Get it on Google Play
Download on the App Store

अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे.

१९००
अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे.
अखंड नाम स्वतः घ्यावे हे आपले कर्तव्या आहे.
श्री. काशीनाथ भैय्या सावकार यांनी हर्द्याला पट्टाभिषिक्त रामाचे छान मंदिर बांधले होते, त्याच्या उद्‍घाटनास त्यांनी श्रींना आवर्जून बोलावले होते. श्री प्रथम इंदूरला गेले. तेथे श्रीब्रह्यानंदांचे श्रींना कर्नाटकात बेलधडीस रामनवमीसाठी येण्यासंबंधी पत्र आले. श्रींनी ब्रह्यानंदांना अतिशय उद्‍बोधक पत्र पाठविले. ते पुढीलप्रमाणे आहे. "शब्दज्ञान व जगाचे महत्त्व आणि निंदा हे दोन्ही उपयोगाचे नाही. तू तर तशाचा सहवास करू नये. नास्ति कुतर्कासी वाद न करिता, अहंभावरहित, व्यवहाराचा संबंध न ठेवता, अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. अखंड नाम स्वतः घ्यावे हे आपले कर्तव्या आहे, मी आपणास काय लिहावे असे नाही. पण सूचनार्थ लिहिले आहे." ( या पत्राची मूळ हस्तलिखित प्रत पाहता येईल ) श्रींनी हर्द्याला पट्टाभिषिक्त रामरायाची स्थापना केली. श्रीरामरायाचे ध्यान अतिशय सुंदर आहे. पुढे श्रीमहाराज हर्द्याहून गोंदवल्यास आले. त्यावेळी काळे नावाचे एक सरकारी अधिकार कामासाठी फिरतीवर असताना गोंदवल्यास आले. बरोबर त्यांची पत्नीही होती. ती पंगू व परावलंबी होती. श्रींचे नाव ऐकून त्यांच्या दर्शनाला ते दोघे मंदिरात आले. नेहमीच्या पद्धतीप्रमाणे श्रींनी त्यांचा आदरसत्कार केला व मुद्दाम येण्याचे कारण विचारले. काळे यांनी बायकोच्या रोगाची सर्व हकिकत सांगितली. तेव्हा श्रींनी तिला बरे वाटेला असे सांगून एका काढयाची औषधे सांगितली. त्यांपैकी एक औषध कोणालाच माहीत नव्हते म्हणून काळे यांनी त्या औषधाविषयी श्रींनाच विचारले.
त्यावर श्री म्हणाले, "ते औषध वाटेचा वाटसरू सांगेल." काळे गप्प बसले. बाईंना श्री म्हणाले, "माय, पुन्हा याला तेव्हा आपल्या पायांनी चालत याल." काळे टांग्यात बसले व श्रींचा निरोप घेतल्यावर टांगा चालू झाला. २/३ मैल गेल्यावर एक कुणबी रस्त्याच्या मधून चालला होता, त्याला
टांगेवाल्याने हटकले, त्यावर तो कुणबी टांग्याजवळ आला व त्याने काळे यांना औषधाचे दुसरे नाव सांगितले व चालता झाला. श्रींच्या प्रत्येक शब्दाला काय किंमत असते याची काळे यांना कल्पना आली. पुढे आपल्या गावी जाऊन तो काढा काही दिवस घेतल्यावर त्या बाईचे पाय सुटले, ती व्यवस्थित चालायला लागली. पुढे काळे पतिपत्नी गोंदवल्यास श्रींना भेटायला गेले व त्यांच्या पायावर डोके ठेवले. काळे यांचा स्वभाव जरा तापट व वादविवादप्रिय होता. श्रींशी परिचय वाढल्यावर त्यांनी आपल्याला अनुग्रह व्हावा अशी इच्छा प्रगट केली. त्यावर श्री म्हणाले, "पतिव्रतेचे लग्न जसे एकदाच लागते तसे अनुग्रह व्हायचा असतो, त्यावर माणसाने घाई करू नये, गुरूची चांगली परीक्षा करावी, त्याच्या ज्ञानाबद्दल खात्री करून घ्यावी आणि मगच त्याला गुरुपद द्यावे." त्यावर काळे म्हणाले, "मला देवाकडूनच अनुग्रह पाहिजे. माणसाकडून नको, आपण तेवढी व्यवस्था करावी." श्री म्हणाले, "राम करेल तर तसेही घडेल." या गोष्टीला ८/१५ दिवस झाल्यावर काळे श्रींना आठवण करू लागले. एके दिवशी श्रींनी त्यांना स्नान करून लागले. एके दिवशी श्रींनी त्यांना स्नान करून येण्यास सांगितले. स्नान करून आल्यावर श्रींनी त्यांना रामाची यथासांग पूजा करण्यास सांगितले. पूजेच्या शेवटी "रामा, तुझे नाम तूच मला दे." अशी प्रार्थना श्रींनी त्यांच्याकडून करवून घेतली. श्रींनी एका कागदावर "श्रीराम जयराम जय जय राम " असा मंत्र लिहून तो कागद मारुतीच्या तोंडाला चिकटवला आणि पाया पडून आपला उजवा कान त्याच्या तोंडाला लावा ’ असे काळे यांना सांगितले. काळे यांनी आपला कान मारुतीच्या तोंडाला लावला तेव्हा पहिली "श्रीराम " अशी अक्षरे स्पष्ट ऐकू आली. तितक्यात बाहेरच्या गलक्यामुळे मंत्राच्या पुढच्या भागाचे कुजबुजणे तेवढेच ऐकू आले. काळे यांना देवाचे नाव त्याच्याकडूनच आपल्याला मिळाले याचे पूर्ण समाधान वाटले व त्यांनी लगेच श्रींचे पाय धरले.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली