Get it on Google Play
Download on the App Store

"महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे."

१८६५
"महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा.
मी आपल्याला शरण आहे."
कलकत्त्याच्या हरिहाटानंतर नर्मदेच्या काठाकाठाने प्रवास करीत श्री इंदूरला आले. त्यावेळी श्रींची अवस्था फार विलक्षण होती सहजबोलता बोलता त्यांची समाधी लागत असे. अशी समाधी लागली म्हणजे त्यांचे शरीर लाकडासारखे होई व पुष्कळ काळपर्यंत ते सांभाळावे लागे. संध्याकाळी गावाबाहेरच्या शेतात गाई चस्त होत्या, जवळच पाण्याचे डबके होते. एका मुलाशी बोलता बोलता श्रींची समाधी लागली. अंधार पडू लागला. वाटेने एक गवळी त्याच्या घरी परतत असता चिखलात कोण बसले आहे हे पाहण्यासाठी तो श्रींच्या जवळ आला. त्याने स्वच्छ पाण्याने श्रींना धुवून काढले व जवळच्याच एका मारुतीच्या मंदिरात श्रींना उचलून नेऊन ठेवले. इंदूरमधील एक श्रीमंत इनामदार रोज मारुतीमंदिरात दर्शनाला येत व नंतर आपल्या बागेत जाऊन विश्रांती घेत. नित्याप्रमाणे ते दर्शनाला आले असता श्री त्यांच्या द्दष्टीस पडले व हा कोणी सिद्ध पुरुष आहे असे वाटून त्यांनी श्रींना साष्टांग नमस्कार घातला व आमच्या बागेमध्ये रहायला या अशी विनंती केली. ते श्रींना बागेत घेऊन गेले. तेथे तो गवळी रोजश्रींच्या दर्शनाला यायचा व सकाळ संध्याकाळी आपल्या गायीचे धारोष्ण दूध प्यायला द्यायचा. इंदूरमध्ये हाच श्रींचा पहिला शिष्य. इनामदारांच्या बायकेने "या बैराग्याला आपल्या बागेत कशाला आणलेत, हे लोक फार लबाड असतात, मीच त्याची परीक्षा घेते " असे म्हणून तिखटाचे गोळे करून घेऊन आली. "इनामदारांनी तुमच्यासाठी लाडू पाठविले आहेत ते खा व मग हे पाणी प्या " असे म्हणून जीजींनी ( इनामदारांच्या बायकोने ) ते लाडू श्रींना खायला घातले. श्रींनी ते सर्व लाडू खाऊन "माय, लाडू किती छान झाले, मला आणखी खायला घेऊन येईन " जीजीच्या मनात एक भयंकर कल्पना आली. स्वयंपाक घरातील शेगडीमधील फुललेले निखारे परातीत घालून जीजी श्रींच्याकडे आली म्हणाली "आजहा नवीन पदार्थ आणला आहे, पोटभर खा." श्री तिच्याकडे पाहून हसले व चिमटयाने एक एक निखारा उचलून तोंडात टाकू लागले., सर्व निखारे संपल्यावर जीजींकडे पहात श्री म्हणाले, "माय बरे लागतात, आणखी थोडे असले तर दे " असे म्हणून हात पुढे पसरला. जीजींचा चेहरा खर्रकन उतरला, तोंडाला कोरड पडली, हातपाय कापू लागले, तिची बोबडी वळली, डोळ्यांतून पाणी वाहू लागले. श्रींकडे वळून म्हणाली, "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." असे म्हणून श्रींचे पाय धरले. श्री म्हणाले, "बाळ कोण मनुष्य कसा आहे हे आपल्याला कळत नाही, म्हणून अशी कोणाची परीक्षा करू नये. संतांची परीक्षा निराळ्या प्रकारे करायची असते. आता झाले ते झाले, ते सगळे विसरून जा. आजपासून नामस्मरण करण्यास आरंभ कर. राम तुझे कल्याण करील हे निश्र्चित समज " नंतर जीजीने श्रींना आपल्या घरी नेले व एखाद्या राजासारखी त्यांची व ताईची खूप गटटी जमली. अहोरात्र ती त्यांच्यापाशी असायची. एके दिवशी एक बैरागी श्रींच्या दर्शनाला आला, पण श्री ताईबरोबर खेळताना पाहून आपण अयोग्य माणसाकडे आलो असे पाहून तो परत जाऊ लागल. श्रींनी त्यांना थांबवून घेतले. त्यांची सर्व हकिकत ऐकून घेतली व तुमच्या काही शंका असल्यास या ताईला विचारा असे म्हणून तिच्या पाठीवर थाप मारून ’समाधी लाव ’ असे सांगितले व हिला आपले काहीही प्रश्र विचारा असे बैराग्याला सांगितले. सगळ्या प्रश्रांची खडाखड उत्तरे देऊन, त्या बैराग्याचे गाडे कुठे अडत होते तेही तिने सांगितले. त्यावर बैरागी एकदम थक्क झाला. व श्रींचे पाय पकडून "माला क्षमा करा. माझे पूर्ण समाधान झाले. मी आनंदाने जातो म्हणाले." श्रींची त्याला आपल्याजवळ काही दिवस ठेवून घेतले व योगाच्या क्रिया दाखविल्या व नंतर पाठवून दिले.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली