Get it on Google Play
Download on the App Store

संजय-भाषण

द्रुपदपुरोहित पांडवांतर्फे धृतराष्ट्राला भेटून आल्यावर कौरवांतर्फे धृतराष्ट्राचा निरोप सांगण्यासीं संजय पांडवांकडे आला. त्याने सांगितले की धृतराष्ट्राला ’शम’ हवा आहे. युद्धावर पाळी येऊ नये असेच त्याला वाटते. पांडव स्वभावाने धर्मपरायण, नीतिमान व विचारी आहेत. त्यांच्यापाशी मोठी सेना आहे, पराक्रमी महारथीही आहेत, तसेच युद्धात त्यांचे शौर्यही प्रत्यक्षात येईल पण त्यांच्या सारख्यांनी युद्धासारखे हीन, हिंस्त्र कृत्य करु नये; ते लांच्छनास्पद होईल. युद्ध म्हटले की जय-पराजय आलाच. कोणाचा जय होईल हे सांगता येत नाही. पण कोणाचाही जय झाला तरी तो पराजयासारखाच होणार कारण त्यात ज्ञातिवध होईल व फार मोठी हानी होईल. ज्ञातिवध करुन जगणे हे मरणासमानच ठरणार आहे. दोन्ही पक्ष सामर्थ्य संपन्न आहेत; अशा स्थितीत जय पराजय सारखेच ठरणार आहेत. कौरवांनी राज्य परत दिले नाही तरी पांडवांनी शांत राहाणे हेच योग्य आहे. कुळाचा नाश करुन राज्य मिळविण्यापेक्षा अंधक व वृष्णी यांच्या राज्यात पांडवांनी भिक्षा मागून जगणे हे अधिक उचित होय. युद्धाने काहीच मिळणार नाही; ते दोन्ही पक्षांना हितावह नाही.

संजय-भाषण

राजाचा हा निरोप तुजसि सांगतो

धर्मराज, तुझा पिता शांति इच्छितो ॥धृ॥

धर्म, भीम, कृष्णार्जुन

करि अपणा मी वंदन

कुशल इथे सकलांचे नृप विचारतो ॥१॥

धरु नका कुणि रोषा

शम व्हावा ही मनिषा

श्रेष्ठ कुळाचे राजा हीत पाहतो ॥२॥

काळ कंठला वनात

धर्मनिष्ठ राहिलात

दया, न्याय, धर्मा तू सतत पाळितो ॥३॥

इहलोकी परलोकी

तोच श्रेष्ठ तोच सुखी

सर्व त्याग करुनी जो धर्म रक्षितो ॥४॥

उभय पक्ष बलवत्तर

रण होइल धुवांधार

जय अजया अर्थ नसे, नाश अटळ तो ॥५॥

राज्याचा भाग तुला

त्यांना जरि नाहि दिला

युद्धाहुन भिक्षेचा मार्ग उचित तो ॥६॥

कीर्ती जो नष्ट करी

विवेकास दूर करी

गीळ असा क्रोध नृपा, हानि करवितो ॥७॥

घोर युद्ध करुन असे

राज्यलाभ योग्य नसे

कीर्तिलोप तुजला का उचित वाटतो ? ॥८॥

इतुका का थांबलास

साह्य लाभले रिपूस

द्यूतातच धडा रिपुस का न दिला तो ? ॥९॥

सर्वानाश रणी असे

दावानल जणु भासे

पराजयासम रणात विजय भासतो ॥१०॥

समराचा महापूर

वाहुन नेईल कूळ

ठाम रहा शांतीवर हेच प्रार्थितो ॥११॥

सर्वांचे हित शमात

संशय कसला न यात

कुरु-सृंजय दोघांचे सौख्य याचितो ॥१२॥

गीत महाभारत

महर्षी व्यास
Chapters
प्रस्तावना व्यासांची संहिता कुरुकुळातील देवव्रत भीष्मप्रतिज्ञा सत्यवतीची चिंता भीष्माचे प्रत्युत्तर व्यासजन्मकथन व्यासांना विनंती गांधारी-विवाह कुंतीचा कर्णासाठी शोक पांडव-जन्मकथन पांडू राजाचे निधन द्रोणांची शिष्यपरीक्षा प्रेक्षणगृह-प्रसंग भीम-विषप्रयोग लाक्षागृहदाह विदुर-संदेश हिडिम्बेचे निवेदन ब्राह्मणाचा निश्चय बकासुरवध द्रौपदीस्वयंवर दुर्योधनाचे बेत कृष्णाची अग्रपूजा दुर्योधन मयसभेत द्यूतप्रसंग द्रौपदी-वस्त्रहरण अनुद्यूत आणि वनवास कुंतीचा शोक द्रौपदीचा संताप द्रौपदी-सत्यभामा-संवाद द्रौपदीचे अपहरण सूर्याचे आवाहन कर्णाचे सूर्यास उत्तर यक्षप्रश्न कीचकवध कृष्ण्साहाय्य संजय-भाषण युधिष्ठिराचा निरोप युधिष्ठिराची चिंता कृष्णाचे उत्तर कृष्णशिष्टाई धृतराष्ट्राचा उपदेश गांधारीचा उपदेश दुर्योधनाचे उत्तर कुंतीचे मनोगत कर्णाचे कृष्णास उत्तर कुंती-कर्ण-संवाद कर्णाचे कुंतीला उत्तर शिखण्डीचे वृत्त भगवंताची अमरवाणी अनन्यभक्‍तीचा मार्ग धर्माला आशीर्वाद भीष्मपतन भीष्म-कर्ण-भेट भीष्मांचा दुर्योधनाला उपदेश अभिमन्यु प्रताप द्रोणनिधन कर्णार्जुनयुद्ध दुर्योधन-कृप-संवाद युद्धाचा अंतिम दिन दुर्योधनाचे पलायन भीम-दुर्योधन-गदायुद्ध दुर्योधनाचे अंतिम शब्द कृष्णाचे सडेतोड उत्तर अश्वत्थाम्याचा कट द्रौपदीचा विलाप गांधारीचा शोक धर्माचा शोक युधिष्ठिराचे मनोगत अर्जुनाचे आवाहन विदुराचा अंत धृतराष्ट्र निधन यादवांचा नाश स्वर्गाकडे प्रयाण स्वर्ग प्रवेश अंतिम गती परिक्षिताचा अंत कृष्णाला अभिवादन आदर्श पुरुष थोर स्त्रिया