Get it on Google Play
Download on the App Store

गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे."

१८९६
गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे."
आयुष्यात अनेक कष्ट सोसल्याने गीताबाई आता खूप थकल्या होत्या. श्री आईची अगदी मनापासून सेवा करीत. एके दिवशी रात्री श्री आईचे पाय चेपीत बसले असता ते तिला म्हणाले, "आई, तू आता म्हातारी झालीस, तुझी काही इच्छा असली तर सांग. मी खात्रीने ती पूर्ण करीत." हे ऐकून आईच्या डोळ्यांत पाणी आले आणि म्हणाली, "गणू, माझे आता काय राहिले आहे ? तुझे हे वागणे आणि लोकांचे तुझ्यावरचे प्रेम पाहून मन तृप्त झाले, माझा देह थकत चालला आहे, मनात येते की, एकदा काशीयात्रा घडावी, गंगास्नान करून विश्वेश्वराचे दर्शन घेतले म्हणजे देहाचे सार्थक होईल." आईचे हे बोलणे ऐकून श्री म्हणाले, "वा ! फारच उत्तम. मग उद्याच आपण निघायचे का ? तुला काशीयात्रा घडवण्याचे माझ्याकडे लागले." त्यावर आई म्हणाली, "अरे, पण आपण यात्रेला गेलो तर आपल्या घराकडे कोण पाहील ? घराचा वासादेखील कोणी इथे शिल्लक ठेवणार नाही." त्यावर श्री म्हणाले, "आई, त्याची तू काळजी करू नकोस, मी सर्व व्यवस्था करतो." आईला असे आश्वासन देऊन श्रींनी काशीयात्रेची सर्व तयारी केली. श्रींच्या पत्नीची बरोबर येण्याची इच्छा होती, पण आपण पुढे केव्हातरी खात्रीने जाऊ अशी तिची समजूत घालून त्यांनी तिला माहेरी धाडून दिले. गीताबाई काशीयात्रेस जाणार म्हणून प्रत्येकाला कौतुक वाटत होते. गावचे सर्व लोक निरोप देण्यास जमा झाले. शेवटी श्री आईला घेऊन रामरायाच्या दर्शनाला आले. रामाचा निरोप घेऊन दोघेजण बाहेर आले. तेव्हा गीताबाई म्हणाल्या, "घराकडे लक्ष असू द्या, बरं का, यात्रा संपवून मी लवकर परत येते." त्यावर श्री म्हणाले, "आई, तू तर थकली आहेस, कोणास ठाऊक काळ कसा येईल ? घराचा लोक कशाला ठेवतेस ? आपण त्याची वाट लावू " असे म्हणून श्रींनी चिंतुबुवांना बोलावून घेतले. आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले. चिंतुबुवांना मंत्र म्हणायला सांगून सर्वांच्या नावाने पाणी सोडले. ’जमलेल्या लोकांपैकी ज्याला जी वस्तु पाहिजे ती घेऊन जावी ’, असे म्हणायचा अवकाश, पंधरा मिनिटांत घर धुतल्याप्रमाणे स्वच्छ झाले. त्यावर श्री आईला म्हणाले, "तुझे लक्ष अडकायला आता मागे काही शिल्लक राहिले नाही, चल आता." हे सर्व पाहून आई म्हणाली, "गणू, मला वाटळे होते की, तुला प्रापंचिक शहाणपण आले, पण नाही रे नाही, तू होतास तसाच बैरागी आहेस. कोणच्या वेळी काय करशील याचा नेम नाही." श्री आईला घेऊन प्रथन नाशिकला आहे, रामाचे दर्शन घेऊन पुढे प्रयागला गेले. तेथे आईला त्रिवेणी संगमामध्ये स्नान घातले व वेणीमाधवाच्या चरणी घालून अक्षयवट दाखविला. तिच्या हातून पुष्कळ दानधर्म करविला. तीन रात्री तेथे राहून सर्वजण काशीला आले. स्टेशनवर श्रींना उतरवून घेण्यास श्रींचा मसुरियादीन शिवमंगल नावाचा श्रीमंत पंडा आला होता. श्रींचा मुक्काम भोसल्यांच्या गंगामहालमध्ये एखाद्या संस्थानिकाप्रमाणे झाला. श्री आईला घेऊन तेथे महिनाभर राहिले. श्री स्वतः आईला गंगास्नानासाठी उचलून घेऊन जात व नंतर विश्वेश्वराच्या दर्शनाला नेत. वाटेतल्या सर्व भिकार्‍यांना ती दान देई. आईच्या हाताने वस्त्रे व पैसा किती दान दिला याला तर गणतीच नाही. श्री काशीस असताना श्रींना आत्मानंद सरस्वती यांच्यासारखे अनेक विद्वान, साधनी संन्यासी भेटायला येत. तसेच बाबू भट नावाचे द्शग्रंथी, हिंदी व संस्कृत भाषेचे जाणकार श्रींना भेटले. १२ वर्षे मौन धरून १३ कोटी रामनामाचा संकल्प पूर्ण करणारे शांताश्रम स्वामी यांचाही श्रींशी खूप संबंध आला. काशीला महिनाभर राहून श्री गयेला गेले. तेथे पिंडदान करून सर्व मंडळी अयोध्येला आली. तेथे आल्यावर गीताबाईंना खूप थकवा वाटू लागला. शक्ती क्षीण होऊ लागली. औषध घेण्य़ास तिने संमती दिली नाही. खाणे बंद होऊन त्या दुधावर राहू लागल्या. श्री त्यांच्याबरोबर सतत बसून सेवा करीत होते. शरयूमध्ये स्नान करून रामरायाचे दर्शन घेतले. श्रींनी तिला घाटावर गादी घालून बसविले व तिच्या हातून खूप दानधर्म करविला. "गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." असे श्री म्हणाले. आईने मनसोक्त दान केल्यावर श्रींनी रामरायाला नैवेद्य करून गावजेवण घातले. आईला विचारले, "तुझी आणखी काही इच्छा शिल्लक आहे का ?" आई म्हणाली, "मुळीच नाही. फक्त ’रामराम ’ म्हणत तुझ्या मांडीवर मला जाऊ दे." दुसरे दिवशी श्रींच्या मांडीवर सकाळी गीताबाईनी शांतपणे ’रामराम ’ म्हणत देह ठेवला व आपल्या जीवाचे कल्याण करून घेतले.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली