Get it on Google Play
Download on the App Store

"तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या."

१८६०-६१
"तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या."
गुरूंच्या आज्ञेप्रमाणे श्री जेव्हा हिमालयाकडे जाण्यास निघाले तेव्हा तुकामाई स्वतः उमरखेडपर्यंत त्यांना पोचविण्यास आले. आपल्या नव्या शिष्याला म्हणजे श्रींना, आपल्या गुरूंच्या म्हणजे चिन्मयानंदस्वामींच्या पायावर घालावे हा तुकामाईंचा मुख्य हेतू होता. ही गुरु-शिष्याची जोडी दर्शनासाठी स्वामींच्या समाधीपाशी गेली. त्यावेळी दोघांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत होत्या. गोचरस्वामी तेथे हजर होते. ( गोचर स्वामी हे श्रीतुकामाईंचे गुरूबंधू ) तुकामाई बोलले, "स्वामी, बाळाला आपल्या चरणापाशी आणला आहे. त्याला पदरात घ्यावा." असे म्हणून तुकामाईंनी आणि श्रींनी समाधीवर घातलेला मोठा हार श्रींच्या अंगावर पडला. हीच स्वामींची संमती व हाच त्यांचा प्रसाद अशी खात्री होऊन सर्व मंडळी बाहेर आली. श्रींना फारच आनंद झाला. तुकामाईंच्या पायांवर मस्तक ठेवून श्री पुढे जाण्यासाठी निघाले. सदूगुरूंची भेट व्हावी म्हणून वयाच्या बाराव्या वर्षी घर-दार वगैरे सर्व काही सोडून बाहेर पडलेले श्री, तुकामाईंची गाठ पडल्यावर नऊ महिने छायेप्रमाणे त्यांच्या सहवासाला राहिले. तुकामाईनीही त्यांच्यावर जिवापलीकडे प्रेम केले. श्री तेथून निघाले. ते मजल दरमजल करीत उज्जैनला आले. तेथील जवळच्या अरण्यात अगदी निर्मनुष्य ठिकाणी एका गुहेमध्ये श्री बरेच दिवस राहिले. श्रींचे तेथे वास्तव्य असेपर्यंत रोजसकाळ-संध्याकाळ एक गाय गुहेच्या तोंडापाशी येऊन उभी राही. श्रींची द्दष्टी तिच्याकडे वळल्याबरोबर तिने हंबरडा फोडला व आपला पान्हा सोडला. दूध खाली पडू लागल्यावर धार काढण्यासाठी जवळ भांडे नसल्याने तिच्या आचळाला तोंड लावून श्री पोटभर दूध प्याले. रोजसकाळ-संध्याकाळ ती गाय श्रींना दूध पाजून जात असे. पुढे उज्जैनहून निघाल्यावर श्री पुन्हा नैमिषारण्यात गेले. दोन वर्षांपूर्वी ( १३ व्या वर्षी ) श्री ज्या गुहेत रहात होते त्याच गुहेत श्री पुन्हा राहण्यास गेले. श्री दोन वर्षे येथे राहिले. या वेळी श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचा परिचय झाला. राघोबा नावाच्या विश्र्वासू नोकराला घेऊन ते नैमिषारण्यात रहात होते. श्रींची गाठ पडली व या गुहेपासून जवळच पण आणखी आतमध्ये असलेली मोठी गुहा श्रींनी त्यांना दाखवून दिली. श्रींनी त्यांना अभय दिले व म्हणाले, "येथे तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही, तुम्ही निर्धास्त असा. तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." श्रींच्या भेटीने त्यांचे औदासीन्य कमी झाले. जेव्हा जेव्हा श्री नैमिषारण्यात जात तेव्हा ते नानासाहेब पेशव्यांना भेटून येत. येथे मोठमोठे तपस्वी भगवंताच्या चिंतनात काळ घालवीत असतात. त्यांच्या दर्शनासाठी मी येथे येतो असे श्री म्हणत यावेळी श्रींची दोन वर्षें केव्हाच निघून गेली.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली