Get it on Google Play
Download on the App Store

"चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस."

१८७१
"चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस."
पंढरपूरहून परत आल्यावर काही दिवसांनी श्री परत आपल्या गुरूंच्या दर्शनासाठी जाण्याची भाषा बोलू लागले. आईने जेव्हा हे ऐकले तेव्हा ती म्हणाली, "गणू, तुला काय वाटेल ते कर, पण जिकडे जाशील तिकडे आपल्या बायकोला घेऊन जा. तिला घरी ठेवून तू एकटा जाऊ नकोस." सरस्वतीने हे ऐकले. खरं म्हणजे सरस्वतीलादेखील श्रींच्या संगतीची खरी चटक लागली होती म्हणून ते जायला निघतील तेव्हा आपण त्यांच्या बरोबर जायचे असा तिने मनाशी निश्र्चय केला. श्री अनेक प्रसंगी श्रीतुकामाईच्या गोष्टी सांगत त्या ऐकून त्यांचे दर्शन घ्यायला येहळेगावला आपणही श्रींबरोबर जावे असे तिला मनापासून वाटे. श्रींचे ज्यावेळी तिकडे जायचे ठयले तेव्हा श्रींनी तिची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. पण ती घरी राहायला बिलकूल तयार होईना. प्रवासाच्या कष्टांचे आणि वाटेमध्ये येणार्‍या संकटांचे श्रींनी पुष्कळ वर्णन करून सांगितले. पण तिचा निश्र्चय ढळेना.
शेवटी एके दिवशी मध्यरात्री उठून श्री ऐकदम जाण्यास निघाले. त्यांच्या मागोमाग सरस्वतीपण तशीच निघाली. श्री तिच्यावर रागावले पण ती गप्पच राहिलि. श्री पळू लागले, तीही त्यांच्या मागोमाग पळू राहिली. शेवटी श्रींनी आपल्या पायानी मागच्या मागे तिला दगड फेकून मारण्यास सुरुवात केली, अर्थात ते दगड श्री अशा खुबीने मारीत की ते तिच्या अगदी जवळूत जावेत, पण तिला मात्र लागू नयेत. तरी देखील सरस्वती निर्भयपणे त्यांच्यामागे पळतच राहिली. श्री काही वेळाने थांबले व प्रसन्न होऊन सरस्वतीला म्हणाले, "चल, तू आता तुकामाईच्या दर्शनाला खरी लायक आहेस." नंतर सावकाशपणे मजल दरमजल करीत श्री येहळेगावला पोहोचले. सुदैवाने त्यावेळी श्रीतुकामाई घरीच होते. त्यांना पाहिल्याबरोबर श्रींनी साष्टांग नमस्कार घातला. लगेच सरस्वतीने नमस्कार केला. त्या दोघांना पाहून तुकामाईंना इतका आनंद झाला की त्यांनी मुद्दाम साखर मागवून घेतली आणि आपल्या हाताने दोघांच्या तोंडात घातली. त्यांनी त्या दोघांना आठ दिवस ठेवून घेतले आणि कधी कोणाचे केले नव्हते असे श्रींचे विशेषतः सुनबाईंचे कौतुक केले. तेथून निघायच्या दिवशी सरस्वती पाया पडायला आली त्यावेळी तुकामाईने तिला सहज विचारले, "माय, तुला काय पाहिजे ?" ती म्हणाली, "यांच्यासारखा मुलगा मला व्हावा एवढीच माझी इच्छा आहे." हे तिचे मागणे ऐकून गुरु व शिष्य दोघेही हंसले. श्रीतुकामाई "तथास्तु " असे बोलले आणि खणा नारळांनी तिची ओटी भरली व दोघांना मोठया प्रेमाने निरोप दिला.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली