तू मागितलेस ! हे मागण्यामध्ये तू मोठी चूक केलीस, या जगातली कोणतीही वस्तू ते देऊ शकतील हे खरे, पण त्या वस्तूचा अशाश्वतपणा काढून ती कशी आपल्याला मिळेल ? त्यांच्या
कृपेने मुलगा होईल, पण तो अल्पायुषी होईल." सरस्वतीला देखील आता या गोष्टीचे अत्यंत वाईट वाटले. पण आलेली संधी अशा रितीने गमावल्यामुळे आता इलाज नव्हता. मोठया काकुळतीने श्रींना ती म्हणाली, "माझ्या स्त्रीबुद्धीनें मला फसविले, त्याबद्दल मला अत्यंत वाईट वाटते, पण आपण या देहाचे धनी आहात, त्याचे सार्थक करणे आपल्या हातात आहे, तो मार्ग मला दाखवा." हे सर्व ऐकून श्रींनी तिला योगदिक्षा देण्याचे ठरविले आणि तिला घेऊन नाशिकला आले. नाशिकला गंगेच्या काठी असणार्‍या एका मंदिरात दोघेजण उतरले. श्रींनी वडाचा चीक लावून तिच्या केसांच्या जटा वळल्या. हातातल्या बांगडया काढून तिथे तुळशीच्या माळा बांधल्या. गळ्यातील मंगळसूत्र काढून तेथे तुळशीची माळ घातली. कपाळाचे कुंकू काढून तेथे भस्म लावले. रंगीत लुगडयाच्या ऐवजी पांढरे पातळ नेसवले. तिच्या हातामधे रुद्राक्षाची माळ दिली व तिला पूर्ण जोगीण बनविलि. मंदिरामध्ये श्री ऐका कोपर्‍यात
बसत आणि ती समोरच्या कोपर्‍यात बसे. श्रींनी सरस्वतीला योगमार्गाचे रहस्य दाखविण्यास सुरुवात केली. तिला सिद्धासन घालण्यास शिकवले, श्र्वासबरोबर नाम कसे घ्यावे हा अभ्यास करवून घेतला. नंतर मानसपूजा शिकवून तिची धारणा द्दढ केली. श्रींनी तिला काही योगमुद्रा दाखविल्या - सांगितल्या आणि भगवंताचे ध्यान लावता येण्यापर्यंत तिची तयारी केली. हे साधण्यास तिला ६ महिने मनापासून अभ्यास करायला लागला. नाशिकमधील हा काळ त्यांनी फार आनंदात घालवला. सरस्वती म्हणे, "वनवासात पंचवटीत असताना, श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले. तसेच नाशिकला असताना माझे दिवस आनंदात गेले." श्री त्यावेळी भिक्षा मागून आणीत. परंतू काही वेळेला भिक्षेला जाणे झाले नाही म्हणजे दोघांनाही उपोषण घडे. सर्व तिने आनंदाने सोसले. श्रींच्याकडे अनेक लोक येत. त्यांना ते परमार्थाच्या गोष्टी सांगून नामाला लावीत. सरस्वतीची वृत्ती नामामध्ये तल्लीन होऊ लागली हे पाहिल्यावर तिला घरी परत पाठविण्याचे ठरवून श्रींनी तिची समजूत घातली. नाशिकमध्येच कृष्णाजी त्रिंबक या नावाचे श्रींचे शिष्य होते. त्यांच्यावर सरस्वतीला घरी पोचविण्याची जबाबदारी सोपविली. कृष्णाजीपंतांनी सरस्वतीला आपल्या घरी नेले. तेथे त्यांच्या पत्नीने तिला न्हायला घालून जटा सोडविल्या. हातात बांगडया, गळ्यात मंगळसूत्र घातले. साडी चोळी नेसवून तिला दोन दिवस घरी ठेवून घेतले. कॄष्णाजीपंतांनी तिला स्वतः नात्यापुत्याला तिच्या सख्या बहिणीकडे सोडले, तेथे तिचे आईवडिल तिला भेटण्यास व घरी घेऊन जाण्यास आले. त्यावेळी सरस्वती एवढी खूष होती. आईबापांना म्हणाली, "तुम्हाला कसे सांगू, तुमचे भाग्य थोर म्हणून तुम्हाला असा जावई मिळाला. त्यांनी माझे कल्याण केले आहे." नंतर सरस्वती सासु सासर्‍यांना भेटण्यास गोंदवल्यास गेली. श्रींची खुशाली सांगून श्री फार अलौकीक पुरुष आहेत याची साक्ष त्यांना पटवून दिली.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली