Get it on Google Play
Download on the App Store

मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत.

१९०७
मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत
जून १९०५ साली काशीस जाण्यास निघालेले श्री बरोबरच्या सर्व मंडळींसह गोंदवल्यास परत आले. सर्वांना अतिशय आनंद झाला. यात्रेचे उद्यापन थाटाने पार पडले. ‘गोंदवलेकर महाराज’ म्हणून श्रींची कीर्ती महाराष्ट्रात व कर्नाककात खूप पसरली. त्यामुळे श्रींच्या दर्शनास येणार्‍यांची संख्या फार वाढली. यांमध्ये विद्बान शास्त्री , मोठे अधिकारी, तपस्वी, योगसाधनी, श्रीमंत, कुलवान तसेच रोगी, दरिद्री, गांजलेले, दुष्ट, व्यसनी अशीही माणसे होती. समाजातील सर्व थरांमध्ये त्यांचे शिष्य पसरलेले असल्याने गोंदवले येथे जणू काय परमार्थाचा बाजारच भरला आहे असे वाटे. नवीन येणार्‍या माणसाला येथे एक विशेष गोष्ट दिसे, ती म्हणजे प्रत्येक मनुष्य नाम घेत आहे. मंदिरामध्ये, स्वयंपाकघरामध्ये, अंगनामध्ये, रस्त्यामध्ये, शेतामध्ये, मळ्यामध्ये, गोशाळेत जिकडे तिकडे नामाचा घोष ऐकायला येई. मनुष्याला जिंवत राहण्यास हवेची जितकी जरुरी आहे तितकीच जरुरी परमार्थामध्ये भगवंताच्या नामाची आहे, ही गोष्ट गोंदवल्यास येणार्‍या प्रत्येक मनुष्यास श्री पटवून देत. प्रत्येक जण तेथे काही तरी संकल्प करुन जप करीत असे. गोंदवल्याच्या राममंदिराला परमार्थाच्या विद्यालयाचे स्वरुप प्राप्त होऊन श्री त्याचे कुलगुरु शोभू लागले. सर्वांचे लक्ष श्रींकडे असे तसे श्रींचेही लक्ष सर्वांच्याकडे असे. मंदिरामध्ये रोज उत्सवाचे वातावरण असे. सर्व माणसे नीतीने व मर्यादेने वागत. रामनाम हे सर्वांचे साधान असे. श्रींच्या वागण्यामध्ये फार खुबी होती, अगदी प्रत्येक माणसाला वाटे की, श्रींचे आपल्यावर प्रेम आहे, त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागले असता जन्माचे कल्याण झालेच पाहिजे ही तर त्यांची प्रतिज्ञा होती. त्यांच्या बोलण्यात अतिशय आर्जव व नम्रता होती. प्रत्येकाचे अंतरंग जाणून श्री त्याच्याशी बोलत. प्रत्येकाचा दोष ते समजावून देत पण त्याचा कधी अपमान होत नसे. श्रींच्या संगतीत काहीजण उत्तम साधक झाले. भगवंताचे नाम ते जितक्या मुक्तहस्ताने वाटीत, तितक्याच मुक्त हस्ताने श्री अन्नदान करीत. अन्नाने बुद्धी तयार होते म्हणून प्रेमाने केलेला आणि प्रेमाने वाढलेला प्रसाद (भात, भाकरी व आमटी) मंदिरातील प्रत्येकाने खाल्लाच पाहिजे इकडे त्यांचे लक्ष असे. पुष्कळ वेळा श्री मंडळींना जेवायला बसत. पूर्वी गोंदवल्यास बाजार भरत नसे. लोकांना म्हसवड किंवा दहिवडीला जावे लागे. श्रींनी दर गुरुवारी बाजार भरविण्यास आरंभ केला. बाजारासाठी आलेल्या प्रत्येकाला प्रसाद घेतल्याशिवाय जाऊ नका असे सांगत व नंतर गावच्या सर्व मंडळींना त्या दिवशी प्रसाद घेण्यास बोलावीत. आपल्या गावात कोणी उपाशी राहू नये असे त्यांचे ब्रीद होते. त्यामुळे गरीब स्त्री-पुरुषांना श्री मायबाप वाटत. चैत्र शुद्ध पौर्णिमेस नामसप्ताह असे. माघ महिन्यात दासनवमीला भिक्षा होई.आषादी,कार्तिकी एकादशीला मोठे भजन होई. पंढरपूरला जाणारे पुष्कळ वारकरी व त्यांच्या दिंड्या मंदिरामध्ये मुक्काम करीत. श्री सर्वांच्या मोठ्या प्रेमाने परामर्ष घेत. "जयजय श्रीराम, जयजय श्रीराम" असे जेवायच्या वेळी मोठ्याने म्हणण्याचा प्रघात श्रींनी सुरु केला. त्यामुळे नंतर कोणतेही काम करताना सर्वजण भगवंताचे नाम घेऊ लागले. रोज नवीन मंडळी गोंदवल्यास येऊ लागली. तर जुनी मंडळी गोंदवल्याहून परत जाताना श्री प्रत्येकाला शिदोरी बांधून देत. सुवासिनी जायला निघाल्या म्हणजे प्रत्येकीची खणा-नारळांनी ओटी भरीत. मंदिरामध्ये श्रीराम उभा असणारा केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भावनेने श्री वागत व त्यांच्याकडे येणार्‍या प्रत्येकाला तशाच भावनेने वागवण्याचा मनापासून उपदेश करीत जो जो मनुष्य त्यांच्याकडे येई. त्याला मोठ्या प्रेमाने सांगत, " अरे, माझ्या रामाला एकदा डोळे भरुन पहा व नंतर घरी जा. " प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांना रामरायाची इच्छा काम करीत असल्याने दिसे. सर्व काही राम करतो, खरे कर्तेपण रामाचे हा श्रींच्या उपदेशाचा गाभा असल्यामुळे प्रत्येक गोष्टीला ते रामाला पुढे करुन आपण नाहीसे होत.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली