Get it on Google Play
Download on the App Store

तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ?

१८४५-४६
तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ?
गीताबाईंच्या माहेरी रामाची उपासना असून त्या मंडळींची निष्ठा श्रीसमर्थांच्यावर होती. गीताबाई लहानपणापासून दासबोध वाचीत आणि रामनामाचा जप करीत. डोहाळे सुरू झाल्यावर त्यांनी अखंड रामनामाचा सपाटा सुरू केला. पुष्कळ वेळा त्यांना बसल्या ठिकाणीच तंद्री लागे आणि कानात कोणीतरी रामनाम घेत आहे असे स्पष्ट ऐकू येई. पुढे त्या मारूतीरायांचे ध्यान करू लागल्या. सौ. गीताबाईंचे दिवस भरले आणि शके १७६६ ( इ. सन १८४५ ) माघ महिन्यातील शुद्ध एकादशीचे रात्रीचे भजन संपून पांडुरंगाची आरती सुरू झाली. माघ शुद्ध द्वादशीला बुधवारी पहाटे सूर्योदयाचे सुमारास गोंदवले येथे श्रीमहाराजांचा जन्म झाला. आपल्याला नातू झाला म्हणून पंतांना परमानंद झाला व प्रेमाने त्यांनी पांडुरंगावर फुले उधळली. पंतांनी बाळाचे बारसे एखाद्या उत्सवाप्रमाणे थाटात केले. खूप अत्रदान केले. सर्वांच्या संमतीने बाळाचे नाव ’गणपती ’ असे ठेवले. तान्हेपणी श्री स्थूलदेही व गौरकाय होते व चार महिन्यांच्या मुलाएवढे मोठे वाटत. सुरेख नाक, तेजस्वी चकाकणारे डोळे, भव्य कपाळ व पुष्कळ काळे केस असलेले हे तान्हे बाळ आई-बापाचेच काय पण शेजारपाजारच्या सर्व लोकांचे जीव की प्राण होऊन बसले. रावजी एवढे संसारातून विरक्त असले तरी मधून बाळ काय करतो हे पाहून जात आणि म्हणत, "याला पाहिले की कसे मनाला समाधान वाटते." पाच महिन्यांचा झाल्यावर श्रीमहाराज रांगू लागले. अतिचपळ असल्याने त्यांना खाली ठेवण्याची सोयच नव्हती. त्यांना मोकळे ठेवले की ते भरभर देवांच्याकडे जाऊन त्या सर्वांना आपल्या आसनावरून खाली काढीत, नाहीतर सरळ गायींच्याकडे जात. पुष्कळ वेळा शेजारच्या बायका त्यांना आपल्या घरी घेऊन जात व आपल्या घरी त्यांच्याशी खेळत बसत. खोडयांच्या भीतिने आईला त्यांना सारखे कडेवर घेऊन फिरवावे लागे. श्रीमहाराजांना भजनाची फार आवड होती. घरात रात्रीचे भजन सुरू झाले की तिकढे घेऊन जाण्यासाठी ते रडत असत. आजा-आजीला नातवाचा फार लळा लागल. एकदा सकाळी रावजी स्नान करून आले होते, त्यांच्या संध्येची -पूजेची तयारी करून द्यायची होती. श्रीमहाराजांना कडेवर घेऊन चटचट काम उरकता येईना म्हणून त्या म्हणाल्या, "तुला सारखे कडेवर घेऊन मी काम कशी रे करू ? जरा बस खाली " असे बोलून त्यांनी श्रींना खाली ठेवले व आपण कामाला लागल्या. श्रींनी लगेच जो आ पसरला तो काही केल्या बंद करेनात, तेव्हा पंत आत आले, बाळाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला, पण बाळाचे रडणे थांबेना, तेव्हा पंत मंदिरात गेले, तेथील अंगारा घेतला, पांडूरंगाची प्रार्थना करून तो अंगारा श्रींच्या कपाळाला लावला व म्हणाले, "तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ?" तेव्हा श्रींनी रडणे थांबवले व एकदम हसले.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली