Get it on Google Play
Download on the App Store

विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल.

१८८३
"विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल.
हाती चौपदरी असता समाधान ही त्याची जहागीर."
इंदूरला श्रींचा बरेच दिवस मुक्काम झाला, त्यांची वाट पाहून गीताबाईंनी, दादोबा व गोपाळ नावाच्या त्यांच्या नातेवाईकांना श्रींना घेऊन येण्यासाठी इंदूरला पाठविले. ते आल्यावर श्रींनी त्यांचा मोठा आदरसत्कार करून काही दिवस ठेवून घेतले. दादोबांनी आईचा निरोप श्रींना सांगितल्यावर श्रींच्या डोळ्यांना पाणी आले, व आपण आता लवकर जाऊया म्हणून त्यांनी त्यांना आश्र्वासन दिले. पण तेथील आनंदामध्ये दादोबा लवकरच परत जाण्याचे विसरले. १०/१२ दिवसांनी श्रीच दादोबांना म्हणाले, "अरे, दादोबा, आपल्याला घरी परत जायचे ना ? आपण आता उद्याच निघू." श्री इंदूर सोडणार ही बातती पसरायला वेळ लागला नाही. लगेचच भेटायला येणार्‍या मंडळींची गर्दी उडाली. श्रींना जेवायलाही अवकाश राहिला नाही. म्हणून आणखी एक दिवस मुक्काम वाढला. जीजीबाई लगेच श्रींच्याकडे आली व म्हणाली, "महाराज, मला आपण तुकामाईंकडे नेण्याचे वचन दिले आहे, आपण एकदा येथून गेला की पुन्हा इकडे केव्ह याल नेम नाही, म्हणून मी आपल्या बरोबर येणार आहे." तिचे हे बोलणे ऐकून भैय्यासाहेब म्हणाले, " महाराज, मला देखील आपण घेऊन चला. श्रीतुकामाईंचे दर्शन मला करून द्या." श्रींनी दोघांनाही आपल्याबरोबर घेतले आणि सर्व मंडळींनी इंदूर सोडले. त्यानंतर जवळजवळ एक महिन्याने मुक्काम करीत करीत येहळेगावला पोचले. श्रींनी बरोबरच्या मंडळींना सक्त ताकीद दिली होती की, येहळेगावला असेपर्यंत कोणीही त्यांना ’ महाराज ’ म्हणायचे नाही आणि कोणीही त्यांच्या पाया पडायचे नाही. श्रीतुकामाईंना पाहिल्या बरोबर जीजीबाई, भैय्यासाहेब व श्रींनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला. श्रीतुकामाई जीजीबाईला म्हणाले,
" भली परीक्षा केलीस. पण फसली नाहीस ना ? त्याला मुंगळ्यासारखी चिकटून बैस, तुझे कल्याण होईल." भैय्यासाहेबांकडे वळून म्हणाले, " विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा, त्याची जहागीर तुला मिळेल. हाती चौपदरी असता समाधान ही त्याची जहागीर." याप्रमाणे जीजीबाई व भैय्यासाहेब यांना श्रीतुकामाईंच्या पायावर घातल्यानंतर श्री त्यांच्यासह गोंदवल्यास आले. आठ पंधरा दिवस तेथे राहिल्यावर ती मंडली परत गेली. श्री इंदूरमध्ये प्रथम प्रकट झाले खरे, तेथे गोंदवल्याबद्दल कोणासही काही ठाऊक नव्हेत. जेव्हा दादोबा आणि गोपाळ त्यांना परत घेऊन जाण्यास आले, त्यावेळी इंदूरच्या लोकांना गोंदवल्याची माहिती झाली. श्रींनी आपला बराचसा काळ पर्यटन करण्यामध्ये घालवला. बहुधा एकटयानेच ते संचार करीत.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली