Get it on Google Play
Download on the App Store

अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील.

१८५२
अजून तरी त्याचे नाम घ्या.
तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील.
या वर्षी पतांनी श्रींना गावच्या शाळेत घातले. अण्णा खर्शीकर नावाचे मास्तर ही शाळा चालवीत असत. गावातील पुष्कळ मुले या शाळेत येत. गुरूजींनी धडा द्यावा, आणि श्रींनी तो तत्काळ म्हणून दाखवावा असे चाले. नंतर "आज एवढे पुरे, उद्या पुढे सांगेन ’ असे आण्णांनी सांगून श्रींना गप्प बसवावे. अशा रीतीने बाळबोध व मोडी लिहिणे आणि वाचणे, बेरीज, वजाबाकी इत्यादि गणित आणि हिशोब करणे, सुंदर व घोटीव अक्षर काढणे, वगैरे अण्णांजवळ होती तेवढी सर्व विद्या संपली. तरी श्रींचे ’मला पुढे सांगा ’ हे चालूच राहिले. तेव्हा अण्णा म्हणाले, "अरे माझी विद्या संपली, मग काय विचारता ! श्रींनी रोजशाळेमधे जावे, मुलांना बाहेर काढावे, गोटया, विटी-दांडू खेळावे, पोहायला जावे. शाळेत असताना अक्षर गिरवण्याच्या वेळी श्री इतर मुलांना ’श्रीराम समर्थ ’ असा कित्ता काढून देत आणि तो सर्वांना गिरवायला सांगत. मुलेसुद्धा मोठया हौसेने ’श्रीराम समर्थ ’ असे काढीत बसायची. अण्णांना हे बिलकुल पसंत नसे सर्व मुले खेळायला जमली म्हणजे प्रथम श्री त्यांना मोठयाने श्रीरामाचे भजन करायला लावायचे. मधून मधून भजन आणि मधूनमधून खेळ असा प्रकार चाले. एकदा शाळा भरल्यावर अण्णा मध्येच काही कामासाठी घरी गेले. बापू फडतरे नावाचा श्रींचा एक मोठा जिवलग मित्र होता, तो मुलांना म्हणाला ’आपण श्रीरामाचे भजन करू या ’ त्याबरोबर सर्व मुलांनी धडे घोकण्याऐवजी सर्व मुले मोठयाने "श्रीराम, श्रीराम " असे म्हणू लागली. अण्णा परत येऊन पाहतात तो हा प्रकार, त्यांना फार राग आला." ते म्हणाले "गणूने तुम्हाला हे खूळ शिकविले आहे नां ! थांबा काढतो एकेकाची भक्ती ’ असे बोलून प्रत्येक मुलाला जोराने एकेक छडी मारली. पथापि मुलांची ही मनोवृत्ती पाहून इतः पर या गावात राहण्यात अर्थ नाही असा विचार करून अण्णा दुस‍र्या दिवशीच आपले सामान गाडीत भरून दुस‍र्या गावी जायला निघाले. गाडी गावाच्या बाहेर गेल्यावर श्रींनी त्यांना गाठले, आणि म्हणाले " अण्णा, रामरायाचा द्वेष करून आजपर्यंत कुणाचे कल्याण झाले नाही. अजून तरी त्याचे नाम घ्या, तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील." हे गोड प्रेमळ शब्द ऐकून अण्णांच्या डोळ्यांत पाणी आले आणि ते "श्रीराम श्रीराम " असे म्हणत असता गाडी पुढे निघून गेली. श्रींची शाळा सुटली तरी इतर उपदूव्याप सुटले नव्हते. दुस‍र्या शाळेची सोय नसल्याने श्री घरीच होते, परंतु घरी तरी श्री स्वस्थ कसे बसणार ! आता सर्व मुले श्रींना ’गणुबुवा ’ म्हणू लागली.

श्रीब्रह्मचैतन्य महाराज चरित्र

संकलित
Chapters
श्रीशुक परिक्षितीला ब्रह्मदेवाची कथा सांगतात "शुद्ध बीजापोटी । फळे रसाळ गोमटी" तुला आईचा सहवास नेहमी पाहिजे काय ? श्रींचे चरित्र दैवी संपत्तीच्या गुणांनी भारलेले तैशी दशेची वाट न पाहता । वयसेचिया गांवा न येता । माझ्या राज्यात भिकारी असा कुणी राहू देणार नाही. नदीकाठी अगदी एकांत असतो, तेथे मन नामात लवकर रंगून जाते. अजून तरी त्याचे नाम घ्या. तो दयाळू आहे, तुमचे कल्याण करील. मी अगदी चांगली वागेन, पण तू नामाची लाखोली मात्र खरीच वाहिली पाहिजेस. सदगुरुवाचून जिवाची तळमळ शांत होत नाही. "याचे लग्न करून द्यावे म्हणजे हा घरी रमू लागेल." "तुझे काम माझ्याकडे नाही." "तू स्वतःचा खून कर, तू स्वतःला मारून टाक " "पूर्वी वसिष्ठांनी रामचंद्राला जे दिले, ते मी तुला या क्षणी देतो." "तुमच्या अंतकाळी मी हजर राहीन, हे माझे वचन घ्या." "रामनामाने भवरोग नाहीसा होतो, तर देहाचा रोग बरा होणार नाही का !" "तुम्ही सर्व मंडळींनी भगवंताला कधीही विसरू नये व आनंदात रहावे म्हणजे मला सर्व पोचले." "महाराज, आपण माझे बाप आहात, मला क्षमा करा. मी आपल्याला शरण आहे." त्याच्या तीन खुणा आहेत. तो दिसायला मोठा सुंदर आहे "तू नामस्मरण करीत रहा. रामेश्र्वराच्या दर्शनाला आम्ही तुला घेऊन जाऊ." "पंतांचा नातू मोठा साधू होऊन गोंदवल्यास परत आला आहे." "आई, या कामाचा आता मला कंटाळा आला आहे. शिवाय सदगुरूंना भेटूनही फार दिवस झाले." "गीतेचा नववा अध्याय वाचीत जा " "चल, तू आता तुकामाईंच्या दर्शनाला खरी लायक आहेस." वनवासात असताना पंचवटीत श्रीरामचंद्रांच्या संगतीत सीतेने आनंदात दिवस घालवले "तुम्ही रामदास आहात, मी शिवाजी बनतो." "आई, नवीन सून तुझ्याकडे डोळा वर करून कधी पहाणार नाही." इतक्या लोकांना कामावर लावून पोसणारा हा कोण राजा आहे ?" "माय, मला फार भूक लागली आहे, माझे पोट भरेल एवढे दूध दे." "मला सांभाळणारा राम समर्थ आहे, पण मी न मरता हे सर्प मेले तर तुमच्या मंत्राची व तुमची हानी होईल." "ज्या रामरायाने तुमच्या मुलाचे प्राण वाचविले, त्याचे नाम कधी विसरू नका. राम मुलाचे कल्याण करील." "मोठमोठया तपस्व्यांना कधी साधणार नाही, असा अंतकाळ त्याने साधला. सरकार जेव्हा राज्य करते तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरते ज्या ज्या माणसांचा श्रींशी संबंध आला त्या प्रत्येकाला त्यांनी रामनामाचा छंद लावला. विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा. त्याची जहागीर तुला मिळेल. भारतभूमी ही अध्यात्मभूमी आहे. "भोग भोगून संपविला आहे, आता मऊ भात करून घाला." जगतामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट श्रीरामरायाच्या इच्छेनेच घडत असते. "आपण ज्याचे मंदिर बांधीत आहोत तो आपणहून येईल." एवढया मोठया समारंभात आणि जनसमुदायात सर्व लोकांच्या चित्ताचे केंद्र मुक्या जनावरांचेसुद्धा श्रींवर अकृत्रिम प्रेम होते. "महाराज ! आपण समर्थ आहात, या व्यसनापासून मला आता सोडवा." रामाचे देणेच तेवढे हिताचे असते. प्रापंचिक माणसाने घरातले सर्व देऊन टाकू नये. गादीखाली खूप पैसे ठेवले आहेत, वाटेल तेवढे तू दे." राम व शिव असा भेद मानू नये. स्नान करून झाल्यावर शिवमंत्र जपावा "महाराज ! राम, सीता, लक्ष्मण यांच्या डोळ्यांतून सारख्या अश्रुधारा वाहत आहेत." सामान्य माणसाने भगवंताला शरण जाऊन त्याच्या नामाचा आधार घट्ट धरावा अक्रोध, निर्लोभ चित्तात वृत्ती लीन करून उपासनेरूप जग पाहावे. "हरवलेल्या मुलाला आई भेटल्यावर जसे होते, तसे मला झाले." "ज्ञान श्रेष्ठ खरेच, पण ते भक्तीशिवाय जगू शकत नाही. भगवंतापासून जो विभक्त नसतो तो भक्त." जो नामात इतका रंगला, की त्याला स्वत:चा विसर पडला "घरदार, पैसा अडका, भांडीकुंडी आणि आपला देह देखील भगवंताला अर्पन करावा. यामुळे अपमृत्यू टळू शकतो." आपला देह आणि आपला प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो शंका फार चिवट असतात. नाम सतत घेत गेल्याने मन स्वच्छ होत जाते व सर्व शंका आपोआप विरुन जातात. मंदिरामध्ये उभा असणारा श्रीराम केवळ मूर्ती नसून प्रत्यक्ष परमात्मा आहे अशा भानेने श्री वागत. नाम सांगता जनासी। विष देऊ येती त्यासी । दास म्हणे काळगती । पहा युगाची प्रचिती ॥ ‘गुरुची आज्ञा पाळणे हाच खरा परमार्थ होय’ विश्वविद्यालय हे लौकिक विद्येचे केन्द्र असते "खर्‍या भजनाला ताल, सूर लागत नाही. त्याला प्रेम व भाव लागतो. प्रत्यक्ष परमात्मा समोर आहे ह्या भावनेने भजन म्हणावे." "कली फार माजेल तेव्हा नामाला सोडू नका. जो नाम घेईल त्याला मा भय नाही." भजनाचा शेवट आला । एक वेळ राम बोला । दीनदास सांगे निका । रामनाम स्वामी शिक्का ॥ श्रीब्रह्यचैतन्य महाराजांनी स्वतः सांगितलेली