Get it on Google Play
Download on the App Store

भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे.

१८८४
भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे, तेव्हा या भूमीमध्ये अनेक ठिकाणी अनेक लोक भगवंताच्या प्राप्तीसाठी विविध प्रकारची साधने करण्यात आपले आयुष्य वेचीत असतात.
वयाच्या नवव्या वर्षी श्री प्रथम घराच्या बाहेर पडले. एका लंगोटीशिवाय त्यांच्याजवळ काही नसे. भारतवर्षामधील सर्व तीर्थे त्यांनी पाहिली व अनेक वेळा काशीची कावड रामेश्वरला नेली. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे, तेव्हा या भूमीमध्ये अनेक ठिकाणी अनेक लोक भगवंताच्या प्राप्तीसाठी अनेक प्रकारची साधने करण्यात आपले आयुष्य वेचीत असतात. परमार्थाकडे खरी प्रवृत्ती असणारे किती लोक येथे अस्तित्वात आहेत हे पाहण्यासाठी श्री सबंध भारतवर्ष तीन वेळा पायी हिंडले. आपल्या देशातील अनेक खेडयांची व गावांची त्यांनी माहिती होती. गोंदवल्यास येऊन राहिल्यावर एखाद्या गावची गोष्ट निघाली की लगेच श्री सांगत, " मला हे गाव माहीत आहे. लहानपणी फिरत फिरत मी येथे गेलो होतो, तेथे अमुक प्रकारचे मंदिर आहे, तेथली घरे अमुक प्रकारची आहेत, तेथे अमका मनुष्य असा होता " वगैरे. एकदा प्रसिद्ध वेदान्ती बाबा गर्दे त्यांना भेटण्यास गदगला आले. त्यांनी श्रींना नमस्कार केल्यावर भाऊसाहेब केतकर त्यांची ओळख करून देऊ लागले. त्यावेळी श्री बोलले, "मी यांना पाहिले आहे, बाबा, अमक्या वर्षी तुम्ही विजापूरला मास्तर होता. एके दिवशी दुपारी बारा वाजता तुम्ही वर्गात शिकवीत होता. तेव्हा मी बाहेरून तुम्हाला खिडकीतून पाहून गेलो." इतक्या अफाट पर्यटनात अक्षरशः लाखो लोकांशी त्यांचा संबंध आला. त्यांना "आपण कोण ?" म्हणून विचारणारेही काही लोक भेटत. "मी जंगम आहे." असे श्री त्यांना उत्तर देत. जुन्या शास्त्रीय पद्धतीने वेदान्ताचा बारान्‌बारा वर्षे अभ्यास केल्यावर तोंडाने "शिवोऽगम्‍ " म्हणत विषय भोगणार्‍या कित्येक वेदांत्यांना व संन्याशांना त्यांनी भगवंताच्या नामाला लावले. तसेच कर्मकांड हेच जीवित सर्वस्व मानून भगवंताच्या भजनाला तुच्छ लेखणार्‍या अनेक वैदिक विद्वानांना त्यांनी हातात माळ घेऊन रामनामाचा जप करायला लावले. पुष्कळदा श्री अशी गंमत करीत की, त्यांना भेटण्यासाठी येत असलेला मनुष्य गोंदवल्याच्या जवळ आला म्हणजे ते पूर्वी त्याच्या गावाला गेले असताना घडलेली हकिकत बरोबरच्या मंडळींना सांगण्यास आरंभ करीत. ती सांगून संपते न संपते इतक्यात तो मनुष्य येऊन पोचायचा. तो आला की लगेच श्री म्हणत, "बघ हे गृहस्थ त्या गावाचेच आहेत, मी आता सांगितलेली हकिकत खरी आहे की नाही हे त्यांना विचारा." श्री प्रवासात असताना हजारो लोकांनी त्यांना गुरुत्त्व दिले, परंतु त्यांपैकी पुष्कळांना श्री कोण व कोठले हे माहीत नसल्याने ते लोक गोंदवल्याला आलेच नाहीत. काशीमध्ये व अयोध्येमध्ये श्रींना "दख्खन का साधू " असे म्हणत. श्री गोंदवल्यास येऊन राहिल्यावर अनेकांना त्यांची खरी ओळख होऊ लागली.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली