Get it on Google Play
Download on the App Store

त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे

१८६६
"त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे,
बोलण्यांत तो मोठा चतुर आहे आणि तो अखंड रामनाम घेतो."
इंदूरला येऊन श्रींना सहा महिने होत आले होते. येथे आता जास्त राहण्याचे कारण नाही असे पाहून श्रींनी काहीतरी निमित्त काढून जीजीबाई, ताई यांचा प्रेमाने निरोप घेऊन इंदूर सोडले. वाटेतील मोठी तीर्थे पहात श्री गोंदवल्यास आले, बरोबर चार बैरागी शिष्य होते. नदीकाठच्या मारुतीच्या मंदिरात त्यांनी मुक्काम ठेवला. तेजःपुंज मजबूत शरीर, डोक्यावर एखाद्या ऋषीप्रमाणे शोभणार्‍या जटा, छान वाढलेली दाढी, प्रसन्न मुद्रा, पाणीदार डोळे, एका हातात कुबडी व दुसर्‍या हातात रुद्राक्षाची माळ, कमरेला कौपीन, पायांत खडावा, सर्वांगाला भरम अशी श्रींची तरुण मूर्ती पाहिल्यावर कोणाच्याही मनात त्यांच्याबद्दल पूज्य भाव उत्पन्न होत असे. बरोबरच्या शिष्यांनी मंदिराच्या ओटयावर धुनी पेटवली आणि मुख्य गोसावीबुवा म्हणजे आमचे श्री, सिद्धासन घालून ध्यानाला बसले. मारुतीमंदिरात कोणी मोठा महात्मा आला आहे ही वार्ता गावामध्ये पसरण्यास वेळ लागला नाही. गावचे सर्व लोक दर्शनास येऊ लागले. संध्याकाळी गीताबाई व रावजी हेही तेथे आले. त्यांना पाहताच श्रींनी मनोमन नमस्कार केला. दोघांनी श्रींना बिलकुल ओळखले नाही. गीताबाई श्रींना म्हणाल्या, "गोसावीबुवा, आजाआठ वर्षें झाली, माझा मुलगा बाराव्या वर्षी घरातून निघून गेला, तो तुम्हाला कोठे आढळला का ?" त्यावर गोसावीबुवांनी विचारले, "माय, मुलगा कसा आहे ?" त्यावर गीताबाई म्हणाल्या, "त्याच्या तीन खुणा आहेत, तो दिसायला मोठा सुंदर आहे, बोलण्यात तो मोठा चतुर आहे आणि तो अखंड रामनाम घेतो " त्यावर गोसावीबुवा म्हणाले, "होय, असा मुलगा मी पाहिला आहे, तो सध्या तीर्थयात्रा करीत फिरत आहे, तो सुखरूप आहे, तुम्ही नामस्मरण करीत रहा म्हणजे एका वर्षाने तो तुम्हाला नक्की भेटेल." गीताबाईंच्या मनाला फार समाधान झाले आणि त्या आनंदाने घरी गेल्या. रात्री गावातील दाजी पाटील आणि आण्णा बारसवडेकर बैरागीबुवांजवळ हिरवा तंबाखू ( गांजा ) फुकट ओढायला मिळेल म्हणून मारुतीमंदिरात आले. "या बसा " झाल्यावर तुम्ही कुठले काय वगैरे चौकशी केल्यावर व त्यांच्या बोलण्या-चालण्यावरून व तुटक्या कानावरून हा गोसावी दुसरा कोणी नसून आपला गणूबुवाच असावा असा तर्क दोघांनी बांधला व दुसर्‍या दिवशी रावजींना जाऊन सांगावे असे ठरवून दोघे आपल्या घरी निघून गेले. ही गोष्ट श्रींच्या लक्षात येण्यास वेळ लागला नाही, म्हणून दुसर्‍या दिवशी पहाटेच गावातले कोणी उठण्याच्या आधीच श्री तेथून निघून गेले. गोंदवल्याहून श्री खातवळला आपल्या सासुरवाडीस गेले. तेथेही अनेक लोक श्रींच्या दर्शनाला येऊन गेले. ते कोणी त्रिकालज्ञ महंत आहेत असे जाणून श्रींच्या सासुबाईही आपल्या मुलीला घेऊन गोसावीबुवांच्या दर्शनाला गेल्या. श्रींना पाहिल्याबरोबर दोघींच्या मनामध्ये त्यांच्याविषयी आपलेपणा वाटू लागला. गर्दी कमी झाल्यावर गोसावीबुवांना सासुबाई म्हणाल्या, "ही माझी मुलगी. ९/१० बर्षांपूर्वी हिचे लग्न झाले, पण हिचे घरधनी नाहीसे झाले. ते परतून केव्हा येतील हे कृपा करून सांगा." त्यावर गोसावीबुवा म्हणाले, "ते सुखरूप आहेत, तिने काळजी करू नये, फक्त अखंड नामस्मरण करावे. तो लवकर परत येईल, तिचा संसार चांगला होईल " हे बोलणे ऐकून दोघींच्या मनाचे समाधान झाले व दोघी आनंदाने घरी गेल्या.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली