Get it on Google Play
Download on the App Store

आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो

१९०५
आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून वागावे म्हणजे आपल्याला कधी कमी पडत नाही
जूनमध्ये श्री काशीस जाण्यास निघाले. बरोबर शंभराच्यावर मंडळी होती. त्यांमध्ये आण्णासाहेब घाणेकर, बापूसाहेब साठे, भाऊसाहेब केतकर व त्यांची पत्नी व मुलगी (सुंदराबाई) स्वयंपाकावर देखरेख ठेवण्यासाठी गंगूबाई, भवानराव, दहिवडीच्या जानकीबाई इ. बरीच मंडळी होती. प्रयागमध्ये येऊन पोचायला श्रावणमास उजाडला. नदीकिनार्‍यापासून फार दूर नसलेल्या एका धर्मशाळेत श्री उतरले. सर्व मंडळींनी तीर्थकृत्ये केली. वेणीदान करण्याचे तेवढे शिल्लक राहिले. त्रिवेणी संगमावर २२ जोडपी श्रींच्या समवेत बोटीत बसली. राहिलेली मंडळी काठावर बसून नावेकडे पहात होती. नाव किनारा सोडून पन्नास, एक यार्ड गेली असेल, तेवढ्यात तिच्या बुडाला भोके पडून पाणी नावेत येऊ लागले. नावाड्याने भोक बुजवण्याची खूप खटपट केली पण पाणी बोटीमध्ये जोराने येऊ लागले. नावेने दिशा सोडली व नदीच्या धारेला लागली. त्यावर श्री हसून म्हणाले, " आज गंगा आपल्यावर प्रसन्न झाल्यासारखी दिसते. आपणा सर्वांना ती पोटात घेऊन पावन करणार आहे. असे वाटते."हे श्रींचे शब्द ऐकताच सर्व नावेतील मंडळींना आता आपण बुडणार अशी खात्री झाली व एकदम गोंधळ उडाला. काही स्त्री-पुरुष खूप घाबरले व म्हणाले,"महाराज आम्हाला वाचव." काहींनी तर श्रींना मिठीच मारली. त्यावर श्री मोठ्याने म्हणाले, "बाळांनो, घाबरु नका, राम आपला पाठीराखा आहे, मोठ्याने आपण त्याचा धावा करु." असे म्हणून श्रींनी आपली कफनी ज्या भोकातून पाणी येत होते त्यावर ठेवून ती दाबून धरली व "जयजय श्रीराम जयजय श्रीराम" असा घोष करुन टाळ्या वाजवण्यास प्रारंभ केला. इतक्यात किनार्‍यावरील सहकारी नावा सुटून या नावेच्या दिशेने येऊ लागल्या. एक सहकारी नाव या बुडणार्‍या नावेजवळ येऊन थांबली. श्रींनी सर्वांना या सरकारी नावेत घेतले व मग बुडणार्‍या नावेवरील पाय काढला. तीरावर हजारो मंडळी जमा होऊन उत्सुकतेने सर्व प्रकार पाहात होती; व भगवंताच्या नामाचा जयघोष करीत होती. श्रींनी व सर्व मंडळींना घेऊन नाव तीरावर आल्यावर सर्वजण श्रींच्या दर्शनास धावली. कोणी त्यांची आरती केली, नारळ ओवाळून गंगेत टाकले; कोणी फुले उधळली, कोणी त्यांना साष्टांग नमस्कार घातले. श्रींनी प्रयागमधील भिकार्‍यांना खीरपुरीचे जेवण दिले. पुढे वेणीदान समारंभ पार पाडला. श्री प्रयागहून काशीला गेले. तेथे शेकडो स्त्री-पुरुष त्यांना भेटण्यास येऊ लागले. रोज भगवंताच्या भक्तीबद्दल चर्चा चाले. सकाळसंध्याकाळ भजन - प्रवचन गंगादर्शन चालू असे. श्री म्हणाले, "विद्वत्तेचा उपयोग नामाची निष्ठा वाढविण्याकडे करावा. आधी नाम घ्यावे. नामाची चटक लागली म्हणजे इतर भानगडीत पडू नये." खर्‍या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्ट घडवून आणतो असा माझा अनुभव आहे. आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे म्हणजे आपल्याला कधी कमी पडणार नाही. श्रींनी काशीविश्वेश्वराला जिलेबीचा नैवेद्य केला. काशीहून श्री अयोध्येला आले. तेथेच दहिवडीच्या जानकीबाईंची तब्येत बिघडून त्यांनी देह ठेवला. श्रींनी आपल्या मातेच्या सोबत जानकीबाई राहिल्या असे समजून त्यांचा अंत्यसंस्कार केला. श्री अयोध्येहून पुढे नैमिषारण्यात जाऊन आले व मग सर्व मंडळींना घेऊन इंदूरला आले. पूर्वीची सर्व मंडळी त्यांच्या दर्शनास येऊ लागली. तेथे काही दिवस राहून सर्व मंडळी हर्द्यास आली. तेथे श्रींचे बरेच दिवस वास्तव्य झाले. येथेच श्री. न.चिं. केळकर श्रींना भेटले. त्यांचे वडील व मोठे बंधू श्रींचे अनुग्रहीत होते. गुलाबराव महाराजांचीही मंदिरात श्रींशी भेट झाली. श्रींचा मुक्काम हर्द्यास बरेच दिवस झाला.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली