Get it on Google Play
Download on the App Store

"घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो."

१९०४
"घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो."
श्री. भाऊसाहेब केतकर श्रींना गदगला भेटले व त्यांच्याशी बोलणे झाल्याप्रमाणे त्यांनी सर्व भार मनोमन श्रींवर टाकला. त्यावेळी भाऊसाहेबांचे तृतीय चिरंजीव रामचंद्र ऊर्फ तात्या यांचे लग्न सांगलीचे श्रीमंत व सज्जन गृहस्थ श्री. गोखले यांच्या द्वितीय कन्येशी ठरले. श्रींनी मुलीला पसंत केले. सकाळचा मुहूर्त ठरला. पण श्री सकाळीच आपल्या खोलीमध्ये जाऊन निजले. लग्नाची वेळ जवळ येत चालली, पण लग्नाची काहीच हालचाल दिसेना, तेव्हा भाऊसाहेब म्हणाले, " श्री उठल्याशिवाय लग्न लागणार नाही व कोणी त्यांना उठवणार नाही." मुहूर्त टळला, तेव्हा भाऊसाहेब, गोखले यांना म्हणाले, "आपणास पसंत नसेल तर योग्य दिसेल तसे आपण कर. मला त्याचे वाईट वाटणार नाही. " गोखल्यांनी मुलगी भाऊसाहेबांच्याच घरात देण्याचे ठरवल्याने सर्वजण श्रींच्या उठण्याची वाट पहात स्वस्थ बसले. संध्याकाळी ७ वाजून गेल्यावर श्री खोलीतून बाहेर आले व म्हणाले,"भाऊसाहेब, आपल्या घरी लग्न आहे ना  ? तुम्ही मला कसे उठवले नाही, बरे, आता लवकर आटपा.नवर्‍या मुलासाठी श्रींचा बत्ताशा घोडा शृंगारुन आणला. तात्यांना घोड्यावर बसवले, श्रींनी स्वत: लगाम धरला. धार्मिक विधी उरकायला रात्रीचे १२ वाजले. (ती"अमृतवेळ" होती असे ज्योतिषांनी नंतर सांगितले.) याप्रमाणे ९ मार्च १९०४ (फाल्गुन वद्य अष्टमी शके १८२५) रोजी लग्न लागले. लग्नानंतर भाऊसाहेबांनी पेन्शन घेतले व सहकुटुंब गोंदवल्यास येऊन राहिले.श्रींच्याकडे अक्षरश: हजारो लोक येऊन जात. श्रींच्या पुढे किंवा रामाच्या पुढे अनेक लोक पैसे, फळे, वस्त्रे, दागिने, ग्रंथ वगैरे ठेवत. श्री लगेच त्या वस्तू, कोणाला तरी वाटून टाकीत. आईसाहेबांपुढे आलेल्या वस्तू, वस्त्रे त्या सांभाळून ठेवीत. या वस्तूंनी आईसाहेबांच्या दोन ट्रंका भराव्या. श्रींच्या ही गोष्ट लक्षात आली. ते एकदोनदा म्हणाले," लोक जसे आपल्याला आपण व मागता देतात तसे आपण देखील आप्त-इष्टांना व गरीब लोकांना ते मागत नसता आपल्याजवळच्या वस्तू द्याव्या." पुढे काही दिवसांनी आईसाहेबांना सपाटून ताप आला, खोकला झाला. त्यांची अवस्था कठीण झाली. तेव्हा श्रींनी त्यांना रामाचे तीर्थ पाजले व नंतर खाली घोंगडीवर निजविले व म्हणाले, "हे बघ, आता तुझा नेम नाही. तू तुझ्याजवळ जे साठवून ठेवले आहेस ते गरीब स्त्री-पुरुषांना दान देऊन टाक."लगेच श्रींनी भटजींकडून संकल्प सांगून आईसाहेबांच्या हातून उकद सोडविले. ट्रंकेतील साठविलेल्या सर्व वस्तू श्रींनी स्वत: गरीब सुवासिनींना वाटून टाकल्या. अंगावरच्या वस्त्रशिवाय काही शिल्लक ठेवले नाही. काही वेळाने आईसाहेबांना मोठी ओकारी येऊन खूप कफ पडला, घाम येऊन ताप कमी झाला. काही दिवसांनी त्यांची तब्येत पूर्णपणे सुधारली. श्री म्हणाले, "जगामध्ये घडणारे सर्व अपमृत्यू टाळता येण्यासारखे असतात, त्याला २/३ उपाय आहेत. एक उपाय म्हणजे मरणोन्मुख माणसावरुन लहान मूल ओवाळून टाकतात, याने तो मनुष्य जगतो पण मूल मरते. हा अघोरी उपाय आहे. द्सरा उपाय म्हणजे मरणार्‍या माणसासाठी इतर कोणी अगदी मनापासून तयार मरायला होणे. उदा. मुलासाठी आई किंवा नवर्‍यासाठी बायको किंवा मालकासाठी नोकर आपला प्राण देतात. हा उपाय म्हणजे खरा, पण इतके प्रेम सहसा आढळत नाही. तिसरा उपाय म्हणजे आपल्या देहासकट सर्वस्वाचे दान करणे. घर-दार, पैसा-अडका, भांडी-कुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पण करणे. यामुळे अपमृत्यू टळू शकतो. कर्नाटकातील चिंतामणी भट या नावाचा एक सात्त्विक दशग्रंथी वैदिक विप्र होता. त्याला भयंकर पोटदुखी होती. थोडेसे अन्न खाल्ले तरी प्राणांतिक वेदना होत.अनेक औषधे, काढे वगैरे घेऊन पाहिले. पण त्यांचा काही उपयोग झाला नाही. श्रींचे नाग ऐकून तो गोंदवल्यास आला. त्या दिवशी कोणीतरी रामाला नैवेद्य केला असल्याने जेवणास उशीर झाला होता. चिंतामणी भटजी आल्याबरोबर श्रींच्या दर्शनास आले. त्यावर श्री म्हणाले, " चला लवकर स्नान करुन पानावर बसा" त्यावर भटजी म्हणाले, " अन्नाशी माझे वैर आहे, अन्नाने मला प्राणांतिक वेदना होतात." त्यावर श्री म्हणाले,"हे माझ्या घरचे अन्न नाही. हा रामाचा प्रसाद आहे, तुम्ही पोटभर जेवा, भिऊ नका." त्याप्रमाणे भटजी भीत भीत पोटभर जेवले. काय होईल ते होईल. मेलो तर साधूजवळ मरेन. श्रींनी आग्रह करुन त्याला पोटभर जेवायला घातले. पोट दुखण्याची वाट पाहणार्‍या भटजींची पोटदुखी त्या दिवसापासून कायमची थांबली.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली