Get it on Google Play
Download on the App Store

तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता ।

१८४८-४९
तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता ।
बाळपणीच सर्वज्ञता । वरी तयाते ॥
श्रीमहाराज तीन वर्षांचे झाल्यावर घरातल्या माणसांची नजर चुकवून एकटेच बाहेर कुठे तरी जात. त्यांच्या सुईणीचे त्यांच्यावर फार प्रेम होते. पुष्कळ वेळा ते तिच्या घरी जाऊन ’मला भूक लागली आहे, मला खायला दे ’ असे सांगत. तिनेदेखील मोठया प्रेमाने दूध-भात किंवा दहीभात त्यांना खायला घालावा आणि कडेवर घेऊन घरी पोचवावे. श्रींना चौथे वर्ष लागल्यावर आजोबांनी त्यांना धुळाक्षरे काढायला शिकविली आणि विशेष म्हणजे नातवानी एका दिवसात ती शिकून घेतली. एकदा असे झाले की, रात्री ११ वाजले तरी श्रींना झोप आली नाही म्हणून आजोबांनी "अनन्याश्र्चिन्तयन्तो मामू ये जनाः पर्युपासते । तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्‍ ॥ हा गीतेतील ( ९ / २२ ) श्र्लोक म्हटला. श्रींनी लगेच त्यांच्या पाठोपाठ तो श्र्लोक म्हटला. श्रींनी लगेच त्यांच्या पाठोपाठ तो श्र्लोक जसाच्या तसाच पण बोबडया वाणीने म्हणून दाखविला. आजोबा म्हणाले, " अरे, तू तर एकपाठीच आहेस !" दुपारी पंत विठठलमंदिरात पुराण श्रवणास बसत. तेथे हा बालक आपणास सर्व काही समजते म्हणून श्रवणास बसे. सायंकाळी जेवण झाल्यावर आजोबा आपल्या नातवास पुराणातील देवभक्तांच्या प्रेमळ गोष्टी सांगत. गोष्टी संपताच भजन सुरू होई. तेव्हा हा छोटा गणपतीही आपल्या पायातील वाळ्यांच्या आवाजाने दुड्दुड नृत्य करीत व टाळ्यांच्या गजरात बोबडया बोलाने "लाम किष्ण हाली ’ असे म्हणे, तोच त्याला पंतांनी घेऊन कुरवाळावे असे नित्यशः चाले. तैशी दशेची वाट न पाहतां । वयसेचिया गावा न येता । बाळपणीच सर्वज्ञता । वरी तयाते ॥ ही ज्ञानेश्र्वर महाराजांची ओवी डोळ्यांपुढे उभी राहते. पूर्व संस्काराने ज्याच्या बुद्धीवर हरिभक्तीचे द्दढतर संस्कार उमटलेले आहेत त्याला अशा अलौकिक बुद्धीची काय किंमत ? पंतांनी स्नान केले की हा स्नान करायला जाई. त्यांनी संध्या केली की, याची सुरु होई. त्यांच्या पूजेच्या अगोदर हा शंख घंटा काढून तयार. जसा काही मुलगा मोठा देवभक्त ! हे त्याने कौतुक पाहून आजा-आजीच्या नेत्रांतून प्रेमाश्रूंचे लोट वाहात व हा बाळ आपल्या बापापेक्षा सवाई निघून आपल्या कुळाचे यश दिगंत गाजवील, असे त्यांना नित्य वाटे.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली