Get it on Google Play
Download on the App Store

सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही.

१८५५
सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही.
श्रींच्या वृत्तीतील फरक आता जाणवू लागला. रोजपहटे नदीवर स्नानाला गेले की दोन-दोन तास तेथेच ध्यानस्थ बसत. एकादशीच्या दिवशी देवाची पूजा करून डोळे झाकून बसले म्हणजे तासचे तास निघून जात. आईन हलवून उठवावे लागे. श्रींच्या घरापासून थोडयाच अंतरावर असलेल्या मारूती मंदिरात अनेक बौरागी, गोसावी, वारकरी, यत्रोकरू वस्तीला येत. हे लोक आले म्हणजे श्री मुद्दाम तेथे जाऊन त्यांची गाठ घेत व त्यांना भगवंताविषयी अनेक प्रश्र विचारीत. मारूती
मंदिरात उतरलेल्या एका वृद्ध रामदासीला श्रींनी विचारले, "तुम्ही हा वेष कशासाठी घेतला ?" त्यावर रामदासी म्हणाले " देवाचे दर्शन व्हावे म्हणून " मग आपल्याला दर्शन झाले कां ?" असे श्रींनी विचारले, त्यावर रामदासी म्हणाले, "नाही रे बाळ, सद्‍गुरुवाचून जीवाची तळमळ शांत होत नाही, कुणी तरी संत भेटावा म्हणून मी असा गावोगाव फिरत आहे. श्रींची विचारचक्रे चालू झाली. त्यांना घरी मुळीच चैन पडेना. एके दिवशी पहाटे ३- ३॥ ला श्री आपला चुलत भाऊ दामोदर व विश्र्वासू मित्र वामन म्हासुर्णेकर यांच्याबरोबर सद्‍गुरुशोधार्थ घराबाहेर पडले. मजल दरमजल करीत कोल्हापूरला आले. अंबाबाईचे दर्शन घेऊन जवळ्च्या धर्मशाळेत उतरले. श्रींच्या अंगावर सदरा, लंगोटी व कानात भिकबाळी होती. धर्मशाळेत १ / २ दिवस राहिल्यावर दामू कंटाळला व घरी जातो म्हणून श्रींच्या परवानगीने गोंदवल्यास परत गेला. कोल्हापूरहून पुढे जावे या इच्छेने ते दोघे श्रीअंबाबाईच्या देवळातून बाहेर पडले. एक भिकारी काहीतरी द्या म्हणून श्रींच्या सारखा मागे लागला. शेवटी कानातील भिकबाळी खसकन ओढून त्याच्या हातावर ठेवून त्याला वाटेला लावला. श्रीं कानाचे रक्त पुशीत वामनबरोबर चालले होते. तेवढयात एक घोडयाची गाडी त्यांच्यापुढे थांबली. त्यात बसलेल्या गृहस्थाने श्रींची चौकशी केली. वामनने त्यांना सर्व हकिकत सांगितली. त्या गृहस्थाला व त्याच्या पत्नीला श्रींचे फार कौतुक वाटले. त्या दोघांना गाडीत बसवून देवीच्या दर्शनानंतर त्यांनी घरी नेले. श्रींना दत्तक घ्यावयाचे आपल्या मनाशी ठरवून कुटुंबाला तसे सांगून ठेवले. श्रींना सर्व राजोपचार चालू झाले. बिचारा वामन कंटाळून श्रींना विचारून गोंदवल्यास जाण्यास निघाला. तो परत येत असता कोल्हापूरच्या जवळच रावजी ( श्रींचे वडील ) त्याला भेटले. रावजींना त्याने श्री कुठे आहेत ते सांगितले आणि आपण पुढे गेला. रावजी शोध करीत करीत सिद्धेश्वर नावाच्या राजगुरूंच्या घरी आले. ( ते पन्नास एक वर्षांचे सात्त्विक पुरुष असून त्यांना मूलबाळ नव्हते. म्हणून ते दत्तक घेण्याचा विचार करून एखाद्या चांगल्या कुळातल्या लहान मुलाच्या शोधात होते. ) तेथे श्रींची गाठ पडल्यावर श्रींनी लगेच रावजींना साष्टांग नमस्कार घातला. रावजींनी मुलाला पोटाशी धरले. राजगुरूंनी आणि त्यांच्या बायकोने रावजींची अनेक प्रकारे विनवणी केली, परंतु ते ऐकेनात. तेव्हा श्रींना परत नेण्यास परवानगी मिळाली. रावजी श्रींना घेऊन गोंदवल्यास परत आले. श्रींचे नित्याचे जीवन गोंदवल्यास पुन्हा सुरु झाले.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली