Get it on Google Play
Download on the App Store

दुर्योधनाचे बेत

द्रौपदी विवाहानंतर दुर्योधनाला पांडव जिवंत असल्याचे समजले. तो अत्यंत निराश झाला. या विवाहामुळे पांडवांचे बळ वाढले होते; त्यांना द्रुपद व कृष्ण या दोन बलाढय शक्‍तींचे साहाय्य लाभले होते. शत्रू दुर्बल व्हावा अथवा त्याचा नाश करावा म्हणून दुर्योधनाने अनेक कुटिल प्रयत्‍न केले होते. आता आपल्याला राज्य मिळेल की नाही ही शंका त्याला भेडसावू लागली. त्याने कौरवसभेत आपल्या मनातील पांडवनाशासाठी आणखी काही कुटिल बेत सर्वांसमोर मांडले. धूर्त ब्राह्मनांच्या द्वारा कुंतीपुत्र व माद्रीपुत्र यांच्यात फूट पाडावी किंवा द्रुपद राजास द्रव्याची लाच देऊन पांडवांपासून दूर करावा. अथवा पांडवांच्या मनात द्रौपदीविषयी विष पेरुन त्यांच्यात कलह निर्माण करावा अशा या बेतांना कर्णाने विरोध केला. त्यांच्याशी ते शक्‍तिशाली होण्यापूर्वी सरळ युद्ध करावे अशा या बेतांना कर्णाने विरोध केला. त्यांच्याशी ते शक्‍तिशाली होण्यापूर्वी सरळ युद्ध करावे असा सल्ला त्याने दिला. बरीच चर्चा झाली, भीष्मांनी हे सर्व चुकीचे असल्याचे सांगून त्यांनाही राज्यातील अर्धा वाटा द्यावा असे ठासून सांगितले. त्याप्रमाणे त्यांना सन्मानाने बोलावण्यात आले व युधिष्ठिराला खांडवप्रस्थाचे राज्य देण्यात आले.

दुर्योधनाचे बेत

शत्रू हे पुन्हा कसे उभे ठाकले ?

अग्नीच्या ज्वाळांतुन कसे वाचले ? ॥धृ॥

स्वयंवरी तेच सफल जाहले कसे ?

ग्रस्त चित्त चिंतेने आज होतसे ?

राज्याचे स्वप्‍न पुन्हा आज भङ्‌गले ॥१॥

मूर्ख, दुष्ट काय म्हणू त्या पुरोचना

मार्गातिल कण्टक हे ठेविलेच ना

दैवाने पारडेच उलट फिरविले ॥२॥

दाविन मी माझे बळ पांडुसुतांना

नाशाचे कुटिल बेत रचिन मी पुन्हा

कर्णा हे मी उपाय मनी योजिले ॥३॥

वश करुनी द्रव्याने द्रुपदनृपाला

विनवावे सोड अता धर्मसुताला

युधिष्ठिरा, द्रुपदनृपा करु वेगळे ॥४॥

घात करु भीमाचा हेर योजुनी

पार्थावर मात करिल कर्ण शरांनी

राज्य मागण्यास त्यास धैर्य ना उरे ॥५॥

पाचाही पतिविषयी राणिच्या मनी

पेरावे संशयबिज कानी लागुनी

होइल संसार नष्ट या विषामुळे ॥६॥

पाठवु या रुपवती तरुण अंगना

लावू या नादी त्या कुंतिसुतांना

राहिल मग ऐक्य कसे पांडवांतले ? ॥७॥

हेर फसवतील तया करुनिया स्तुती

भ्रांतचित्त होतिल ते पाचही पती

कलहातच राहतील सदा गोवले ॥८॥

द्रुपद कृष्ण पार्थांना मित्र लाभले

नच बलिष्ठ ते अजुनी परी जाहले

तत्पूर्वी पाहिजेत डाव खेळले ॥९॥

गीत महाभारत

महर्षी व्यास
Chapters
प्रस्तावना व्यासांची संहिता कुरुकुळातील देवव्रत भीष्मप्रतिज्ञा सत्यवतीची चिंता भीष्माचे प्रत्युत्तर व्यासजन्मकथन व्यासांना विनंती गांधारी-विवाह कुंतीचा कर्णासाठी शोक पांडव-जन्मकथन पांडू राजाचे निधन द्रोणांची शिष्यपरीक्षा प्रेक्षणगृह-प्रसंग भीम-विषप्रयोग लाक्षागृहदाह विदुर-संदेश हिडिम्बेचे निवेदन ब्राह्मणाचा निश्चय बकासुरवध द्रौपदीस्वयंवर दुर्योधनाचे बेत कृष्णाची अग्रपूजा दुर्योधन मयसभेत द्यूतप्रसंग द्रौपदी-वस्त्रहरण अनुद्यूत आणि वनवास कुंतीचा शोक द्रौपदीचा संताप द्रौपदी-सत्यभामा-संवाद द्रौपदीचे अपहरण सूर्याचे आवाहन कर्णाचे सूर्यास उत्तर यक्षप्रश्न कीचकवध कृष्ण्साहाय्य संजय-भाषण युधिष्ठिराचा निरोप युधिष्ठिराची चिंता कृष्णाचे उत्तर कृष्णशिष्टाई धृतराष्ट्राचा उपदेश गांधारीचा उपदेश दुर्योधनाचे उत्तर कुंतीचे मनोगत कर्णाचे कृष्णास उत्तर कुंती-कर्ण-संवाद कर्णाचे कुंतीला उत्तर शिखण्डीचे वृत्त भगवंताची अमरवाणी अनन्यभक्‍तीचा मार्ग धर्माला आशीर्वाद भीष्मपतन भीष्म-कर्ण-भेट भीष्मांचा दुर्योधनाला उपदेश अभिमन्यु प्रताप द्रोणनिधन कर्णार्जुनयुद्ध दुर्योधन-कृप-संवाद युद्धाचा अंतिम दिन दुर्योधनाचे पलायन भीम-दुर्योधन-गदायुद्ध दुर्योधनाचे अंतिम शब्द कृष्णाचे सडेतोड उत्तर अश्वत्थाम्याचा कट द्रौपदीचा विलाप गांधारीचा शोक धर्माचा शोक युधिष्ठिराचे मनोगत अर्जुनाचे आवाहन विदुराचा अंत धृतराष्ट्र निधन यादवांचा नाश स्वर्गाकडे प्रयाण स्वर्ग प्रवेश अंतिम गती परिक्षिताचा अंत कृष्णाला अभिवादन आदर्श पुरुष थोर स्त्रिया