Get it on Google Play
Download on the App Store

"पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो."

१८५९
"पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो."
श्री हैद्राबादमध्ये एका नदीच्या काठी एकांत स्थळी बसून विचार करीत होते. त्यांच्या मनात आले की, आपण गुरुशोधार्थ इतके हिंडलो मोठमोठे महात्मे पाहिले, सर्वांनी आशीर्वाद दिले; पण आपले काम करणारा निराळा आहे असे सांगितले, आता दक्षिण हिंदुस्थान पालथा घालावा." हे विचार चालू असता एकदम श्रीसमर्थ संप्रदायातले मोठे सत्पुरुष श्रीरामकृष्ण तेथे प्रकट झाले आणि बोलले, "बाळ, येहळेगावच्या तुकारामचैतन्यांकडे जा, तेथे तुझे पूर्ण समाधान होईल." हे शब्द बोलून ते पाहता पाहता नाहींसे झाले. श्री तेथून पैठण, जालना, नांदेडवरून येहळेगावला पोहोचले. श्री येण्याच्या अगोदर तीन दिवस तुकामाई सारखे ओरडत असत, "अरे चोर येणार येणार आणि सगळे लुटून नेणार. सांभाळा रे सांभाळा " श्री येहळेगावी आल्यावर तुकामाईंना सकाळपासून संध्याकाळपर्यंत शोधले परंतु त्यांचा काही पत्ता लागेना. तुकामाईंच्या घराच्या बाजूला श्री भिंतीला टेकून बसले होते. १५/२० मिनिटांनी तुकामाई आले. कमरेला लंगोटी, डोक्याला टोपडे, एका हातात चिलीम आणि दुसर्‍या हातात ऊसाचे दांडके घेतलेले. अशी मूर्ती पाहिल्याबरोबर श्री उभे राहिले. दोघांची द्दष्टाद्दष्ट होण्याचा अवकाश की, "तुझा खून करतो " असे ओरडून तुकामाईने उसाचे दांडके उगारले । आणि "मी पण माझा जीव देतो " असे बोलून श्रींनी त्यांच्या चरणांवर साष्टांग नमस्कार घातला. तुकामाईंना आनंदाचे भरते आले. श्रींना उचलून त्यांनी पोटाशी धरले व हात धरून घरी नेले. तुकामाईंना पाहताच श्रींच्या मनाला अत्यंत समाधान वाटले. आणि आपल्याला जे पाहिजे ते त्यांच्याजवळ खात्रीने मिळेल असा विश्र्वास उत्पत्र झाला. श्रींनी तुकामाईंची नऊ महिने अत्यंत चिकाटीने व मनापासून सेवा केली. श्रींची चित्तवॄत्ती त्यांच्याठायी पूर्णपणे चिकटली. एवढया लहान वयात गुरूंशी कसे वागावे हे त्यांना कसे कळले याचे राहून राहून आश्चर्य वाटते. जागृतीमध्ये व स्वप्नामध्ये एका तुकामाईवाचून अन्य कशाचेही चिंतन श्रींनी केले नाही. देहाभिमान शून्य झाल्याची तुकामाईंना खात्री झाल्यावर नऊ महिन्यांनंतर श्रींना रामनवमीच्या दिवशी विहिरीबर स्नान करून अशोक वृक्षाच्या खाली हात धरून आपल्यासमोर बसवले व म्हणाले, "मी तुला आजवर फार कष्ट दिले, पण पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले ते मी तुला या क्षणी देतो " असे सांगून श्रींच्या डोक्यावर त्यांनी हात ठेवला. श्रींना तक्ताळ समाधी लागली. समाधी उतरल्यावर त्यांचे "ब्रह्यचैतन्य " असे नाव ठेवले, आणि अत्यंत प्रेमाने आलिंगन दिले. "श्रीराम जयराम जयजय राम " हा त्रयोदशाक्षरी मंत्र जपून रामोपासना करावी, असे सांगून तुकामाईंनी श्रींना रामदासी दीक्षा दिली व अनुग्रह देण्याचा अधिकार दिला. " प्रापंचिक लोकांना, विशेषतः मध्यम स्थितीतल्या लोकांना प्रपंचामध्ये परमार्थ कसा करावा हे शिकव. राममंदिरांची स्थापन करून रामनामाचा प्रसार कर. माझे महत्त्व वाढविण्यापेक्षा श्रीसमर्थांचे महत्त्व वाढव. जे खरे दीन असतील त्यांची सेवा कर आणि सर्व ठिकाणी प्रेम बाढेल असा उपाय कर " इतक्या गोष्टी तुकामाईंनी श्रींना करण्यास सांगितल्या. या वेळी सूर्य बरोबर डोक्यावर आला होता. अनुग्रह झाल्यावर तुकामाई श्रींना म्हणाले, "आत्मज्ञान झाले तरी ते अंगामध्ये चांगले मुरले पाहिजे, त्यासाठी एकांतात राहून खोल आत्मचिंतन करायला पाहिजे. म्हणून तू आता हिमालयाकडे जा. तेथे थोडा काळ एकांतात घालवून मोठया तीर्थांचे दर्शन घे व मग आईबापांना आणि कुटुंबाला भेटण्यासाठी घरी जा."

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली