Get it on Google Play
Download on the App Store

अर्जुनाचे आवाहन

तीव्र शोकामुळे विचारशक्ती कुंठित झालेल्या युधिष्ठिराचे भाषण ऐकल्यावर सर्व पांडव सुन्न झाले. एवढे कष्ट व प्रयत्न करून व सर्वांनी एवढी पराक्रमाची शर्थ करून मिळविलेल्या राजलक्ष्मीचा असा त्याग करणे सर्वथैव अयोग्य होय असे सर्वांना वाटले. भीम, अर्जुन, नकुल, द्रौपदी व स्वतः द्वैपायन व्यास यांनी भावनेच्या आहारी गेलेल्या युधिष्ठिराला परोपरीने सांगितले- युद्ध करणे, शत्रूला धडा शिकविणे व अन्याय निवारण करणे हा क्षत्रियाचा धर्म आहे. अनेक बांधव, सुह्र्द, हितचिंतक तसेच विविध देशांच्या राजांनी पांडवांसाठी बलिदान दिले तेव्हा कुठे हा विजयाचा दिवस दिसला. तो विजय पराजय कसा मानता येईल? क्षत्रियधर्माचे पालन करुन राजे युद्धात प्राणास मुकले आहेत. त्यात युधिष्ठिराचा काय दोष? अर्जुनाने युधिष्ठिराला निक्षून सांगितले की राजकर्तव्याचा विचार न करता सिंहासनाचा त्याग करणे हे बुद्धिलाघवाचे लक्षण आहे. त्याचे हे विचार आधीच कळले असते तर पांडवांनी शस्त्र हातात घेतलेच नसते व कुणाचाही वध केला नसता. मोहाला बळी पड्न युधिष्ठिराने पुन्हा सर्वांना दुःखाच्या खाईत लोटू नये

अर्जुनाचे आवाहन

सोड पांडवा विचार मनिचा

नको असे बोलू शोकातुन

उभा आज विजयाच्या शिखरी

भूषव पृथ्वीचे सिंहासन ॥१॥

बलवत्तर शत्रूशी लढुनी

महापराक्रम तू गाजविला

धर्माने हे सर्व मिळविता

वनगमनाचे शब्द कशाला? ॥२॥

राज्य गिळोनी घात आमुचा

करण्यासाठी रणी उतरले

कपट कलह जे करित राहिले

ते तर वैरी, बंधू कसले? ॥३॥

आठव दुःखे अपुली वनिची

आठव पीडा पांचालीची

दिवस सुखाचे हे लाथाडुन

बघसी का स्वप्ने दुःखाची? ॥४॥

चित्त तुझे मोहाने लिंपित

योजिलेस ते तपही अनुचित

नवे युद्ध तू जिंक मनीचे

दुर्विचार हा शत्रू निश्चित ॥५॥

ज्या सर्पांनी कपटाने तुज

दुःखाच्या खाईत लोटले

त्यांना तू समरात ठेचले

पातक धर्मा, यात कोठले? ॥६॥

पृथ्वीचा तू श्रेष्थ अधिपती

दाने दे तू हजारहाती

तुझे हात सोन्याचे असता

कशी इच्छितो भिक्षावृत्ती? ॥७॥

हसे तुझे होईल नृपाळा

भिक्षेची धरली जर वृती

आधी कळते जर बंधुंना

धनु घेतले नसते हाती ॥८॥

विहिर खणावी शतयत्‍नांनी

जल न भोगता जावे निघुनी

तद्वत अमुचे व्यर्थ परिश्रम

तू जाता हे राज्य सोडुनी ॥९॥

सुह्रद, नृपांनी दिल्या आहुती

त्या बलिदाना कसे विसरतो?

स्वर्गाप्रत गेलेली कीर्ती

भूमिवर तू कशास आणतो? ॥१०॥

क्षत्रिय-धर्माचे करि पालन

राजदण्ड तू घेई हाती

दिसो प्रजेला दिन सौख्याचे

नांदू दे या जगती शांती ॥११॥

गीत महाभारत

महर्षी व्यास
Chapters
प्रस्तावना व्यासांची संहिता कुरुकुळातील देवव्रत भीष्मप्रतिज्ञा सत्यवतीची चिंता भीष्माचे प्रत्युत्तर व्यासजन्मकथन व्यासांना विनंती गांधारी-विवाह कुंतीचा कर्णासाठी शोक पांडव-जन्मकथन पांडू राजाचे निधन द्रोणांची शिष्यपरीक्षा प्रेक्षणगृह-प्रसंग भीम-विषप्रयोग लाक्षागृहदाह विदुर-संदेश हिडिम्बेचे निवेदन ब्राह्मणाचा निश्चय बकासुरवध द्रौपदीस्वयंवर दुर्योधनाचे बेत कृष्णाची अग्रपूजा दुर्योधन मयसभेत द्यूतप्रसंग द्रौपदी-वस्त्रहरण अनुद्यूत आणि वनवास कुंतीचा शोक द्रौपदीचा संताप द्रौपदी-सत्यभामा-संवाद द्रौपदीचे अपहरण सूर्याचे आवाहन कर्णाचे सूर्यास उत्तर यक्षप्रश्न कीचकवध कृष्ण्साहाय्य संजय-भाषण युधिष्ठिराचा निरोप युधिष्ठिराची चिंता कृष्णाचे उत्तर कृष्णशिष्टाई धृतराष्ट्राचा उपदेश गांधारीचा उपदेश दुर्योधनाचे उत्तर कुंतीचे मनोगत कर्णाचे कृष्णास उत्तर कुंती-कर्ण-संवाद कर्णाचे कुंतीला उत्तर शिखण्डीचे वृत्त भगवंताची अमरवाणी अनन्यभक्‍तीचा मार्ग धर्माला आशीर्वाद भीष्मपतन भीष्म-कर्ण-भेट भीष्मांचा दुर्योधनाला उपदेश अभिमन्यु प्रताप द्रोणनिधन कर्णार्जुनयुद्ध दुर्योधन-कृप-संवाद युद्धाचा अंतिम दिन दुर्योधनाचे पलायन भीम-दुर्योधन-गदायुद्ध दुर्योधनाचे अंतिम शब्द कृष्णाचे सडेतोड उत्तर अश्वत्थाम्याचा कट द्रौपदीचा विलाप गांधारीचा शोक धर्माचा शोक युधिष्ठिराचे मनोगत अर्जुनाचे आवाहन विदुराचा अंत धृतराष्ट्र निधन यादवांचा नाश स्वर्गाकडे प्रयाण स्वर्ग प्रवेश अंतिम गती परिक्षिताचा अंत कृष्णाला अभिवादन आदर्श पुरुष थोर स्त्रिया