Get it on Google Play
Download on the App Store

यदुवंशाचा नाश झाला नव्हता..!

महाभारताच्या युद्धानंतर युदिष्ठीराचा राज्याभिषेक होत असताना कौरवांची आई गांधारी हिने श्रीकृष्णाला या युद्धासाठी जबाबदार धरत शाप दिला की ज्याप्रकारे कौरवांचा नाश झाला तसाच यदुवंशाचाही अंत होईल.
असा शाप मिळाल्यानंतर कृष्ण द्वारकेत परतले आणि यदुवंशियांना घेऊन प्रभास क्षेत्रात गेले. काही दिवसांनतर महाभारत युद्धाची चर्चा करताना सात्याकि आणि कृतवर्मा यांच्या त वादविवाद झाले. सात्याकिने रागारागात कृतवर्माचा शिरच्छेद केला. यावरून त्यांचं आपापसात युद्ध सुरू झालं, ते गटागटात विभाजीत झाले आणि एकमेकांचा संहार करू लागले. या युद्धात श्रीकृष्णाचा मुलगा प्रद्युम्न आणि मित्र सात्याकिबरोबर सर्व यदुवंशी मारले गेले. फक्त बब्रु आणि दारूक हेत या सगळ्यातून वाचले.  यदुवंशीयांच्या विनाशानंतर कृष्णाचे थोरले बंधू बलराम समुद्रकिनाऱ्यावर जाऊन एकाग्रतेने बसले आणि परमात्म्यात विलीन झाले. अशा प्रकारे शेषनागाचा अवतार असलेले बलराम यांनी देहत्याग केला आणि स्वगृही परतले.
बलरामाच्या देहत्यागा नंतर एके दिवशी श्रीकृष्ण जेव्हा पिंपळाच्या झाडाखाली ध्यानमुद्रेत पडले असताना तिथे जरा नावाचा शिकारी आला होता. जरा हा एक शिकारी होता आणि त्याला हरिणाची शिकार करायची होती. त्याला दुरून कृष्णाचा तळवा हरणाच्या तोंडासमान दिसला आणि त्याने काहीही विचार न करता लगेत बाण सोडला जो श्रीकृष्ण्याच्या तळव्याला लागला. त्याने जवळ जाऊन बघितलं तेव्हा त्याला ‘आपण साक्षात कृष्णाच्या पायाला बाण मारला’ असे लक्षात आले. त्याने क्षमायाचना केली. तेव्हा कृष्ण त्याला म्हणाले की ‘जरा, तू घाबरू नकोस, तू माझ्या मनातलंच काम केलं आहेस, आता माझ्या आज्ञेने स्वर्गप्राप्ती करशील.’
बहेलिए के जाने के बाद वहां श्रीकृष्ण का सारथी दारुक पहुंच गया। दारुक को देखकर श्रीकृष्ण ने कहा कि वह द्वारिका जाकर सभी को यह बताए कि पूरा यदुवंश नष्ट हो चुका है और बलराम के साथ कृष्ण भी स्वधाम लौट चुके हैं। अत: सभी लोग द्वारिका छोड़ दो, क्योंकि यह नगरी अब जल मग्न होने वाली है। मेरी माता, पिता और सभी प्रियजन इंद्रप्रस्थ चले जाएं। यह संदेश लेकर दारुक वहां से चला गया। इसके बाद उस क्षेत्र में सभी देवता और स्वर्ग की अप्सराएं, यक्ष, किन्नर, गंधर्व आदि आए और उन्होंने श्रीकृष्ण की आराधना की। आराधना के बाद श्रीकृष्ण ने अपने नेत्र बंद कर लिए और वे सशरीर ही अपने धाम को लौट गए।
शिकारी निघून गेल्यानंतर कृष्णाचा सारथी दारूक तिथे पोहोचला. कृष्णाने त्याला द्वारकेत जाऊन ‘संपूर्ण यदुवंशाचा नाश झाला आहे आणि कृष्ण बलरामाबरोबर स्वधामी परतले आहेत’ अशी घोषणा करायला सांगितलं.
भागवतानुसार श्रीकृष्ण आणि बलरामांची स्वधामी परतण्याची बातमी जेव्हा त्यांच्या प्रियजनांपर्यंत पोहोचली तेव्हा दुःखाने त्यांनीही प्राण त्यागले. देवकी, रोहिणी, वसुदेव, बलराम यांच्या पत्नी,  श्रीकृष्णाच्या पत्नी  इत्यादी सर्वांनी प्राण त्यागले. यानंतर अर्जुनाने यदुवंशांच्या वतीने पिण्डदान, श्राद्ध आणि इतर संस्कार केले.
यदुवंशातले उरलेले लोक-
महाभारत आणि पुराणांच्या अनुसार या विधींनंतर अर्जून यदुवंशातल्या उरलेल्या लोकांना घेऊन इंद्रप्रस्थात परतला. त्यांनतर कृष्णाचं निवासस्थान सोडूव संपूर्ण द्वारका समुद्रात बुडाली. यदुवंशातला काही लोक वाचले होते तर त्यांचा वंश नष्ट झाला नाही? कृष्णाची स्वधामी परतण्याची बातमी ऐकून पांडवांनी सुद्धा हिमालयाच्या यात्रेला प्रारंभ केला. याच यात्रेत पांडवांनीही एकेक करून देहत्याग केला. शेवटी फक्त युधिष्ठीर हेच स्वशरीर स्वर्गात पोहोचले.