Get it on Google Play
Download on the App Store

"कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही."

१९१२
"कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही."
श्रींची प्रकृती दिवसेंदिवस क्षीण होत चालली होती. कधीमधी दिसणारी पायावरील सूज आता नेहमी दिसू लागली. दम्याचे प्रमाणही पहिल्यापेक्षा अधिक झाले. तरीसुध्दा श्रींचे कार्यक्रम नेहमीप्रमाणे चालू होते. भजन, भोजन, नामस्मरण, हास्यविनोद, इतर खटपटी आनंदात चालू होत्या. लांबलांबचे लोक दर्शनास यायचे व थांबायचे; त्यामुळे साधारणपणे पाचशे माणसे नेहमी श्रींजवळ असायची. जागा अपुरी पडू लागली म्हणून श्रींनी धर्मशाळा बांधली, पाकशाळा दुरुस्त करुन घेतली, विहिरी खोदल्या, ओढ्यास घाट बांधला, नवीन इमारती बांधल्या. यावेळी पंढरपूरच्या जोतिषानें शनीचे मंदिर बांधण्याचे सुचविले. सुचविले . श्री लगेच म्हणाले, " तुम्ही म्हणता तसे करु, शनि देवाचा फौजदार आहे." त्याप्रमाणे धर्मशाळेपाशी शनीचे मंदिर बांधण्यात आले. या वर्षी श्रींनी नवीन शेती खरेदी केली आणि सर्व शेती मंदिरांना वाटून टाकली. तसेच एक मृत्यूपत्रही तयार केले. सर्व मंदिरांचे एक संस्थान बनवून त्यावर पंच नेमले. त्यांना सर्व व्यवस्था आखून दिली. आल्यागेल्याला भाकरी घालावी आणि आपण सर्वांनी नाम घ्यावे हे मुख्यत: सांगून ठेवले. भेटायला आलेल्या मंडळींना श्री आग्रहाने १/२ दिवस जास्त ठेवून घेत. निरोप देताना मंडळींना सांगत के, " मी लवकरच नैमिषारण्यात जाणार आहे. मी सांगितलेले नाम तेवढे विसरु नका, त्यातच कल्याण आहे." काहींना ते म्हणायचे, " कोणती वेळ कशी येईल काय सांगावे. सर्व शंका विचारुन घ्याव्यात आणि नाम घेण्याच्या मागे लागावे. कांही ना ते सांगायचे,’पहा बरं, मी पक्ष्यासारखा केव्हा उडून जाईन नेम नाही. नामाला लागा," समजूतदार लोकांना ते सांगत,"येणारा काळ भयंकर आहे, साधूदेखील भ्रष्ट होतील, कोणाला नीतीची चाड राहणार नाही, लोक कमालीचे विषयांध होतील, कली फार माजेल, तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मात्र भय नाही." एकदा निरुपणास बसले असता श्री म्हणाले, "एखादी गोष्ट मला सांगावी असे जर तुम्हाला वाटले, तर ती तुम्ही मारुतीला सांगा म्हणजे ती मला आपोआप कळेल." बेळगावचे बळ्वंतराव घाणेकर यांनी हे लक्षात ठेवून त्याप्रमाणे वागण्याचा निश्चय केला.गावी परत गेल्यावर ते रोज संध्याकाळी मारुतीच्या दर्शनास जात आणि हलक्या आवाजात ते मारुतीराया माझे षड्‌‌विकार माझ्या ताब्यात राहू दे." वर्षभर असा क्रम चालल्यानंतर वर्षभराने ते गोंदवल्यास आले. श्री निरुपणास बसले असता काम क्रोधादि विकारांवर बोलायला आरंभ केला. बोलताना घाणेकरांकडे सहजनजर फिरवीत श्री म्हणाले, " मारुतीच्या समोर नुसता पाठ म्हणून षड्‌विकार कसे ताब्यात येतील  ? त्यासाठी भगवंताचे अनुसंधान ठेवण्याचा अभ्यास करायला पाहिजे." हे ऐकून घाणेकरांना खूण पटली व ते हसले. श्री एकदा म्हसवडच्या बाजारात जाणार होते. अनेक जण त्यांना गायी सोडविण्यासाठी पैसे आणून देत. कोणी श्रींना आपल्या घरी पानसुपारीला बोलावोन त्यांचा आदर करुन पैसे देत. बळवंतराव घाणेकरांची पन्नास रुपये देण्याची इच्छा होती. श्रींना एकटे गाठून कोणास नकळत पैसे द्यावे असे त्यांना मनापासून वाटले. श्रींची निघण्याची वेळ झाली, तेव्हा श्रीच त्यांना म्हणाले, " बळवंतराव मी तुमच्यापाशी ठेवायला दिलेले पन्न्नास रुपये द्या बघू." बळवंतरावांनी लगेच त्यांच्याजवळ पैसे दिले. श्री चातुर्याने दुसर्‍याच्या मनातले ओळखून त्याप्रमाणे वागत. एकदा गोंदवल्याला बरीच मंडळी बोलत बसली असता श्री ब्रह्मानंदांना म्हणाले, " बुवा ही, सगळी मंडळी मला समर्थाचा अवतार म्हणतात, त्यांच्यात आणि माझ्यात काय साम्य आहे  ?" ब्रह्मानंदांनी हात जोडले आणि नम्रपणे सांगितले की, "महाराज, समर्थांचे आणि आपले प्रत्येक गोष्टीत साम्य आहे, फक्त आपल्याला कल्याण तेवढा नाही. " ब्रह्मानंदांचे हे मार्मिक उत्तर ऐकून श्री मंडळींना म्हणाले, " समर्थ ते समर्थच, कोण दुसरा त्यांच्यासारखा होईल ! पण हे ब्रह्मानंदबुवा मात्र कल्याण व्हायला लायक आहेत यात शंका नाही." आपल्या मंडळींशी वागताना श्रींची प्रत्येक कृति त्यांना भगवंताकडे नेण्यासाठीच असे. त्यांनी कोणाकडून कशाचीही अपेक्षा कधी केली नाही. विजापूरचे गुरुअप्पा देसाई यांनी गोंदव्ल्यास येऊन श्रींचा अनुग्रह घेतला. श्रींची पूजा करुन चांदीच्या ताटात हजार रुपये घालून ते श्रींच्या पुढे ठेवले व गुरुदक्षिणा म्हणून त्यावर पाणी सोडले. श्रींनी ताटाला नुसता हात लावून ते परत केले. देसाई घेईनात तेव्हा श्रींनी फक्त एक रुपया घेतला व बाकीचे परत केले. श्रींनी कधीही कोणाकडून प्रापंचित वस्तूची कधी अपेक्षा केली नाही. आपल्या माण्साने सदाचार पाळून नाम घ्यावे ही एकच गोष्ट श्रींना हवी असे.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली