Get it on Google Play
Download on the App Store

"शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी"

"शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी"
श्री महाराजांचे आजोबा लिंगोपंत हे शुक्ल यजुर्वेदीय देशस्थ ब्राह्यण. यांचा जन्म गोंदवले येथे शके १७०० ( म्हणजे इ. स. १७७८ ) च्या  सुमारास झाला. कुळातील मूळपुरूष रुद्रोपंत. यांचे आडनाव घुगरदरे. हे मोठे भगवद्‍भक्त असून पंढरीची वारी अगदी नियमाने करीत. त्यांचा भागवत संप्रदाय होता. ( ’आमुचे कुळी पंढरीचा नेम । मुखी सदा नाम विठोबाचे ’ ) ते मुख्यतः शेती करीत. रुद्रोपंतांपासून चवथे पुरूष म्हणजे श्री महाराजांचे आजोबा, हे आपले गाव सोडून गोंदवल्यास येऊन राहिले. कुळकर्णीपणाची त्यांची वृत्ती होती. घरी कुळकर्णीपण असले तरी सांपत्तिक स्थिती बेताचीच होती. आपल्या आजोबांपासून चालत आलेली पंढरीची वारी ते नियमाने करीत. सात्त्विक स्वभावाबद्दल व मनाच्या उदारपणाबद्दल त्यांची ख्याती होती. शेतामध्ये स्वतः खपण्याचा त्यांचा परिपाठ असे. त्यांना झालेली पहिली तीन-चार मुले अल्पायुषी ठरली, म्हणून त्यांच्या पत्नीने शंकराची आराधना सुरू केली. तीन-चार वर्षे गेल्यावर मुलगा झाला. त्याचे नाव लिंगोपंत असे ठेवले. हे श्रीमहाराजांचे आजोबा. वयाच्या विसाव्या वर्षी लिंगोपंत कुळकर्णीपदाचे काम पाहू लागले.
लिंगोपंतांचा प्रपंच आदर्श होता. ते अत्यंत प्रामाणिक व परोपकारी होते. प्रापंचिक घडामोडींबरोबर परमेश्वराची भक्तीही मनापासून केली जात होती. ’पांडुरंग आमचे कुलदैवत । पांडुरंग आमुचे हित, गोत, चित्त ’ अशी द्दढतर श्रद्धा असून आषाढी - कार्तिकीची वारी सुरु होती. गळ्यात तुळशीची माळ असून ते मुद्रा लावीत. ’पांडुरंग पांडुरंग ’ असे नामस्मरण करण्याची त्यांना सवय होती. पंतांच्या सर्व गुणांस व योग्यतेस शोभेल अशी अत्यंत धार्मिक, देवभोळी व पतिसेवेविषयी तत्पर अशी सहचारिणी त्यांना मिळाली होती. एके दिवशी पंतांचे स्वप्नात प्रत्यक्ष पांडुरंग आले. त्यांनी पंतांना त्यांच्या मळ्यात नेले. तेथे एक विशिष्ट जागा दाखवून सांगितले ’तुला पंढरीला येऊन मला भेटणे म्हातारपणामुळे कठीण झाले आहे ना, याचे तुला वाईट वाटते म्हणून मीच तुझ्या घरी रहायला येत आहे. येथे खणून पहा म्हणजे मी सापडेन, देव दिसेनासे झाले व पंत जागे झाले. आपल्या सर्व मंडळींना झाले व पंत जागे झाले. आपल्या सर्व मंडळींना बोलावून पंत त्या मळ्याकडे जाण्यास निघाले. स्वप्नात दाखविलेल्या जागी बरोबरच्या लोकांनी खणण्यास सुरूवात केली. ३-४ हात खोदल्यावर खण्ण असा आवाज आला, तेथील माती बाजूला केल्यावर विठोबा-रखुमाईच्या सुंदर मूर्ती जणू काही कोणी नीट ठेवाव्यात अशा ठेवलेल्या आढळल्या.
" सदा माझे डोळा, जडो, जडो तुझी मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया " अशी स्तुती करुन पंतांनी आनंदाश्रू ढाळ्ले. नामस्मरणाच्या गजरात मोठया थाटाने त्या मूर्ती घरी आणून शुभमुहूर्तावर त्यांची स्थापना केली. सात दिवस भजन, कीर्तन, अत्रदान करून सर्व मंडळींना तृप्त केले. मूर्ती ज्या जागी सापडल्या तेथे आणखी खणल्यावर छान पाणी लागले, तिलाच ’विठोबाची विहीर ’ व त्या मळ्याला विठोबाचा मळा असे सर्व म्हणू लागले. पंतांच्या पत्नीचे नाव राधाबाई. हिचा सगळ्या घराला मोठा आधार असे. तिचा उदार व भोळा स्वभाव पाहून लोक तिला रूक्मिणी म्हणत. ती अत्यंत समाधानी व शांत स्वभावाची बाई होती. तिच्या पोटी श्रीमहाराजांचे वडील रावजी जन्मास आले. सहाव्या वर्षी लिंगोपंतांनी रावजीची थाटाने मुंज केली व बाराव्या वर्षी कलेढोणचे नारायणराव वाघमारे - इनामदार यांच्या मुलीशी लग्न लावून तिचे सासरचे नाव गीताबाई असे ठेवले. लिंगोपंतांनी रावजींना कुळकर्णीपणाचा सर्व व्यवहार शिकविला. तथापि त्यांचे चित्त प्रपंचात लागेना. ते नेहमी उदास असत. रावजींना एकान्तात बसून देवाची पूजाअर्चा, नामस्मरण व ध्यानधारणा करण्याची हौस असे. आपल्या नित्यनियमाच्या कांहीही आड आले तर ते रावजींना मुळीच खपत नसे. पहिल्यापासून रावजी गंभीर, अबोल व एकान्तप्रिय असल्याने लहानपणचे खेळ ते फारसे खेळले नाहींत. पुढे वयात आल्यावरही  पंतांसारखे कर्तबगार वडील डोक्यावर असल्याने आपल्या प्रपंचाकडे किंवा कुळकर्णीपणाच्या व्यवसायाकडे त्यांनी फारसे लक्ष दिले नाही. स्नानसंध्या, गायत्रीजप आणि नामस्मरण यामध्ये रावजींनी आपला काळ घालविला. अंतर्यामी ते अतिविरल व नेहमी पांडुरंगाच्या अनुसंधानामध्ये गुंतलेले असायचे. ते आजन्म कधी खोटे बोलले नाहीत, त्यांनी कधी कुणाला फसवले नाही आणि परद्रव्याला चुकून सुद्धा कधी हात लावला नाही. रावजी प्रपंचामध्ये फारसे लक्ष घालीत नसल्याने देण्याघेण्याचे पुष्कळसे व्यवहार गीताबाईंनाच पाहावे लागत. त्यामुळे प्रपंचाची बहुतेक सर्व जबाबदारी सूनबाईंच्या अंगावर पडली. घरात नेहमी पाहुणेमंडळी, नोकर-चाकर व गुरे-ढोरे या सर्वांच्याकडे लक्ष देऊन प्रत्येकाला काय हवे, काय नको हे गीताबाई मनापासून पहात. वागण्यामध्ये आर्जव असल्यामुळे कुणाशीही कधी कुरबुर झाली नाही. पतीला जे आवडेल तेच आपले प्रिय मानीत. स्वतःच्या घरचा व्याप सांभाळून गीताबाई गरीब कूटूंबांची बाळंतपणे करीत. त्यांना औषधपाणी, दूध-दही व कपडा पुरवीत. "तुम्हाला काही द्यावेसे वाटते" असे कोणी म्हटले म्हणजे, "अहो, मला काय कमी आहे ? तुम्ही रामनामाचा रोज एक हजार जप करायचा नियम करा, त्यात सर्व काही मला मिळाले." असे उत्तर देत. काही काळ गेल्यानंतर गीताबाईंना दिवस राहिले. गीताबाईंच्या वृत्तीमध्ये फरक पडू लागला.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली