Get it on Google Play
Download on the App Store

युधिष्ठिराचा निरोप

संजयचा निरोप ऐकल्यानंतर पांडवांकडील सर्व विचारमग्न झाले. संजयाच्या निरोपात राज्य परत देण्याविषयी कुठलेच आश्वासन नव्हते. युधिष्ठिराने संजयाला यावर आपले उत्तर सांगितले. ज्येष्ठांना कुशल निवेदन करण्यास सांगून धृतराष्ट्राला सांगितले की तुम्हीच पूर्वी राज्य दिले, तेव्हा आता ते पुन्हा आम्हाला देऊन सर्वांना शांतीने राहू द्यावे. दुर्योधनाला सांगितले की पांडवांनी आतापर्यंत खूप दुःखे सोसली आहेत तसेच अनेक अपराधही पोटात घातले आहेत. म्हणून आता तरी त्यांना त्यांचा न्याय्य वाटा परत मिळायला हवा. आमचेपाशी सामर्थ्य असूनही कुरुंचा वध न व्हावा म्हणून आम्ही सर्व अन्याय निमूटपणे सहन केले. यावर नीट विचार करुन दुर्योधन तू आमचे इंद्रप्रस्थाचे राज्य परत कर. शम व्हावा हीच आमची इच्छा आहे. समेटास आम्ही तयार आहोत. युद्ध टाळावे या हेतूने तू आम्हा पाच भावांना अविस्थल, वृकस्थल, मासन्दी इत्यादी निदान पाच गावे तरी दे ! हा शांतीसाठी माझा प्रस्ताव आहे. अन्यथा मी युद्धालाही तयार आहे.

युधिष्ठिराचा निरोप

संजया ऐकला निरोप कुरुराजाचा

परि कुठे दिसेना विचार मज न्यायाचा ॥धृ॥

युद्धाची भाषा कधीच ना मी केली,

इष्टाची प्राप्ती युद्धाविण जर झाली

तर कशास येइल विचार संग्रामाचा ? ॥१॥

मार्गावर असु दे कितीहि खळगे काटे

येऊ दे संकट पाण्डुसुतावर मोठे

परि ते न सोडतिल कधी हात नीतीचा ॥२॥

शांतीचे करितो दुर्योधन गुणगान

आम्हास सांगतो नको युद्ध दारुण

परि यत्‍न करी तो नित्य सैन्यवृद्धीचा ॥३॥

द्रव्याचा लोभी लोभी तो राज्याचा

चालला सदा तो मार्ग कपटनीतीचा

ह्या निरोपातही डाव गुपित ना कुठचा ? ॥४॥

जरि पृथ्वीवरले अगणित मिळणे वित्त

स्वर्गादी अथवा लोकहि होणे प्राप्त

तरी कधी न सोडिन मार्ग नृपा पुण्याचा ॥५॥

’शम उत्तम’ म्हणुनी आणला तू संदेश

परि कळे न मजला राजाचा उद्देश

ना कुठे शब्द तो इंद्रप्रस्थ राज्याचा ॥६॥

संजया सांगतो स्पष्ट मनोगत तुजला

मी तयार आहे सामाला, युद्धाला

मागणे फक्‍त द्या मला भाग राज्याचा ॥७॥

वनवास भोगला, केला पूर्ण करार

द्युतातिल सगळे देऊन मिटवा वैर

शब्दाचे पालन धर्म असे राजाचा ॥८॥

युद्धावर आणली पाळी जर का कोणी

मग गांडिव धाडिल सर्वांसी यमसदनी

दुष्टांना शासन हाच नियम सृष्टीचा ॥९॥

हे राज्य द्यायचे नसेल जर का अमुचे

तर ऐक मागणे माझेअ हे शेवटचे

हा उपाय माझा एकमेव शांतीचा ॥१०॥

दे पाच पांडवा पाचच गावे फक्‍त

वारणावतासह, राहु सदा संतुष्ट

या मार्गे होवो शेवट या कलहाचा ॥११॥

गीत महाभारत

महर्षी व्यास
Chapters
प्रस्तावना व्यासांची संहिता कुरुकुळातील देवव्रत भीष्मप्रतिज्ञा सत्यवतीची चिंता भीष्माचे प्रत्युत्तर व्यासजन्मकथन व्यासांना विनंती गांधारी-विवाह कुंतीचा कर्णासाठी शोक पांडव-जन्मकथन पांडू राजाचे निधन द्रोणांची शिष्यपरीक्षा प्रेक्षणगृह-प्रसंग भीम-विषप्रयोग लाक्षागृहदाह विदुर-संदेश हिडिम्बेचे निवेदन ब्राह्मणाचा निश्चय बकासुरवध द्रौपदीस्वयंवर दुर्योधनाचे बेत कृष्णाची अग्रपूजा दुर्योधन मयसभेत द्यूतप्रसंग द्रौपदी-वस्त्रहरण अनुद्यूत आणि वनवास कुंतीचा शोक द्रौपदीचा संताप द्रौपदी-सत्यभामा-संवाद द्रौपदीचे अपहरण सूर्याचे आवाहन कर्णाचे सूर्यास उत्तर यक्षप्रश्न कीचकवध कृष्ण्साहाय्य संजय-भाषण युधिष्ठिराचा निरोप युधिष्ठिराची चिंता कृष्णाचे उत्तर कृष्णशिष्टाई धृतराष्ट्राचा उपदेश गांधारीचा उपदेश दुर्योधनाचे उत्तर कुंतीचे मनोगत कर्णाचे कृष्णास उत्तर कुंती-कर्ण-संवाद कर्णाचे कुंतीला उत्तर शिखण्डीचे वृत्त भगवंताची अमरवाणी अनन्यभक्‍तीचा मार्ग धर्माला आशीर्वाद भीष्मपतन भीष्म-कर्ण-भेट भीष्मांचा दुर्योधनाला उपदेश अभिमन्यु प्रताप द्रोणनिधन कर्णार्जुनयुद्ध दुर्योधन-कृप-संवाद युद्धाचा अंतिम दिन दुर्योधनाचे पलायन भीम-दुर्योधन-गदायुद्ध दुर्योधनाचे अंतिम शब्द कृष्णाचे सडेतोड उत्तर अश्वत्थाम्याचा कट द्रौपदीचा विलाप गांधारीचा शोक धर्माचा शोक युधिष्ठिराचे मनोगत अर्जुनाचे आवाहन विदुराचा अंत धृतराष्ट्र निधन यादवांचा नाश स्वर्गाकडे प्रयाण स्वर्ग प्रवेश अंतिम गती परिक्षिताचा अंत कृष्णाला अभिवादन आदर्श पुरुष थोर स्त्रिया