Get it on Google Play
Download on the App Store

विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते

१९१०
विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते, त्याचप्रमाणे मंदिर हे अलौकिक म्हणजे अध्यात्म विद्येचे केन्द्र असले पाहिजे.
मुंबईहून सर भालचंद्र भाटवडेकर यांनी श्रींना आग्रहाचे पत्र पाठवून आमंत्रण केले. काही मंडळींना घेऊन श्री भाटवडेकर यांच्याकडे राहिले. एके दिवशी श्री निर्णयसागर छापखान्यात गेले. तेथे काही पोथ्या विकत घेतल्या. एके दिवशी परळला कापडाची गिरणी पाहण्यास श्री व बरोबरची मंडळी जाऊन आली. भालचंद्राच्या नवीन मोटारीत श्रींनी प्रथम बसावे म्हणून त्याना विनंती केली. श्री एकदा बसले व म्हणाले बरोबरची मंडळी असाता मी एकट्याने गाडीत बसावे हे योग्य नाही म्हणून एक घोड्याची गाडी त्याच्या तैनातीला दिली. श्री सहा दिवस मुंबईला राहिले. पुढे काही दिवसांनी पुन्हा मुंबईस आले. यावेळी वरळीस समुद्रस्नानासाठी गेले. दोन दिवसांनी गोंदवल्यास जाण्यास बोरीबंदर स्टेशनवर आले. गाडीस अवकाश होता, तेवढ्यात एक शुभ्र पातळ नेसलेली मध्यम वयाची स्त्री आली, श्रींना भेटून त्यांच्या पायांवर डोके ठेवले" आज्ञेप्रमाने वागेन" एवढे म्हणाली. "मग राम मागे उभा आहे." असे श्री तिला म्हणाले. एका व्यसनी व उधळ्या इंदूरच्या सरदाराची ही बायको असून चांगल्या बुवाना लाजवील अशी परमार्थाची ही अधिकारी आहे, राम तिचे व तिच्यामुळे त्याचेहि. कल्याण करील असे श्री म्हणाले. श्रींना याच वर्षी हुबळीला सावकार चिदंबर नाईक व इतरांनी बांधलेल्या श्रीराममंदिराची स्थापना करण्यास बोलावले. मुंबईहून परत गोंदवल्यास आल्यावर बर्‍याच मंडळींनी घेऊन श्री हुबळीला गेले. दर्शनाला खूप गर्दी झाली म्हणून तबीबांनी श्रींना दिवाणखान्यातून वरच्या मजल्यावर खोलीत बसवले व सेवेला मनुष्य दिला. खोलीतील कोनाड्यात लावलेली मेणबत्ती श्रींनी पंख्याने विझवली व पुन्हा खाली दिवाणखान्यात येऊन बसले. श्री आलेले पाहून मंडळींना खूप आनंद झाला. रात्री ११ पर्यंत सर्वांनी श्रींचे दर्शन घेतले. रामाच्या स्थापनेच्या आधल्या दिवशी श्री मंदिरात जाण्यासाठी निघाले व कोणाला नकळत जानकीबाईंच्या घरी गेले. (जानकीबाई भाऊसाहेब केतकर गदगला असताना त्यांच्याकडे  स्वयंपाकाला होती. भाऊसाहेबांनी पेन्शन घेतल्यावर ही ७५ वर्षांची बाई हुबळीला येऊन राहिलो.) श्री तिच्याकडे गेल्यावर म्हणाले. "जानकीबाई, कालपासून मला ताप आहे, बुरकुल्यात थोडा मऊ भात शिजवा व आमसुलाचे सार करुन खायला घाला." तिने लगेचच सार भात केला व आपल्या हाताने भरवला. श्री तेथून निघताना जानकी त्यांच्या पाया पडली. दोघांच्याही डोळ्यांत पाणी आले. श्री म्हणाले, " माय, तुमची जबाबदारी माझ्याकडे लागली. होईल तेवढे नाम घ्या. राम आपले प्रेम तुम्हाला दिल्यावाचून राहणार नाही. शांत आनंदात रहा." श्रीराम मंदिराची स्थापना झाल्यावर खूप अन्नदान झाले. श्री सिद्धारुढ स्वामी यांचे श्रींना आमंत्रण आले. मठात गेल्यावर दोघांनी एकमेकांना आलिंगन दिले. श्रींनी काही सांगावे अशी स्वामींनी विनंती केली. त्यावर श्री म्हणाले, " भगवंताचे अखंड स्मरण राखावे" हीच स्वामींची आज्ञा आहे अशी माझी खात्री आहे हे स्मरण राखण्याचा तुम्ही प्रयत्न करावा; हे जो करील त्याच्या हाताला धरुन स्वामी तुम्हाला भगवंतापर्यंत पोचवतील. ही मी हमी देतो. हे ऐकल्यावर स्वामी एकदम उद्धारले, "साधु साधु !! वा वा फार छान" त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. स्वामीणी आपला मठ व बांधून ठेवलेली समाधी श्रींना दाखवली. पुढे हुबळीला एक दिवस राहून श्री गोंदवल्यास आले.
श्रींनी पुष्कळ ठिकाणी रामाची मंदिरे स्थापन केली आपण सामान्यपणे समजतो त्यापेक्षा मंदिराविषयी त्यांची कल्पना निराळी होती. ज्याप्रमाणे विश्चविद्यालय हे लौकिक विद्येचे केंद्र असले पाहिजे. आपल्या आचारधर्माचे व परंपरेच रक्षण करणे हे मंदिराचे काम असून त्यात राहणारे लोक देखील त्या पेशाला लायक असेच असावेत. मंदिरात अध्यात्माचे श्रवण व मनन चालावे, जो साधक असेल त्याला साधन करण्यास योग्य स्थान असावे. प्रपंचाच्या त्रासाने कष्टी झालेल्या जीवाला मंदिरात आल्यानंतर स्वत:च्या दु:खाचा काही काळ तरी विसर पडावा असे तेथील वातावरण असावे., मंदिरात नियमित अन्नदान व नियमित उपासना चालू असावी. मंदिर हे मोठे पवित्र स्थान असले पाहिजे. मंदिरात गेले की भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव झाली पाहिजे. हे ध्येय डोळ्यापुढे ठेवून श्रींनी अनेक मंदिर स्थापन केली. या वर्षी तेरदाल येथे दत्तमंदिराची स्थापना श्रींच्या हस्ते झाली.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली